दहावी-बारावी परीक्षा ऑफलाइनच होणार; पालकांची चिंता वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:19 IST2021-02-24T04:19:08+5:302021-02-24T04:19:08+5:30
परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच शासनाने मात्र दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घेण्याचा निर्णय घेतल्याने पालकांच्या चिंता ...

दहावी-बारावी परीक्षा ऑफलाइनच होणार; पालकांची चिंता वाढली
परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच शासनाने मात्र दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घेण्याचा निर्णय घेतल्याने पालकांच्या चिंता वाढल्या आहेत.
जिल्ह्यात यावर्षी उशिराने शाळा सुरू झाल्या; मात्र त्यातही अनेक शिक्षक पॉझिटिव्ह झाल्याने पुन्हा शाळा बंद करण्याची वेळ आली आहे. त्यातच दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घेण्याचा निर्णय झाला आहे. एकीकडे गर्दी करू नका, असे प्रशासन सांगत असताना दुसरीकडे मात्र परीक्षेच्या निमित्ताने पुन्हा गर्दी होणार असून, त्यातून विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे. तेव्हा कोरोनाची दुसरी लाट लक्षात घेता, दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीनेच घ्याव्यात, अशी पालकांची अपेक्षा आहे.
मागील वर्षीच्या कोरोना स्थितीमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी कमी वेळ मिळाला. तेव्हा ऑफलाइनच; परंतु मे महिन्यात परीक्षा घ्याव्यात.
रामेश्वर बहिरट
दहावीच्या विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. सात महिने वर्ग बंद होते. त्यामुळे घाईघाईत त्या ही ऑफलाइन परीक्षा घेणे चुकीचे आहे.
मुरलीधर पांढरेश
कोरोनामुळे अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही. दोन महिन्यात कशा तरी शाळा सुरू झाल्या होत्या. त्याही आता बंद झाल्या आहेत. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलाव्यात.
वसंतराव गरड