शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र शासनाच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर लागेना खरेदीचा मुहूर्त; कवडीमोल दराने शेतमालाची विक्री करावी लागल्याने शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 13:52 IST

केंद्र शासनाकडून किमान आधारभूत दराने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केल्याचे जाहीर करून १० दिवस उलटले. परंतु, मानवत येथील केंद्रावर अद्याप खरेदीचा मुहूर्त लागला नसल्याने शेतक-यांना अल्पदरात आपला शेतमाल विकावा लागत आहे.

ठळक मुद्देहमीभावाने शेतमाल विक्री करण्यासाठी खरेदी विक्री संघाकडे आॅनलाईन नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. हमी भावापेक्षा खाजगी व्यापा-यांकडे कमी भाव मिळत आहे. परंतु, नाईलाजास्तव शेतक-यांना आपला शेतमाल विकावा लागत आहे.

मानवत (परभणी ) : केंद्र शासनाकडून किमान आधारभूत दराने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केल्याचे जाहीर करून १० दिवस उलटले. परंतु, मानवत येथील केंद्रावर अद्याप खरेदीचा मुहूर्त लागला नसल्याने शेतक-यांना अल्पदरात आपला शेतमाल विकावा लागत आहे. त्यामुळे तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतक-यांचे कंबरडे मोडले आहे.  

केंद्र शासनाने मूग, सोयाबीनचे हमीभाव जाहीर केले. हमीभावाने शेतमाल विक्री करण्यासाठी खरेदी विक्री संघाकडे आॅनलाईन नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. आतापर्यंत १७२ शेतक-यांनी नोंदणी केली असली तरी आर्द्रता जास्त असल्याने एकाही शेतक-याचा माल खरेदी केला नसल्याची माहिती मिळाली. शासनाकडून शेतक-यांना हमीभावाची शाश्वती दिली जात असली तरी प्रत्यक्षात खरेदी केंद्रावर खरेदी करताना अनेक अटी, निकषाचे ओझे शेतक-याच्या खाद्यांवर टाकले जात आहे. आपला माल विक्री केल्यानंतरही चुका-यासाठी तीन-तीन महिने ताटकळत रहावे लागत असल्याचा अनुभव शेतक-यांच्या पाठिशी आहे. 

एकीकडे जाचक अटींची पूर्तता करून नाकीनऊ आलेल्या शेतक-यांना नाफेडची खरेदी सुरू न झाल्याने खाजगी व्यापा-यांकडे मिळेल त्या भावात आपला माल विक्री करून मोकळे व्हावे लागत आहे. मूग, सोयाबीनची हमी भावात खरेदी सुरू न झाल्याने दीवाळी अंधारात काढणा-या शेतक-यांनी सोमवारपासून आपला माल बाजारात आणण्यास सुरुवात केली असली तरी हमी भावापेक्षा खाजगी व्यापा-यांकडे कमी भाव मिळत आहे. परंतु, नाईलाजास्तव शेतक-यांना आपला शेतमाल विकावा लागत आहे.

शेतक-यांना या आर्थिक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी पुढे आड, मागे विहीर दिसू लागल्याने अनेक शेतक-यांनी सरकारच्या जाचक अटीत अडकायला नको म्हणून खाजगी व्यापा-यांकडे आपला माल खाली केला आहे. दहा वर्षापासूनचा शेती व्यवसाय आणि त्यापासून मिळणा-या उत्पादनाची तुलना केल्यास शेती सर्वात तोट्याचा व्यवसाय ठरत आहे. शेतीसाठी लागणारी औजारे, निविष्ठा यांचा खर्च दुपटीने वाढत असून शेतीमालाचा भाव घटत आहे. तालुक्यात सोयाबीन उत्पादनाचा विचार केल्यास शेतकºयाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. २००८ च्या तुलनेत सध्या सोयाबीन उत्पादनासाठी चौपट खच येत आहे. उत्पन्न निम्यावर आले आहे. 

सोयाबीनसाठी एकरी : येणारा खर्चशेती कामासाठी येणा-या खर्चामध्ये दहा वर्षात मोठी वाढ झाली आहे. यामध्ये नांगरवटी, वखरणीसाठी २००८ या वर्षात २५० रुपये एवढा भाव होता. सध्या १ हजार रुपये एवढा भाव झाला आहे. रोटावेटरसाठी सध्या ५००, बियाणे २००८ साली ६०० रुपये तर सध्या २२०० रुपये तर पेरणी १०० रुपये तर सध्या ५०० रुपये, बीज प्रक्रिया १०० रुपये, तणनाशक दहा वर्षापूर्वी १००० रुपये, सध्या १ हजार रुपये, बुरर्शी नाशक ४०० ते ६००, फवारणी १०० ते ५००, कापणी ५०० ते २०००, काढणीसाठी ६० रुपये ते ९०० रुपये, बारदाना, वाहतूक, मजुरी १०० ते ५५० अशी वाढ झाली आहे. २००८ साली एक एकर सोयाबीनसाठी ३ हजार ५६० रुपये एवढा खर्च येत होता. तो सध्या ११ हजार रुपयांवर येऊन ठेपला आहे. परंतु, शेतक-यांच्या शेतीमालाच्या हमी भावात खर्चाच्या तुलनेत अपेक्षेप्रमाणे वाढ झाल्याचे दिसून येत नाही. शेतक-यांना आर्थिक फटका बसू नये, म्हणून हमी भाव खरेदी केंद्रावर खरेदी सुरू करण्याची मागणी शेतक-यांकडून केली जात आहे.

सोयाबीनच्या भावातील फरकवर्ष                    हमीभाव             प्रत्यक्ष बाजारभाव२००८-२००९        १३९०             १८०० ते २६००२००९-२०१०        १३१०              २००० ते २७००२०१०-२०११        १४४०              २१०० ते २८००२०११-२०१२        १६९०              २४०० ते ५०००२०१२-२०१३        २२४०            २३०० ते २५००२०१३-२०१४        २५६०            २४५०ते ३७००२०१४-२०१५        २५६०            २४०० ते ३३००२०१५-२०१६        २६००             १८०० ते २८००२०१६-२०१७        २७७५           १६०० ते २५००२०१७-२०१८        ३०५०            १६०० ते २५००

टॅग्स :Farmerशेतकरी