शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

परभणी : गतवर्षीच्या तुलनेत दुप्पटीने वाढला जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 23:38 IST

यावर्षी परतीच्या पावसाने जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे़ मागील वर्षी आॅक्टोबर महिन्यातील पाणीसाठ्याच्या तुलनेत यंदा प्रकल्पांमध्ये दुप्पटीने वाढ झाली आहे़ त्यामुळे संभाव्य पाणीटंचाईचे संकट शिथील झाले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : यावर्षी परतीच्या पावसाने जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे़ मागील वर्षी आॅक्टोबर महिन्यातील पाणीसाठ्याच्या तुलनेत यंदा प्रकल्पांमध्ये दुप्पटीने वाढ झाली आहे़ त्यामुळे संभाव्य पाणीटंचाईचे संकट शिथील झाले आहे़जिल्ह्यात येलदरी, निम्न दुधना या दोन प्रमुख प्रकल्पांसह दोन मध्यम प्रकल्प आणि २२ लघु प्रकल्पांतून पिकांच्या सिंचनाचा भार उचलला जातो़ याशिवाय उन्हाळ्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या संकटावर हे प्रकल्पच मात करतात़ मात्र मागील तीन वर्षापासून समाधानकारक पाऊस होत नसल्याने प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झाला नव्हता़ परिणामी दरवर्षी उन्हाळ्यात नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागत असे़ यावर्षी देखील सुरुवातीच्या काळात अत्यल्प पाऊस झाला़ त्यात प्रकल्पांमध्ये थोडाही पाणीसाठा जमा झाला नव्हता़ मात्र आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने प्रकल्पांची स्थिती पालटून टाकली आहे़ सप्टेंबर महिन्यापर्यंत कोरडेठाक असलेले प्रकल्प आॅक्टोबर महिन्यातील पावसाने मात्र १०० टक्के भरले आहेत़ विशेष म्हणजे, येलदरी प्रकल्प १०० टक्के भरल्याने परभणीसह हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांचा पाणीप्रश्न मिटला आहे़ त्याचबरोबर लघु प्रकल्पांमध्येही समाधानकारक पाणीसाठा झाला आहे़ जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प तुडुंब भरले आहेत़ परिणामी सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे़मागील वर्षी आॅक्टोबर महिन्यात याच प्रकल्पांमध्ये थोडा बहुत पाणीसाठा शिल्लक होता़ मागील वर्षीच्या आॅक्टोबरमध्ये येलदरी प्रकल्पात केवळ ८ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता़ तर निम्न दुधना प्रकल्पामध्ये १५़२६ टक्के, झरी तलावात ८६ टक्के, करपरा मध्यम प्रकल्पात ५५ टक्के, डिग्रस बंधाऱ्यात ५० टक्के आणि मुदगल बंधाºयामध्ये ३२ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता़ विशेष म्हणजे मुळी, ढालेगाव आणि गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्प चक्क कोरडेठाक होते़ यावर्षी ही परिस्थिती बदलली असून, येलदरीसह मासोळी, मुदगल आणि ढालेगाव बंधारा १०० टक्के भरला आहे़ तर निम्न दुधना प्रकल्पात सद्यस्थितीला १३़ ३५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे़ झरीच्या तलावात ९३ टक्के, करपरा मध्यम प्रकल्पात ८४ टक्के, डिग्रस बंधाºयात ८१़३४ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे़ त्यामुळे यावर्षी जिल्ह्यातील प्रकल्पांतील पाणीसाठ्याने संभाव्य पाणीटंचाईचे संकट निभावले आहे़उदासीनतेमुळे मुळी बंधारा कोरडा४यावर्षी जायकवाडी प्रकल्पासह मराठवाड्यातील प्रमुख प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे़ जायकवाडी प्रकल्पाचे पाणी अनेक वेळा गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आले़ या पाण्यामुळे जिल्ह्यातील गोदावरी नदीवर बांधलेले सर्व बंधारे पाण्याने तुडुंब भरले़ मात्र याच नदीवर गंगाखेड तालुक्यात बांधलेला मुळी बंधारा अजूनही कोरडा आहे़४सद्यस्थितीला या बंधाºयात केवळ ९़४४ टक्के पाणीसाठा आहे़ मुळी बंधाºयाचे दरवाजे २०१६ मध्ये आलेल्या पुराच्या पाण्याने वाहून गेले होते़ तेव्हापासून जलसंपदा विभागाने या बंधाºयाला दरवाजे बसविले नाहीत़ मुळी बंधाºयाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी अनेक वेळा आंदोलने केली़ प्रशासनाकडे पाठपुरावा केला; परंतु, प्रशासनाने मात्र दखल घेतली नाही़४परिणामी येथील ग्रामस्थांना सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे़ या बंधाºयात पाणीसाठा झाला असता तर गंगाखेड शहराच्या पाणी प्रश्नांबरोबरच हजारो हेक्टरवरील शेत जमीन सिंचनाखाली आली असती़ मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शेतकºयांना फटका सहन करावा लागत आहे़ ं‘येलदरी’ने तीन जिल्ह्यांना तारले४सहा वर्षांपासून येलदरी प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा होत नसल्याने परभणीसह नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उन्हाळ्यात गंभीर होत होता़ मागील वर्षी परभणी शहराला येलदरी प्रकल्पाच्या मृतसाठ्यातून पाणीपुरवठा करण्यात आला़४या प्रकल्पात पाणी नसल्याने चिंता वाढल्या होत्या़ मात्र आॅक्टोबर महिन्यात बुलडाणा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा फायदा या प्रकल्पाला झाला आहे़ या प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा झाला असून, या प्रकल्पावर अवलंबनू असलेला सिद्धेश्वर प्रकल्पही ९४़३३ टक्के भरला आहे़ परिणामी, तिन्ही जिल्ह्यांतील पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मिटला आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पDamधरण