शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

केंद्र शासनाच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर लागेना खरेदीचा मुहूर्त; कवडीमोल दराने शेतमालाची विक्री करावी लागल्याने शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 13:52 IST

केंद्र शासनाकडून किमान आधारभूत दराने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केल्याचे जाहीर करून १० दिवस उलटले. परंतु, मानवत येथील केंद्रावर अद्याप खरेदीचा मुहूर्त लागला नसल्याने शेतक-यांना अल्पदरात आपला शेतमाल विकावा लागत आहे.

ठळक मुद्देहमीभावाने शेतमाल विक्री करण्यासाठी खरेदी विक्री संघाकडे आॅनलाईन नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. हमी भावापेक्षा खाजगी व्यापा-यांकडे कमी भाव मिळत आहे. परंतु, नाईलाजास्तव शेतक-यांना आपला शेतमाल विकावा लागत आहे.

मानवत (परभणी ) : केंद्र शासनाकडून किमान आधारभूत दराने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केल्याचे जाहीर करून १० दिवस उलटले. परंतु, मानवत येथील केंद्रावर अद्याप खरेदीचा मुहूर्त लागला नसल्याने शेतक-यांना अल्पदरात आपला शेतमाल विकावा लागत आहे. त्यामुळे तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतक-यांचे कंबरडे मोडले आहे.  

केंद्र शासनाने मूग, सोयाबीनचे हमीभाव जाहीर केले. हमीभावाने शेतमाल विक्री करण्यासाठी खरेदी विक्री संघाकडे आॅनलाईन नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. आतापर्यंत १७२ शेतक-यांनी नोंदणी केली असली तरी आर्द्रता जास्त असल्याने एकाही शेतक-याचा माल खरेदी केला नसल्याची माहिती मिळाली. शासनाकडून शेतक-यांना हमीभावाची शाश्वती दिली जात असली तरी प्रत्यक्षात खरेदी केंद्रावर खरेदी करताना अनेक अटी, निकषाचे ओझे शेतक-याच्या खाद्यांवर टाकले जात आहे. आपला माल विक्री केल्यानंतरही चुका-यासाठी तीन-तीन महिने ताटकळत रहावे लागत असल्याचा अनुभव शेतक-यांच्या पाठिशी आहे. 

एकीकडे जाचक अटींची पूर्तता करून नाकीनऊ आलेल्या शेतक-यांना नाफेडची खरेदी सुरू न झाल्याने खाजगी व्यापा-यांकडे मिळेल त्या भावात आपला माल विक्री करून मोकळे व्हावे लागत आहे. मूग, सोयाबीनची हमी भावात खरेदी सुरू न झाल्याने दीवाळी अंधारात काढणा-या शेतक-यांनी सोमवारपासून आपला माल बाजारात आणण्यास सुरुवात केली असली तरी हमी भावापेक्षा खाजगी व्यापा-यांकडे कमी भाव मिळत आहे. परंतु, नाईलाजास्तव शेतक-यांना आपला शेतमाल विकावा लागत आहे.

शेतक-यांना या आर्थिक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी पुढे आड, मागे विहीर दिसू लागल्याने अनेक शेतक-यांनी सरकारच्या जाचक अटीत अडकायला नको म्हणून खाजगी व्यापा-यांकडे आपला माल खाली केला आहे. दहा वर्षापासूनचा शेती व्यवसाय आणि त्यापासून मिळणा-या उत्पादनाची तुलना केल्यास शेती सर्वात तोट्याचा व्यवसाय ठरत आहे. शेतीसाठी लागणारी औजारे, निविष्ठा यांचा खर्च दुपटीने वाढत असून शेतीमालाचा भाव घटत आहे. तालुक्यात सोयाबीन उत्पादनाचा विचार केल्यास शेतकºयाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. २००८ च्या तुलनेत सध्या सोयाबीन उत्पादनासाठी चौपट खच येत आहे. उत्पन्न निम्यावर आले आहे. 

सोयाबीनसाठी एकरी : येणारा खर्चशेती कामासाठी येणा-या खर्चामध्ये दहा वर्षात मोठी वाढ झाली आहे. यामध्ये नांगरवटी, वखरणीसाठी २००८ या वर्षात २५० रुपये एवढा भाव होता. सध्या १ हजार रुपये एवढा भाव झाला आहे. रोटावेटरसाठी सध्या ५००, बियाणे २००८ साली ६०० रुपये तर सध्या २२०० रुपये तर पेरणी १०० रुपये तर सध्या ५०० रुपये, बीज प्रक्रिया १०० रुपये, तणनाशक दहा वर्षापूर्वी १००० रुपये, सध्या १ हजार रुपये, बुरर्शी नाशक ४०० ते ६००, फवारणी १०० ते ५००, कापणी ५०० ते २०००, काढणीसाठी ६० रुपये ते ९०० रुपये, बारदाना, वाहतूक, मजुरी १०० ते ५५० अशी वाढ झाली आहे. २००८ साली एक एकर सोयाबीनसाठी ३ हजार ५६० रुपये एवढा खर्च येत होता. तो सध्या ११ हजार रुपयांवर येऊन ठेपला आहे. परंतु, शेतक-यांच्या शेतीमालाच्या हमी भावात खर्चाच्या तुलनेत अपेक्षेप्रमाणे वाढ झाल्याचे दिसून येत नाही. शेतक-यांना आर्थिक फटका बसू नये, म्हणून हमी भाव खरेदी केंद्रावर खरेदी सुरू करण्याची मागणी शेतक-यांकडून केली जात आहे.

सोयाबीनच्या भावातील फरकवर्ष                    हमीभाव             प्रत्यक्ष बाजारभाव२००८-२००९        १३९०             १८०० ते २६००२००९-२०१०        १३१०              २००० ते २७००२०१०-२०११        १४४०              २१०० ते २८००२०११-२०१२        १६९०              २४०० ते ५०००२०१२-२०१३        २२४०            २३०० ते २५००२०१३-२०१४        २५६०            २४५०ते ३७००२०१४-२०१५        २५६०            २४०० ते ३३००२०१५-२०१६        २६००             १८०० ते २८००२०१६-२०१७        २७७५           १६०० ते २५००२०१७-२०१८        ३०५०            १६०० ते २५००

टॅग्स :Farmerशेतकरी