शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

जगाचा पोशिंदा पाच दिवसांआड घेतोय गळफास; परभणी जिल्ह्यातील धक्कादायक चित्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 14:15 IST

कोसळलेले भाव, दुष्काळ ठरताहेत शेतकरी आत्महत्येची कारणे

परभणी : पाच वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या आश्वासनाला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न या काळात दुप्पट झाले की नाही, हा मंथनाचा विषय असला तरी दुसरीकडे मात्र परभणी जिल्ह्यात जगाचा पोशिंदा म्हणून संबोधल्या जाणारा बळीराजा ५ दिवसांआड आपले जीवन संपवत असल्याची विदारक स्थिती जिल्ह्यात दिसून येत आहे. मात्र, ही स्थिती बदलण्यासाठी प्रशासन स्तरावर आवश्यक ते बदल होत नसल्याचे दिसून येत आहे.

शासन-प्रशासनाकडून विविध विभागांद्वारे योजनांची जंत्री शेतकऱ्यांसाठी राबवली जाते. यामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत पिकांचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी सुधारित बियाणे वितरण, कृषी अवजारे, सिंचन साधनांना अर्थसहाय्य आदी योजना राबविण्यात येतात. त्यातच २०१४ मध्ये केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा नारा दिला. मात्र, हे आश्वासन देऊन ८ वर्षे उलटले. परंतु, शेतकऱ्यांची परिस्थिती ‘जैसे थे’च असल्याचे दिसून येते. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करत बळीराजा कष्टाने शेतमाल उत्पादित करतो. मात्र, त्या शेतीमालाला बाजारात अपेक्षित भाव मिळत नाही, अशा परिस्थितीत शेतीमधून शेतकऱ्यांना स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल, एवढी देखील कमाई मागील काही दिवसांपासून होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच यावर्षी सध्या कापसाला ८ हजार रुपये तर सोयाबीनला ५ हजार रुपये मिळणारा हा दर पिकांवर केलेला खर्चापेक्षा कितीतरी पटीने कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जगावे कसे? असा प्रश्न निर्माण होत आहे.

तर दुसरीकडे या प्रश्नावर लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासन आवश्यक त्या उपाययोजना करत नसल्याने शेतकरी पुरता खचला आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत जिल्ह्यातील १८ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. याचा विचार केला तर जिल्ह्यामध्ये दर ५ दिवसाला बळीराजा आपल्या गळ्याला फास घेत आहे. त्यामुळे बळीराजाचे जीवन स्वस्त झाले आहे की काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

मदतीसाठीही कोतेपणा?जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत जिल्ह्यात १८ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. यामध्ये जानेवारीत ६, फेब्रुवारी ६ व मार्च महिन्यात ६ जणांनी बाजारभाव, नापिकी, दुष्काळ, वेळेत न मिळणारे पीक कर्ज यासह विविध कारणांनी गळफास लावत आपले जीवन संपविले आहे. शेतकरी हा कुटुंबातील कर्ता असल्याने त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे या शेतकऱ्याच्या कुटुंबाला प्रशासनाने तत्काळ मदत देणे गरजेचे होते. परंतु, आतापर्यंत केवळ ६ शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले आहेत. त्यातील २ शेतकरी अपात्र ठरले असून, चौकशीसाठी १० प्रकरणे प्रलंबित आहेत. विशेष म्हणजे या तीन महिन्यांत अद्यापपर्यंत एकाही शेतकऱ्याला मदत देण्यात आलेली नाही, हे वास्तव आहे.

गतवर्षी ७७ शेतकऱ्यांच्या आत्महत्यापरभणी जिल्ह्यातील जमीन ही सुपीक आणि काळी कसदार असली तरी मागील काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे आर्थिक चक्र बदलून टाकले आहे. नगदी पीक म्हणून शेतकरी सोयाबीन, कापूस आदी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करतो. परंतु, ही पिके काढणीला आलीच की अतिवृष्टी, सततचा पाऊस, वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतो. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आत्महत्या शिवाय पर्याय उरत नसल्याचे दिसून येत आहे. जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत जिल्ह्यात ७७ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. त्यातील ६७ शेतकरी राज्य शासनाच्या १ लाख रुपयांचे मदत देण्यात आले. यातील १० प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरले आहेत. विशेष म्हणजे त्यातही १६ प्रकरणे मदतीसाठी प्रलंबित असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या अहवालावरून दिसून येत आहे.

आत्महत्येची कारणे-सिंचनाचा अभाव-सततचे भारनियमन-उत्पादनातील घट-बाजारात कोसळलेले भाव-बदलते हवामान-सिंचनाचा अभाव-सावकारी कर्जाचा डोंगर-परतफेडीसाठी तगादा

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्याagricultureशेतीparabhaniपरभणी