शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तु ये रे पावसा, 'गेला पाऊस कुणीकडे'...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 9:55 PM

1 / 8
राज्यातील १०९ लाख ८२ हजार हेक्टरवरील पेरण्या झाल्या असल्या तरी पुरेसा पाऊस न झाल्याने मोठ्या प्रमाणातील क्षेत्रावर पेरण्या झाल्या नाहीत.
2 / 8
राज्यात १ ते २२ जुलै या कालावधीत सरासरी ५०९ मिलिमीटर पाऊस होतो. यंदा तो ३८६.६० (७५.३६ टक्के) इतका झाला आहे.
3 / 8
विदर्भ आणि मराठवाड्यातील पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे. त्यामुळे शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.
4 / 8
आभाळ पांढरफट्ट पडलं आहे, पावसाचा लवलेशही नाही तर हवामान खात्याचा अंदाजही फोल ठरतोय.
5 / 8
पाऊस नसल्याने गेला पाऊस कुणीकडे अशी म्हणण्याची वेळ ग्रामीण भागातील नागरिकांवर आली आहे. पाऊस नसल्याने ग्रामीण भागातील बाजारपेठाही ठप्प झाल्या आहेत.
6 / 8
मुंबईसह कोकणात मोठ्या प्रमाणावर पाऊस आहे. मात्र, मुंबईत राहणाऱ्या नोकरदारांच्या गावाकडे पावसाने पाठ फिरवली आहे. म्हणूनच फोनवर आई-वडिलांशी बोलताना उत्तर माहिती असूनही पाऊस-पाणी कसंय विचारताना शब्द जड होतात.
7 / 8
आभाळात काळे ढग साचतात तेव्हा बळीराजा सुखावतो, वरुण राजाची कृपीदृष्टी होईल असे वाटून आनंदित होतो. पण, काही वेळातच हे काळे ढग नाहीसे होतात.
8 / 8
अमरावतीमध्ये कपाशीच्या पिकाला चक्क विकतचं थेंब थेंब पाणी आणून शेतकऱ्याने दिलंय. अगदी काळीज हेवालणार हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झालंय.
टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र