शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

पाच दिवसांच्या मुक्कामानंतर गोयल यांच्यावर परत जाण्याची नामुष्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:07 IST

परभणी : जिल्हाधिकारी म्हणून रुजू होण्यासाठी पाच दिवसांपूर्वी परभणीत दाखल झालेल्या आंचल गोयल यांना रुजू होताच परत जावे ...

परभणी : जिल्हाधिकारी म्हणून रुजू होण्यासाठी पाच दिवसांपूर्वी परभणीत दाखल झालेल्या आंचल गोयल यांना रुजू होताच परत जावे लागले आहे. प्रशासकीय क्षेत्रात वाढलेला राजकीय हस्तक्षेपच गोयल यांच्या नियुक्तीच्या आड आला असून, सोयीच्या अधिकाऱ्यासाठी मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेली ‘लुडबुड’ अखेर यशस्वी झाल्याची चर्चा आता जिल्ह्यात रंगत आहे.

जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर हे ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त होणार असल्याने १३ जुलै रोजी आंचल गोयल यांची परभणीच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याचे आदेश निघाले. मुंबई येथील महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालक असलेल्या आंचल गोयल या २०१४ च्या बॅचच्या आयएसएस अधिकारी असून, त्यांची जिल्हाधिकारी म्हणून ही पहिलीच नियुक्ती आहे. गोयल यांच्या नियुक्तीच्या आदेशानंतर राजकीय क्षेत्रातील काही जणांनी अन्य अधिकाऱ्यांची परभणी येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती व्हावी, यासाठी मुंबईत प्रयत्न सुरू केले. मात्र, अखेरपर्यंत यासंदर्भात कोणताही आदेश निघाला नाही. दरम्यान, परभणीत जिल्हाधिकारी म्हणून रुजू होण्यासाठी आंचल गोयल यादेखील २७ जुलै रोजीच परभणीत दाखल झाल्या. येथील सावली विश्रामगृहात पाच दिवस त्यांनी मुक्काम केला. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांचा सेवानिवृत्तीचा दिवसही जवळ आला. इकडे सेवानिवृत्तीचा कार्यक्रम सुरू असतानाच जिल्हाधिकारीपदाचा पदभार कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे देण्याचे आदेश मुंबईतून धडकले. त्यामुळे जिल्हाधिकारीपदाचा पदभार न स्वीकारताच आंचल गोयल यांना परत जावे लागले.

जिल्हाधिकारी राधिका रस्तोगी यांच्यानंतर तब्बल २० ते २५ वर्षांनंतर प्रथमच जिल्ह्याला गोयल यांच्या माध्यमातून महिला जिल्हाधिकारी मिळाल्या होत्या. मात्र, त्यांच्यावर पदभार न घेताच परतण्याची नामुष्की ओढवली आहे. गोयल यांना परत जावे लागल्याने आता जिल्ह्यात वेगवेगळ्या चर्चा आता रंगत आहेत.

ही नामुष्की कोणाची...?

नूतन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना रुजू न होताच परतावे लागल्याने नामुष्की ओढवली आहे. मात्र, ही नामुष्की कोणाची? परभणी जिल्ह्याची का राजकीय उदासीनतेची, असा प्रश्न आता निर्माण होत आहे. एका महिला अधिकाऱ्यास रुजू न होता परत जावे लागते, हे जिल्ह्याचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. या सर्व प्रकरणाने राज्यात जिल्ह्याची प्रतिमा कशी झाली? असा प्रश्नही यानिमित्ताने पुढे येत आहे.