शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

परभणीकरांना भेडसावणार टंचाई : राहटीतील पाणी संपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 12:28 AM

शहराला पाणीपुरवठा करणाºया राहटी बंधाºयातील पाणीसाठा सोमवारी सकाळी संपल्याने आता परभणी शहराला पाणीटंचाईला तोंड देण्याची वेळ आली आहे. महानगरपालिकेचे नियोजन नसल्याने हिवाळ्यातही शहरवासियांना टंचाईचे चटके सोसावे लागणार आहेत. विशेष म्हणजे एक महिन्यात पाणीसाठा संपण्याची ही दुसरी वेळ आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहराला पाणीपुरवठा करणाºया राहटी बंधाºयातील पाणीसाठा सोमवारी सकाळी संपल्याने आता परभणी शहराला पाणीटंचाईला तोंड देण्याची वेळ आली आहे. महानगरपालिकेचे नियोजन नसल्याने हिवाळ्यातही शहरवासियांना टंचाईचे चटके सोसावे लागणार आहेत. विशेष म्हणजे एक महिन्यात पाणीसाठा संपण्याची ही दुसरी वेळ आहे.परभणी शहराला राहटी येथील बंधाºयातून पाणीपुरवठा होतो. या बंधाºयात सिद्धेश्वर धरणामधून पाणी घेतले जाते. डिसेंबरमध्ये पहिल्याच आठवड्यात बंधाºयातील पाणी संपले होते, तेव्हा महानगरपालिकेने सिद्धेश्वर बंधाºयातून शहरासाठी पाण्याची मागणी नोंदविली. १ दलघमी पाणी राहटी बंधाºयात दाखल होईपर्यंत ३ दिवस शहरवासियांना निर्जळीचा सामना करावा लागला.राहटी बंधाºयात पाणी दाखल झाले खरे; परंतु, बंधाºयाचे गेट नादुरुस्त झाल्याने बंधाºयात आलेले अर्ध्याहून अधिक पाणी वाया गेले. पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणामुळे बंधाºयातील पाणी वाहून गेल्याने या अधिकाºयांनी तातडीने दुरुस्ती केली. परंतु, शहरवासियांसाठी केवळ अर्धेच पाणी शिल्लक राहिले. त्यानंतर १५ ते २० दिवसातच शहराला पाणीपुरवठा करणाºया राहटी बंधाºयातील पाण्याने तळ गाठण्यास सुरुवात केली. आज मात्र हा बंधारा कोरडाठाक पडला आहे.उन्हाळ्यात पाण्यासाठी धावपळ होणे सहाजीक आहे; परंतु, हिवाळ्यातच शहरवासियांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.बंधाºयातील पाणीसाठा कमी होत असताना पाणी उपलब्ध करुन घेण्यासंदर्भात महापालिकेकडून पाठपुरावा झाला नाही. बंधाºयातील पाणी संपण्यापूर्वीच या बंधाºयात पाणीसाठा करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक होते. परंतु, हे उपाय करताना महापालिका प्रशासन कमी पडले. सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास हा बंधारा पूर्णत: कोरडा झाला आहे. त्यामुळे बंधाºयातून पाणी उपसा करणारे विद्युतपंप दिवसभर बंद राहिले. परिणामी मंगळवारपासून शहरवासियांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.पाटबंधारे विभागाने दिला नकारराहटी बंधाºयात यापूर्वी दाखल झालेले पाणी पाटबंधारे विभागाच्या चुकीमुळे वाहून गेले होते. त्यामुळे सिद्धेश्वर येथून हे पाणी पुन्हा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागाची आहे. महानगरपालिकेने ही बाब जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार १५ दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाºयांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांना पत्र पाठवून वाहून गेलेल्या १ दलघमी पाण्याची मागणी केली. मात्र या विभागाने पाणीसाठा उपलब्ध नाही, असे कारण देऊन असमर्थता दर्शविली.निम्न दुधनाकडेही पाठपुरावापाटबंधारे विभागाने सिद्धेश्वर प्रकल्पातून पाणी देण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातून राहटी बंधाºयासाठी पाणी घेण्याचा पर्याय उपलब्ध होता. त्यासाठी महापालिकेने जिल्हाधिकाºयांकडे तशी मागणी नोंदविली. जिल्हाधिकाºयांनीही औरंगाबाद येथे या संदर्भात पत्र व्यवहार केल्याचे सांगण्यात आले.परंतु, राहटी बंधाºयातील पाणी संपले तरीही पर्यायी व्यवस्था झाली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे परभणीकरांना पाण्यासाठी धावपळ करावी लागते की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे.पाणीप्रश्नाकडे डोळेझाकशहरामध्ये मुलभूत सुविधा पुरविण्यासही मनपा प्रशासन कमी पडत आहे. अशी परिस्थिती असताना घरपट्टी, पाणीपट्टी दरवाढ केली जात आहे. एकीकडे सुविधा नाहीत, तर दुसरीकडे दरवाढ होत असल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. शहरासाठी पाणी उपलब्ध करणे ही मनपा प्रशासनाची जबाबदारी आहे; परंतु, प्रशासनाने पाणीप्रश्नाकडे डोळेझाक केल्याचे दिसत आहे. महापालिकेने शहरासाठी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून पत्र व्यवहार केला ही असेल. परंतु, मनपाचा पाठपुरावा कमी पडल्यानेच शहरवासियांना टंचाईचे चटके सोसावे लागणार आहेत.