शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सायंकाळी गुरे चरून घरी परतली पण मुले नाही; शेततळ्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू

By मारोती जुंबडे | Updated: January 19, 2024 17:07 IST

दोन्ही मुले गावातीलच शाळेत दहावी वर्गात शिक्षण घेत होते

परभणी : गुरे चारण्यासाठी गेलेल्या दोन पंधरा वर्षीय मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरात असलेल्या शेततळ्यात १८ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. यातील मयत कृष्णा पौळ याचा मृतदेह गुरुवारी रात्री तर ओम कंधारे याचा मृतदेह शुक्रवारी १० वाजेच्या सुमारास आढळला. मयत दोन्ही मुले सायाळा खटिंग येथील रहिवासी आहेत. 

कृष्णा बालासाहेब पौळ (१५) व ओम बाबूराव कंधारे (१५) असे मयत मुलांची नावे आहेत. दोन्ही मुले गुरुवारी गुरे घेऊन चारण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात गेली होती. सायंकाळच्या सुमारास जनावरे घरी परत आली; परंतु, मुले आली नाहीत. थोड्या वेळाने ही मुले घरी येतील, असा कुटुंबांचा समज झाला; परंतु, रात्री उशिरापर्यंत ही मुले घरी परतली नाहीत. त्यामुळे कुटुंबासह ग्रामस्थांनी मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी वनामकृ विद्यापीठातील शेततळ्यात कृष्णा पौळचा मृतदेह गुरुवारी रात्री दिसून आला.त्यानंतर कृष्णाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी पहाटेपासून शेततळ्यात ओम याचा शोध घेण्यास सुरुवात झाली.

शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास ओम कंधारे याचा मृतदेह मिळून आला. या शोध मोहीमसाठी शहर महापालिका अग्निशमनचे गौरव देशमुख, संतोष पोंदाळ, मदन जाधव यांनी शोध मोहीम राबविली. घटनास्थळी नवा मोंढा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र मुंडे, पोहेकॉ. गुलाब भिसे, प्रदीप रणमाळ यांची उपस्थिती होती. याप्रकरणी नवा मोंढा पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, ही दोन्ही मुले पोहण्यासाठी शेततळ्यात उतरली मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने या मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची शक्यता घटनास्थळी वर्तवली जात होती. या प्रकरणाचा अधिक तपास गुलाब भिसे हे करीत आहेत. या घटनेने सायाळा खटिंग गावावर शोककळा पसरली.

दोघेही दहावीत शिक्षण घेत होतेवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरात असलेल्या सायाळा खटिंग येथील कृष्णा पौळ हा कुटुंबाला एकुलता एक होता. तर ओम कंधारे याला एक लहान भाऊ आहे. दोन्ही मुले गावातील स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालयात शिक्षण घेत होती; परंतु, गुरुवारी ही दोन्ही मुले गुरे चारण्यासाठी विद्यापीठ परिसरात गेली. या परिसरात असलेल्या शेततळ्यात पोहण्यासाठी उतरली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूparabhaniपरभणी