शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
3
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
4
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
5
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
6
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
7
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
8
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
9
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
10
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
11
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
12
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
13
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
14
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

परभणी जिल्ह्यात पावसाची रिपरिप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 12:15 AM

जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून भिज पावसाला सुरुवात झाली असून, सर्वदूर होत असलेल्या या पावसामुळे जिल्ह्याची भूजल पातळी वाढून काही प्रमाणात पाणी समस्येपासून दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून भिज पावसाला सुरुवात झाली असून, सर्वदूर होत असलेल्या या पावसामुळे जिल्ह्याची भूजल पातळी वाढून काही प्रमाणात पाणी समस्येपासून दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.दीड महिन्याच्या खंडानंतर शुक्रवारपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. शुक्रवारी व शनिवारी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील पिकांना दिलासा मिळाला होता. पावसाअभावी माना टाकत असणारी पिके या पावसाने तरारली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जिवात जिव पडला. या पावसाने बळीराजा सुखावला तरी पाण्याचा प्रश्न मात्र कायम आहे. त्यामुळे जिल्हावासियांना पाणी टंचाईची धास्ती लागून राहिली आहे. सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण असले तरी पाऊस बरसला नाही. त्यामुळे मंगळवारी पाऊस होतो की नाही, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र सोमवारी मध्यरात्रीपासूनच वातावरणात बदल झाला. परभणी शहर व परिसरात सकाळी रिमझिम पावसाला सुरुवात झाली. कधी मध्यम स्वरुपाचा तर कधी रिमझीम पाऊस बरसत राहिला. या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणीच पाणी साचले आहे.परभणी शहराबरोबरच गंगाखेड तालुक्यातही सोमवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळपासून रिमझिम पाऊस होत असून, शहरातील रस्ते चिखलमय झाले आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यांत पाणी साचल्याने वाहनधारक, पादचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे.मानवत, पाथरी, सेलू, जिंतूर, पालम, पूर्णा या तालुक्यांतही दिवसभर रिमझिम पाऊस झाला. एकंदर मंगळवारी झालेल्या भिज पावसामुळे जिल्ह्यातील भूजल पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही दिवस का होईना; पाण्याची समस्या मिटण्याची आशा जिल्हावासियांना आहे.चोवीस तासांत : सरसरी ३.२६ मि.मी. पावसाची झाली नोंद४मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी ३.२६ मि.मी. पाऊस झाला. परभणी तालुक्यात २.५१ मि.मी., पालम ४.६७, पूर्णा: ३.२०, गंगाखेड : ५.७५, सोनपेठ : ४, सेलू : २, पाथरी: २.३३, जिंतूर : १.१७ आणि मानवत तालुक्यात ३.६७ मि.मी. पाऊस झाला आहे.४जिल्ह्यात आतापर्यंत १८१.८७ मि.मी. पाऊस झाला असून, मानवत तालुक्यात सर्वाधिक २३३ मि.मी. आणि पालम तालुक्यात सर्वात कमी १४८ मि.मी. पाऊस झाला आहे. त्याचप्रमाणे परभणी तालुक्यात १५९ मि.मी, पूर्णा : २०५, गंगाखेड १७१, सोनपठ : १८९, सेलू : १५८, पाथरी : १७६ आणि जिंतूर तालुक्यात १९३ मि.मी. पाऊस झाला आहे.नदी, नाले, प्रकल्प कोरडेठाकच !४परभणी जिल्ह्यात मंगळवारी सकाळी रिमझिम पावसाने हजेरी लावली असली तरी जिल्ह्यातील गोदावरी, पूर्णा या नद्या कोरड्याठाक आहेत.४या नद्यांमध्ये अद्याप पाणीच दाखल झाले नाही. त्याचप्रमाणे सर्व प्रकल्प कोरडेठाक असल्याने जिल्हावासियांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसFarmerशेतकरी