शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

पूर्णा तालुक्यात २२ टक्के पाणी नमुने दूषित, साथरोगाचा धोका वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 15:36 IST

22% water samples were contaminated जिल्हा प्रयोगशाळेच्या मुख्य अनुजीव शास्त्रज्ञांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणी नमुन्यांची तपासणी केली आहे.

परभणी : पूर्णा तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचे २२ टक्के नमुने दूषित आढळले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात या गावांमध्ये साथरोग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यातील पाणी नमुन्यांचे तपासून केली जाते. 

जिल्हा प्रयोगशाळेच्या मुख्य अनुजीव शास्त्रज्ञांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणी नमुन्यांची तपासणी केली आहे. या तपासणीमध्ये जिल्ह्यात १०.६७ टक्के पाण्याचे नमुने दूषित असल्याचा अहवाल दिला आहे. पूर्णा तालुक्‍यात सर्वाधिक २२ टक्के नमुने दूषित आढळले आहे. तर परभणी तालुक्यात १२ टक्के, गंगाखेड १२, सोनपेठ १४, मानवत ७, जिंतूर ७ आणि पाथरी तालुक्यात १३ टक्के नमुने दूषित आढळले आहेत. विशेष म्हणजे, सोनपेठ आणि सेलू या दोन तालुक्यांमध्ये एकही पाणी नमुना दूषित आढळला नाही. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलस्त्रोतांच्या पाण्याची ही तपासणी करण्यात आली. त्यामध्ये दूषित नमुने आढळलेल्या गावांमध्ये ग्रामपंचायतींनी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. पावसाळ्यामध्ये टायफाईड, कॉलरा, कावीळ, मलेरिया असे साथीचे आजार दूषित पाण्यामुळे होऊ शकतात. 

जलशुद्धीकरण यावर भर द्या टाकसाळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी ग्रामपंचायतींच्या पाणी नमुन्यांचा नुकताच आढावा घेतला. दूषित पाणी नमुने असलेल्या ग्रामपंचायतींनी पाणी शुद्ध करण्यासाठी काळजी घ्यावी, दहा टक्के पेक्षा अधिक पाणी नमुने दूषित असलेल्या ग्रामपंचायतींनी टीसीएल पावडरचा वापर करावा व पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना शिवानंद टाकसाळे यांनी दिल्या आहेत.

टॅग्स :Waterपाणीparabhaniपरभणी