शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Astro Tips: 'या' पवित्र गोष्टींचे हातातून निसटणे अशुभ का मानले जाते? जाणून घ्या कारण आणि उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 18:34 IST

1 / 5
तीर्थ असो वा प्रसाद तो न सांडता पटकन तोंडी लावावा अशी बालपणापासून आपल्याला शिकवण मिळालेली असते. तरी अंगात असलेला धसमुसळेपणा आपल्याला स्वस्थ बसू देत नाही आणि प्रसादाचे कण किंवा कधी कधी प्रसादाचा द्रोण, साखरदाणे जमिनीवर सांडतात. अशा वेळी वरवरचा प्रसाद काढून घ्यावा आणि माती लागलेला प्रसाद केरसुणीने न भरता कापडाने भरून चिमण्या कावळ्यांना टाकावा पण केराच्या टोपलीत फेकू नये.
2 / 5
हा अत्यंत नाजूकपणे आणि सावधपणे हाताळण्याचा प्रकार असतो. कारण देवाची मूर्ती दगडाची, काचेची, मातीची किंवा अन्य कसलीही असली तरी आपण त्यात देवत्त्व पाहतो. तिची पूजा करतो. त्यामुळे ती मूर्ती सावधपणेच हाताळायला हवी. अनावधानाने मूर्ती हातातून पडली आणि दुभंगली तर पुन्हा भग्न मूर्ती घरात ठेवावी की नाही इथून प्रश्न उभे राहतात. भग्न मूर्ती डोळ्यांना खटकते. वाहत्या पाण्यात विसर्जन करण्याशिवाय तिला पर्याय नसतो. म्हणून लहान मुलांच्या हाती अशी मूर्ती देऊ नये आणि मोठ्यांनीही देवमूर्ती सांभाळून हाताळावी!
3 / 5
कुंकू हे आपण सौभाग्याचे प्रतीक मानतो. तसेच ते देवीला वाहतो आणि तिच्याकडे सौभाग्य, दीर्घायुष्य आणि समृद्धी मागतो. त्यामुळे कुंकवाचा करंडा जमिनीवर सांडणे हे अशुभ मानले जाते. म्हणून तो हाताळताना काळजी घ्यावी. लहान मुलांचा वावर असलेल्या ठिकाणी कुंकू ठेवू नये. जमिनीवर सांडलेले कुंकू केरसुणीने भरू नये. कापडाने ते भरून घेत एखाद्या आडवळणाच्या झाडाशी टाकून यावे. सांडलेल्या कुंकवाचा पुनर्वापर करू नये. किंवा रांगोळी रंग म्हणून त्याचा वापर करावा.
4 / 5
पाण्याने भरलेला कलश, हंडा, कळशी हे सुबत्तेचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे. जल है तो जीवन है असे आपण म्हणतो. बाहेरगावी पाणी विकत घ्यावे लागते किंवा पाणीकपात झाल्यावर नळावरून पाणी भरावे लागते, तसेच गावाकडे विहिरीवरून पाणी भरून आणावे लागते, तेव्हा पाण्याची किंमत कळते. असे बहुमूल्य पाणी वाया जाणे हे सर्वाथाने अशुभच आहे. पाण्याचा वापर सुयोग्य पद्धतीने केला पाहिजे. बचत केली पाहिजे. गळके नळ दुरुस्त केले पाहिजेत व पाणी सांगणार नाही, वाया जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे! म्हणून गृह प्रवेशाच्या वेळी सुजाण मुलीच्या हाती पाण्याचा कलश देतात, जेणेकरून ते पाणी सांडू नये.
5 / 5
दिव्याशी खेळ करू नये. आजच्या झगमगाटीच्या दुनियेत तुळशीपाशी लावलेला दिवा किंवा देवघरात लावलेला दिवा आश्वासक वाटतो. सकारात्मक ऊर्जा देतो. शिवाय दिव्याची ज्योत हे अग्नीचे सूक्ष्म रूप, परंतु ती जरा कापड, कागद किंवा अन्य ज्वलनशील घटकांच्या संर्पकात आली तर हाहाक्कार माजवू शकते. म्हणून पूजेच्या दिव्याला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी. पूजा करताना दिवा मालवला तर पुन्हा प्रज्वलित करावा आणि देवाची क्षमा मागून पूजा पूर्ण करावी!