शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

केंद्र शासनाच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर लागेना खरेदीचा मुहूर्त; कवडीमोल दराने शेतमालाची विक्री करावी लागल्याने शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 13:52 IST

केंद्र शासनाकडून किमान आधारभूत दराने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केल्याचे जाहीर करून १० दिवस उलटले. परंतु, मानवत येथील केंद्रावर अद्याप खरेदीचा मुहूर्त लागला नसल्याने शेतक-यांना अल्पदरात आपला शेतमाल विकावा लागत आहे.

ठळक मुद्देहमीभावाने शेतमाल विक्री करण्यासाठी खरेदी विक्री संघाकडे आॅनलाईन नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. हमी भावापेक्षा खाजगी व्यापा-यांकडे कमी भाव मिळत आहे. परंतु, नाईलाजास्तव शेतक-यांना आपला शेतमाल विकावा लागत आहे.

मानवत (परभणी ) : केंद्र शासनाकडून किमान आधारभूत दराने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केल्याचे जाहीर करून १० दिवस उलटले. परंतु, मानवत येथील केंद्रावर अद्याप खरेदीचा मुहूर्त लागला नसल्याने शेतक-यांना अल्पदरात आपला शेतमाल विकावा लागत आहे. त्यामुळे तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतक-यांचे कंबरडे मोडले आहे.  

केंद्र शासनाने मूग, सोयाबीनचे हमीभाव जाहीर केले. हमीभावाने शेतमाल विक्री करण्यासाठी खरेदी विक्री संघाकडे आॅनलाईन नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. आतापर्यंत १७२ शेतक-यांनी नोंदणी केली असली तरी आर्द्रता जास्त असल्याने एकाही शेतक-याचा माल खरेदी केला नसल्याची माहिती मिळाली. शासनाकडून शेतक-यांना हमीभावाची शाश्वती दिली जात असली तरी प्रत्यक्षात खरेदी केंद्रावर खरेदी करताना अनेक अटी, निकषाचे ओझे शेतक-याच्या खाद्यांवर टाकले जात आहे. आपला माल विक्री केल्यानंतरही चुका-यासाठी तीन-तीन महिने ताटकळत रहावे लागत असल्याचा अनुभव शेतक-यांच्या पाठिशी आहे. 

एकीकडे जाचक अटींची पूर्तता करून नाकीनऊ आलेल्या शेतक-यांना नाफेडची खरेदी सुरू न झाल्याने खाजगी व्यापा-यांकडे मिळेल त्या भावात आपला माल विक्री करून मोकळे व्हावे लागत आहे. मूग, सोयाबीनची हमी भावात खरेदी सुरू न झाल्याने दीवाळी अंधारात काढणा-या शेतक-यांनी सोमवारपासून आपला माल बाजारात आणण्यास सुरुवात केली असली तरी हमी भावापेक्षा खाजगी व्यापा-यांकडे कमी भाव मिळत आहे. परंतु, नाईलाजास्तव शेतक-यांना आपला शेतमाल विकावा लागत आहे.

शेतक-यांना या आर्थिक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी पुढे आड, मागे विहीर दिसू लागल्याने अनेक शेतक-यांनी सरकारच्या जाचक अटीत अडकायला नको म्हणून खाजगी व्यापा-यांकडे आपला माल खाली केला आहे. दहा वर्षापासूनचा शेती व्यवसाय आणि त्यापासून मिळणा-या उत्पादनाची तुलना केल्यास शेती सर्वात तोट्याचा व्यवसाय ठरत आहे. शेतीसाठी लागणारी औजारे, निविष्ठा यांचा खर्च दुपटीने वाढत असून शेतीमालाचा भाव घटत आहे. तालुक्यात सोयाबीन उत्पादनाचा विचार केल्यास शेतकºयाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. २००८ च्या तुलनेत सध्या सोयाबीन उत्पादनासाठी चौपट खच येत आहे. उत्पन्न निम्यावर आले आहे. 

सोयाबीनसाठी एकरी : येणारा खर्चशेती कामासाठी येणा-या खर्चामध्ये दहा वर्षात मोठी वाढ झाली आहे. यामध्ये नांगरवटी, वखरणीसाठी २००८ या वर्षात २५० रुपये एवढा भाव होता. सध्या १ हजार रुपये एवढा भाव झाला आहे. रोटावेटरसाठी सध्या ५००, बियाणे २००८ साली ६०० रुपये तर सध्या २२०० रुपये तर पेरणी १०० रुपये तर सध्या ५०० रुपये, बीज प्रक्रिया १०० रुपये, तणनाशक दहा वर्षापूर्वी १००० रुपये, सध्या १ हजार रुपये, बुरर्शी नाशक ४०० ते ६००, फवारणी १०० ते ५००, कापणी ५०० ते २०००, काढणीसाठी ६० रुपये ते ९०० रुपये, बारदाना, वाहतूक, मजुरी १०० ते ५५० अशी वाढ झाली आहे. २००८ साली एक एकर सोयाबीनसाठी ३ हजार ५६० रुपये एवढा खर्च येत होता. तो सध्या ११ हजार रुपयांवर येऊन ठेपला आहे. परंतु, शेतक-यांच्या शेतीमालाच्या हमी भावात खर्चाच्या तुलनेत अपेक्षेप्रमाणे वाढ झाल्याचे दिसून येत नाही. शेतक-यांना आर्थिक फटका बसू नये, म्हणून हमी भाव खरेदी केंद्रावर खरेदी सुरू करण्याची मागणी शेतक-यांकडून केली जात आहे.

सोयाबीनच्या भावातील फरकवर्ष                    हमीभाव             प्रत्यक्ष बाजारभाव२००८-२००९        १३९०             १८०० ते २६००२००९-२०१०        १३१०              २००० ते २७००२०१०-२०११        १४४०              २१०० ते २८००२०११-२०१२        १६९०              २४०० ते ५०००२०१२-२०१३        २२४०            २३०० ते २५००२०१३-२०१४        २५६०            २४५०ते ३७००२०१४-२०१५        २५६०            २४०० ते ३३००२०१५-२०१६        २६००             १८०० ते २८००२०१६-२०१७        २७७५           १६०० ते २५००२०१७-२०१८        ३०५०            १६०० ते २५००

टॅग्स :Farmerशेतकरी