शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

परभणी मनपाच्या दुर्लक्षामुळे वाढली पाण्याची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 11:33 PM

शहरामध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असताना महापालिकेने अद्यापही पर्यायी व्यवस्था उपलब्ध केली नसल्याने नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. शहरामध्ये पियाजो आॅटोरिक्षातून दररोज मोठ्या प्रमाणात पाण्याची विक्री सुरु झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरामध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असताना महापालिकेने अद्यापही पर्यायी व्यवस्था उपलब्ध केली नसल्याने नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. शहरामध्ये पियाजो आॅटोरिक्षातून दररोज मोठ्या प्रमाणात पाण्याची विक्री सुरु झाली आहे.उन्हाळ्यामध्ये दरवर्षी परभणी शहरातील ठराविक भागांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. राहटी येथील बंधाऱ्यातून शहरवासियांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र अनेक भागामध्ये या योजनेची जलवाहिनी पोहचलेली नाही. सहा महिन्यांपूर्वी काही भागात नव्याने जलवाहिनी टाकण्यात आली. मात्र या जलवाहिनीला मुख्य वाहिनीशी जोडले नसल्याने नागरिकांना पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. सद्यस्थितीला अनेक प्रभागांमध्ये टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत असली तरी महापालिकेकडून अद्यापही टँकर सुरु करण्यात आले नाहीत. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.नळ योजना उपलब्ध नसल्याने हातपंपावर भिस्त असलेल्या अनेक वसाहतींमधील नागरिक खाजगी व्यावसायिकांकडून पाणी विकत घेऊन दररोजची गुजराण करीत आहेत. पाण्याची मागणी वाढत चालल्याने खाजगी व्यावसायिकांचा व्यवसायही आता तेजीत आला आहे. शहरामध्ये ४० ते ५० खाजगी पियाजो आॅटोरिक्षांमधून शहरवासियांना पाणीपुरवठा केला जातो. या पियाजो आॅटोला मोटारपंप लावलेला असून १ हजार लिटरची टाकी दीडशे रुपयांना तर २ हजार लिटरची टाकी ३०० रुपयांना विक्री केली जात आहे.परभणी शहरात खाजगी विक्रेत्यांकडून पाण्याची विक्री सुरु झाली असून आगामी काळात ही परिस्थिती आणि गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खाजगी विक्रेत्यांचीही संख्याही वाढण्याची चिन्हे आहेत. दोन वर्षांपासून या खाजगी विक्रेत्यांना जलकुंभावरुन पाणी दिले जात नसल्याने शहर परिसरातील शेतांमधून पाणी आणून हे पाणी विक्री केले जात आहे. महापालिकेने वेळेत टँकर सुरु केले तर पाणीटंचाई शिथील होऊन नागरिकांना दिलासा मिळू शकतो. मात्र महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना पाणीटंचाई बरोबच आर्थिक भूर्दंडही सहन करावा लागत आहे.टंचाई निवारण्याची कामे ठप्प४शहरातील टंचाई दूर करण्यासाठी मनपाने जिल्हा प्रशासनाला कृती आराखडा सादर केला आहे. या आराखड्यास अद्याप मंजुरी मिळाली नसल्याने ही कामे ठप्प आहेत. शहरवासियांना टँकरने पाणीपुरवठा करणे, तात्पुरत्या स्वरुपात जलवाहिनी टाकून टंचाईग्रस्त भागात पाणी उपलब्ध करुन देणे, हातपंपाची दुरुस्ती, नवीन विंधन विहीर घेणे ही कामे अजूनही सुरु नाहीत. त्यामुळे पाणीटंचाईमध्ये भर पडली आहे. महापालिकेने जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करुन टंचाई निवारण्याच्या कामाला सुरुवात करण्याची गरज निर्माण झाली आहे.४टंचाई निवारणाचा निधी उपलब्ध नसल्याने कामे ठप्प असली तरी जलवाहिनीची गळती रोखण्याचे काम महापालिका हाती घेऊ शकते; परंतु, प्रत्येक आवर्तनाच्या वेळी हजारो लिटर पाणी वाया जात असताना मनपाकडून जलवाहिनीच्या गळती, दुरुस्तीची कामे केली जात नसल्याने टंचाईत भर पडत आहे.नळयोजना पडली अपुरी४शहराला राहटी येथील बंधाऱ्यातून पाणीपुरवठा केला जातो. ही योजना ३० वर्षापूर्वीची जुनी आहे. सध्या शहराची लोकसंख्या दुप्पटीने वाढली आहे. तरीही याच योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे शहराच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचते करताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय वाढत आहे. तसेच सद्यस्थितीला १२ ते १३ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने शहरामध्ये पाणीटंचाई वाढली आहे.मनपाच्या टँकरने पाणी पुरवठा४शहरामध्ये महापालिकेने मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला नसला तरी मनपाच्या टँकरने पाणी विकत दिले जात आहे. शहरातील प्रभावती नगर येथील जलकुंभावरुन खाजगी विक्रेत्यांना पाणी दिले जात नाही, अशी माहिती देण्यात आली. मात्र दररोज चार ते पाच टँकर महापालिकेची नियमानुसार असलेली रक्कम भरुन टँकरने पाणी नेत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे मनपाने मोफत पाणीपुरवठा सुरु केला नसला तरी टँकरच्या सहाय्याने पैसे भरुन पाणी दिले जात असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीParbhani Municipal Corporationपरभणी महानगरपालिका