शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

११४ कोटींच्या निधीअभावी कामे थांबलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:23 IST

परभणी : जिल्ह्यातील विविध घटकांमधील विकास कामे मार्गी लावण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने २२५ कोटी रुपयांचा कृती आराखडा तयार केला ...

परभणी : जिल्ह्यातील विविध घटकांमधील विकास कामे मार्गी लावण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने २२५ कोटी रुपयांचा कृती आराखडा तयार केला असला, तरी प्रत्यक्षात या कामांसाठी निधीच उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे सध्या कामे ठप्प असून, शासकीय यंत्रणांना निधीची प्रतीक्षा लागली आहे.

जिल्ह्यात दरवर्षी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे इतर शासकीय योजनांच्या तुलनेत जिल्हा नियोजन समितीने प्रस्तावित केलेला निधी त्या-त्या वर्षात मिळत असल्याने, या समितीचा विकास कामांसाठी मोठा हातभार लागतो. चालू आर्थिक वर्षात एप्रिल महिन्यात जिल्हा नियोजन समितीने विविध घटकांचा समावेश करीत विकास कामांचा आराखडा तयार केला. या कृती आराखड्यास मंजुरीही मिळाली आहे. मात्र, कोरोनाच्या संसर्गामुळे या वर्षीही नियोजन समितीने प्रस्तावित केलेला निधी जिल्ह्याला उपलब्ध होण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत.

दरवर्षी सर्वसाधारणपणे टप्प्या-टप्प्याने निधीची उपलब्धता होते. त्यानंतर, शासकीय यंत्रणांकडून प्राप्त झालेल्या मागणीनुसार, या निधीचे वितरण त्या-त्या कामांसाठी करण्यात येते. मात्र, मागील दोन वर्षांपासून राज्य स्तरावरून निधी प्राप्त होण्यासाठी विलंब लागत आहे. मागील आर्थिक वर्षातही कोरोना संसर्ग वाढलेला होता. मात्र, त्यावेळी कोरोनाचा संसर्ग कमी होताच, राज्य शासनाने विकास कामांना गती देण्यासाठी तातडीने १०० टक्के निधी वितरणाचे धोरण अवलंबले आणि साधारणत: डिसेंबर महिन्यात निधी उपलब्ध झाला होता.

या वर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच कोरोना संसर्गाचा फैलाव झाल्याने निधी वितरणाला अडथळे निर्माण झाले आहेत. प्रस्तावित केलेल्या निधीपैकी १११ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असला, तरी त्यातील ३० टक्के म्हणजे ६७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी कोरोनासाठीच वापरण्यात आला. उर्वरित निधी स्प्लीटच्या कामांसाठी वापरण्यात आला. नवीन कामांसाठी निधी नसल्याने ही कामे थांबलेली आहेत.

जिल्हा प्रशासनाकडून पाठपुरावा

जिल्हा नियोजन समितीच्या कृती आराखड्यानुसार १०० टक्के निधी वितरित करावा, अशी मागणी जिल्हा स्तरावरून करण्यात आली आहे. या संदर्भात पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. जिल्ह्याला आणखी ११४ कोटी रुपयांची प्रतीक्षा आहे. कोरोना संसर्ग आता कमी झाला असून, जिल्ह्यातील ठप्प कामे मार्गी लावण्यासाठी शासनाने त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.

या विभागांच्या कामांवर परिणाम

शिक्षण, आरोग्य, रस्ते, जनसुविधा, जलसंधारण, वनविभाग, महावितरण कंपनीच्या वेगवेगळ्या कामांचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, आतापर्यंत प्राप्त झालेला निधी केवळ कोविडसाठीच वापरण्यात आला. त्यामुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध घटकांचे प्रस्तावित केलेली कामे निधीअभावी थांबलेली आहेत.