शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
2
Top Marathi News LIVE Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; पश्चिम बंगाल, तामिळनाडूतही मतदारराजा देणार कौल
3
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
6
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
7
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
8
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
9
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
10
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
11
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
12
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
13
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
14
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
15
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
16
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
17
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
18
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
19
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
20
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरातच ५६ टक्क्यांनी वाढले सोयाबीनचे तेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:14 IST

भाजीपाला, किराणा व फळांच्या किमतीतही वाढ झाल्याचे दिसून येते. तेल व मिरची मसाले यांच्या भाववाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. ...

भाजीपाला, किराणा व फळांच्या किमतीतही वाढ झाल्याचे दिसून येते. तेल व मिरची मसाले यांच्या भाववाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. मध्यंतरी १०९ रुपये किलोच्या भावाने खाद्यतेल मिळायचे. आता सोयाबीन असो कि फल्लीतेल सर्वच खाद्यतेलांचे भाव चांगलेच वाढले आहे. आरोग्याच्या दृष्टीने डबल व ट्रीपल फिल्टर खाद्यतेलाला चांगलीच मागणी असते. मात्र, विविध कारणांनी खाद्यतेलाच्या भाववाढ सर्वसामान्यांचे टेंशन वाढविणारी बाब ठरली आहे. आधीच कोरोना संकटकाळामुळे अनेकांवर उपासमारीचे संकट बळावले असताना त्यातच जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीमुळे समस्येत अधिकच वाढ झाली आहे. मे २०२० मध्ये ९० रुपये प्रति किलोने मिळणारे सोयाबीनचे तेल १५८ ते १६० रुपये प्रतिकिलो वर जाऊन पोहोचले आहे. त्याचबरोबर १६०ते १७० रुपये किलोने मिळणारे करडईचे तेल प्रति किलो २०० ते २४० रुपयांवर जाऊन पोहोचले आहे. १४० ते १७० रुपये किलोने मिळणारे शेंगदाणा तेल १८० ते १९० रुपये किलोने मिळत आहे. पाम तेलाची किंमत सर्वाधिक वाढली असून किरकोळ किंमत किलोला सध्या १३१ रुपये ६९ पैसे होती. हा अकरा वर्षांतील उच्चांक असून गेल्या वर्षी याच काळात ही किंमत ८८ रुपये २७ पैसे होती. मोहरीच्या तेलाचे किरकोळ दर मे महिन्यात १६४ रुपये ४४ पैसे होते. तेच दर गेल्या मे महिन्यात ११८ रुपये २५ पैसे होते. विशेष म्हणजे वर्षभरातच सोयाबीन तेलाच्या दरामध्ये ५६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अजूनही त्यात वाढ होणार काय, अशीच चर्चा बाजारपेठेत ऐकावयास मिळत आहे. प्रत्येकच वस्तू महाग होत असेल तर बजेटमध्ये घर चालवायचे तरी कसे असा प्रश्न गृहिणींसमोर निर्माण झाला आहे. आधीच गॅस सिलिंडर्सच्या दरामुळे अनेकांचे बजेट कोलमडले आहे. त्यातच खाद्यतेलाच्या भाववाढीमुळे आगीत अजून तेल ओतण्याचे कार्य सुरु आहे काय, असेच जाणवायला लागले आहे. यावर गांभीर्याने लक्ष द्यायला हवे.

तेल (प्रति किलो) मे २०२० मे २०२१

सोयाबीन ९० १६०

शेंगदाणा १४० १९०

करडई १६० २२०

पाम ८८ १३१

मोहरी ११८ १६४

तेलाच्या भावावर नियंत्रण गरजेचे

जिल्ह्यात कोरोणाने अनेक कामगारांचे रोजगार गेले तर कित्येक नागरिकांचे संसार उघड्यावर आले. खाद्यतेल हे जीवनावश्यक असून गेल्या काही दिवसापासून खाद्य तेलाचे भाव झपाट्याने वाढत आहेत. शेंगदाणे तेल, सूर्यफूल तेलाचे भाव सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. तेलाच्या भाववाढीमुळे सर्व खाद्यपदार्थांचे भाव वाढत असल्याने गोरगरीब जनता मेटाकुटीस आली आहे. तेल जीवनावश्यक असल्याने कितीही महाग झाले तरी घ्यावेच लागते. ग्रामीण भागातील दिवाबत्ती करण्याकरिता लागणारे राॅकेल बंद केल्यामुळे विद्युत पुरवठा अचानक खंडित झाला तर खाद्यतेलाचे दिवे घरात लावावे लागत आहेत. त्यामुळे तेलाचा वापर करावाच लागतो. खाद्यतेलाच्या भावावर सरकारने नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.