शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

परतीच्या पावसाचा फटका; कापसाच्या वाती अन् सोयाबीनची माती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 7:03 PM

Return rain hits Parabhani : परतीच्या पावसाने नद्या-नाल्यांना पूर आला होता. यामुळेही जिल्ह्यात पिकांची अतोनात हानी झाली.

ठळक मुद्देरबी पेरणीसाठी अडचणीपुराचे पाणी शेतात शिरल्याने हानी

परभणी : परतीच्या पावसाने परभणी जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचा कापूस तुटलेला होता. या फुटलेल्या कापसाच्या अक्षरशः वाती झाल्या आहेत. तसेच काढून ठेवलेल्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. 

परतीच्या पावसाने नद्या-नाल्यांना पूर आला होता. यामुळेही जिल्ह्यात पिकांची अतोनात हानी झाली. मागील पंधरा दिवसापूर्वी परभणीसह जिल्ह्यात  पाऊस धो-धो बरसला.  या पावसामुळे जिल्ह्यातील ४६ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचे अद्यापही संपूर्ण पंचनामे झाले नाहीत, तोच आता परतीच्या पावसाने  धुमाकूळ घातला आहे. या पावसाने कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः उघडीप दिल्यानंतर कापूस मोठ्या प्रमाणात फुटला होता. काही शेतकऱ्यांनी कापसाची वेचणी केली असली तरी बहुतांश शेतकऱ्यांची कापसाची वेचणी राहिली होती. या पावसाने फुटलेल्या कापसाच्या वाती झाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. सोयाबीनचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून ठेवले आहे. अनेकांची काढणी सुरू आहे. मात्र परतीच्या पावसाने सोयाबीन पूर्णतः भिजली आहे. पाथरी, सेलू, मानवत, पूर्णा, परभणीसह अन्य तालुक्यातील नदी-नाल्यांना पाणी आले होते. सर्वच ठिकाणच्या नद्या तुडुंब वाहत आहेत. नद्यांना आलेल्या पुरामुळे जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

पुराचे पाणी शेतात शिरल्याने हानीनदीकाठच्या शेतशिवारात पुराचे पाणी पिकांमध्ये साचून राहिल्याने पिके पिवळी पडली आहेत. त्यामुळे उत्पन्नात मोठी घट होणार आहे. तसेच सोयाबीनला डाग पडल्याने भावही अपेक्षेप्रमाणे मिळत नाही. त्यामुळे शेतकरी हैराण आहेत.

रब्बी अडचणीत खरिपाच्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हाती काहीच पडले नाही. त्यामुळे रब्बीची पेरणी कशी करावी? हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस