शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

जलजीवनच्या निधीसाठी केंद्राने हात झटकले; गावागावात नळाद्वारे शुद्ध पाणी पोहचणार कसे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 16:20 IST

केंद्र सरकारने या योजनेचा संपूर्ण आर्थिक भार राज्य सरकारने उचलावा, असे पत्र काढल्याने संभ्रम वाढला आहे.

परभणी : जिल्ह्यातील गावागावात नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचवण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणारी महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन योजना सध्या आर्थिक अडचणीत सापडली आहे. केंद्र सरकारने या योजनेचा संपूर्ण आर्थिक भार राज्य सरकारने उचलावा, असे पत्र काढल्याने संभ्रम वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील योजना पूर्ण करण्यासाठी ३८८ कोटी नेमके देणार तरी कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्याच्या तिजोरीत असलेला खडखडाट पाहता कंत्राटदारही ही कामे करण्यास हात आखडता घेत आहेत.

जिल्हा परिषदअंतर्गत ६६६ योजना असून, त्यांची एकूण किंमत ५८२.१७ कोटी रुपये आहे, तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) अंतर्गत २४ योजना असून, त्यांची किंमत २५६.४३ कोटी रुपये इतकी आहे. दोन्ही मिळून ६९० योजनांची एकूण किंमत ही ८३८.६० कोटी रुपयांवर पोहोचते. आतापर्यंत या योजनांवर ४५० कोटी रुपये खर्च केले असून, उर्वरित ३८८.६० कोटी रुपये देणे बाकी आहे. आजही २८३ योजना प्रगतीपथावर आहेत. तसेच या योजनांतर्गत काम करणाऱ्या अनेक कंत्राटदारांचे सद्यस्थितीत ८० कोटी रुपये थकले आहेत. निधीअभावी अनेकांनी काम बंद केल्यामुळे अंमलबजावणीत मोठा अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे उर्वरित कामांसाठी निधी कुणी द्यायचा? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. जलजीवन मिशनचा उद्देश ग्रामीण भागातील घराघरात नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचवण्याचा आहे. मात्र, सध्या निधीअभावी योजना अर्धवट अवस्थेत अडकली आहे. राज्य सरकारने तातडीने निधी उपलब्ध करून दिला नाही, तर ग्रामीण भागातील हजारो नागरिकांना अजूनही शुद्ध नळपाणी योजनेपासून वंचित राहावे लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

स्वतःचे अर्थस्रोत वापरण्याचे निर्देशकेंद्र सरकारच्या जल शक्ती मंत्रालयाने जलजीवन मिशनसंदर्भातील नवा आदेश १६ जून रोजी काढला. यात जलजीवन मिशनसाठी केंद्राने मंजूर केलेला बहुतांश निधी २०२३-२४ पर्यंत खर्च झाला असून, उर्वरित निधी २०२४-२५ मध्ये पूर्णपणे वापरला गेला आहे. त्यामुळे राज्यांनी आता सुरू असलेल्या पाणीपुरवठा प्रकल्पांसाठी आपले स्वतःचे अर्थस्रोत वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कामांसाठी मात्र २०२८पर्यंत मुदतवाढकेंद्र सरकारने जलजीवन मिशनची मुदत डिसेंबर २०२८ पर्यंत वाढवली असल्याचेही जाहीर केले आहे. दरम्यान, केंद्र शासनाकडून जलजीवन मिशन योजनेच्या कामांची पाहणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पथक पाठविण्यात येणार आहे. या पथकाकडून कामांचा दर्जा, या योजनेची फलश्रुती काय? याचा आढावा घेतला जाणार आहे. त्यावरच पुढील निधीचे भवितव्य अवलंबून आहे.

परभणी जिल्ह्यात कामांची स्थिती० ते २५ टक्के पूर्ण: ८ योजना२६ ते ५० टक्के पूर्ण: ४८ योजना५१ ते ७५ टक्के पूर्ण: ८९ योजना७६ ते ९९ टक्के पूर्ण: १३८ योजना१०० टक्के पूर्ण: ३८३ योजना

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीParbhani z pपरभणी जिल्हा परिषद