शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Maharashtra Election 2019: जाणून घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या प्रचार सभेतील 5 ठळक मुद्दे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 1:29 PM

1 / 5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली जाहीर सभा जळगावात पार पडली. यामध्ये त्यांनी विविध मुद्द्यावरुन विरोधकांना टीकेचं लक्ष्य केलं. 5 ऑगस्टला तुमच्या सगळ्यांच्या भावना लक्षात घेऊन भाजपा आणि एनडीए सरकारने देशात ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यामुळे गेल्या 70 वर्षापासून विकासापासून वंचित असलेल्या काश्मिरी लोकांना न्याय मिळाला.
2 / 5
जम्मू काश्मीर आणि लडाख हा फक्त जमिनीचा तुकडा नसून भारतमातेचं मस्तक आहे. तेथील मातीचा प्रत्येक कण भारताला मजबूत करतो.
3 / 5
जर विरोधकांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी आगामी निवडणुकीच्या जाहीरनाम्यात कलम 370 पुन्हा लागू करु असं घोषित करावं असं आव्हान नरेंद्र मोदींनी भाषणात केलं.
4 / 5
थकलेले पक्ष एकमेकांचा आधार बनू शकतात पण महाराष्ट्रातील तरुणांच्या अपेक्षा पूर्ण करु शकत नाही असा टोला मोदींनी काँग्रेस-राष्ट्रवादीला लगावला.
5 / 5
2022 पर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येकाला घर, पाणी देण्याचा संकल्प भाजपाचा आहे, जल जीवन मिशनसाठी साडेतीन लाख कोटी रुपये खर्च करणार असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Article 370कलम 370