शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

नांदेडसाठी दिग्रस बंधाऱ्यातून सोडले पाणी; पालम तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 5:02 PM

पात्रात पाणी शिल्लक नसल्याने गोदावरी काठचे वाळवंट होणार या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

ठळक मुद्देवीस दलघमी चा विसर्गगोदाकाठचे होणार वाळवंट

पालम (परभणी ) :  तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातील दिग्रस बंधाऱ्यातून नांदेड शहरासाठी आज सकाळी सहा वाजता पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सकाळी 11 वाजेपर्यंत जवळपास 20 दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग झाला असून यामुळे येथील पात्रात आता केवळ गाळ शिल्लक राहिला आहे. पाणी शिल्लक नसल्याने गोदावरी काठचे वाळवंट होणार या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

पालम तालुक्यातील दिग्रस बंधाऱ्यातील पाण्याचासाठा नेहमीच गोदाकाठच्या गावांसाठी डोकेदुखी बनला आहे यावर्षी बंधाऱ्याच्या पात्रात 37 दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा करण्यात आला होता या पैकी 25 दलघमी पाण्याचे आरक्षण करण्यात आले होते 22 डिसेंबर रोजी बंधाऱ्यात 26 दलघमी पाणीसाठा शिल्लक होता यापैकी नांदेड साठी 25 दलघमी पाणी सोडावे अशी मागणी करण्यात आली होती पण जिल्हाधिकारी शंकर यांनी पालम शहर व गोदाकाठावरील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी सहा दलघमी पाणीसाठा शिल्लक ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यामुळे नांदेड साठी 26 दलघमी पैकी 20 दलघमी पाणी सोडण्यात आले. आज सकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी 16 दरवाजा पैकी नऊ दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. 

परिसरातील शेतकऱ्यांवर संकट गोदावरीच्या पात्रात आता केवळ सहा दलघमीचा साठा शिल्लक राहिला असे दाखवले जात आहे. मात्र या पाण्यात मोठ्या प्रमाणावर गाळ शिल्लक राहिलेला आहे. पाणी सोडल्याने दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले असून पिकांची राखरांगोळी होण्याची भीती आहे. यावर्षी स्थानिकांना विचारात न घेता पोलिस प्रशासनाच्या बळाचा वापर करीत अचानक पाणी सोडण्यात आले. यामुळे शेतकर्‍यांना विरोध करण्यास वेळ मिळाला नाही गोदापात्रात कमी पाणीसाठा राहिल्याने गोदावरीचे वाळवंट होणार या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. 

टॅग्स :WaterपाणीDamधरणNandedनांदेडparabhaniपरभणी