बायकोपासून वैतागला नवरा; जीवे मारण्यासाठी दिली ५ लाखांची सुपारी

By पूनम अपराज | Published: January 22, 2021 08:54 PM2021-01-22T20:54:56+5:302021-01-22T21:31:53+5:30

Murder Case : मध्य प्रदेशात पत्नी आणि पतीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. 

आपल्या पतीने पत्नीला वैतागून तिची हत्या करण्यासाठी सुपारी दिली. पोलिसांनी ७ दिवसांत या खळबळजनक प्रकरणाचा पर्दाफाश केला. (All Photo - Aaj Tak)

दरम्यान १४ जानेवारी रोजी सुसनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पालडा गावातील निर्जन स्थळी एका अज्ञात महिलांचा मृतदेह सापडला. मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत होता. पोस्टपोर्टेममध्ये मृत्यूचे कारण गळा दाबल्याचे पुढे आले. 

पोलिसांच्या समोर या गुन्ह्याचा तपास करणं खूप मोठं आव्हान होतं. आगर मालवाच्या पोलीस अधिक्षकांनी हे प्रकरण गंभीर समजून तपास सुरु केला. महिलेचे पोस्टर सर्व जागी लावले, गावोगावी जाऊन चौकशी केली. या चौकशीदरम्यान महिला ग्राम पगारियामध्ये राहत असल्याचे उघड झालं. त्यानुसार पोलिसांचं पथक पगारिया येथे पोहचलं आणि त्यांनी घरमालकाला भेटून माहिती घेतली तेव्हा मृत महिलेचा पती फौजी आणि इतर लोक २००० रुपये महिन्याचं भाडं देऊन राहत असल्याचे उघड झालं. महिलेचं नाव कामाक्षी असून ती मूळची छिंदवाडा येथे राहणारी आहे. 

छिंदवाडा येथे जाऊन मृत महिलेच्या कुटुंबियांना बोलावून दफन केलेल्या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटवली. त्यावेळेची तिच्या भावाने सांगितले, अर्जुन फौजीने लग्नाचे आमिष दाखवून तिच्या बहिणीशी अवैध संबंध ठेवले, याबाबत पोलीस तक्रार देखील केली गेली आहे. त्यानंतर फौजीने आर्य समाजच्या मंदिरात जाऊन लग्न केलं. फौजीने आपले इतर संबंध लपवण्यासाठी ३ लोकांना ५ लाखांची सुपारी दिली आणि नंतर तिघांनी महिलेला कारमध्ये बसवून पूस लावून पळवून हरनावदा येथील जंगलात गळा घोटून ठार मारले आणि मृतदेह पालडाच्या जंगलात फेकून दिला. पोलिसांनी या तिघांना अटक केली असून मास्टरमाइंड नवरा पतीचा पोलीस शोध घेत आहेत.