शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : भर दुष्काळात बारवात चार फुटावर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 23:47 IST

तालुक्यात दुष्काळामुळे ग्रामस्थ पाण्यासाठी भटकंती करीत असताना शहरातील मन्नाथ मंदिरातील पुरातन बारवामध्ये ४ फुटावर पाणी आहे़ त्यामुळे दुष्काळी परिस्थितीमध्ये ही बारव नागरिकांसाठी आशेचा किरण ठरत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): तालुक्यात दुष्काळामुळे ग्रामस्थ पाण्यासाठी भटकंती करीत असताना शहरातील मन्नाथ मंदिरातील पुरातन बारवामध्ये ४ फुटावर पाणी आहे़ त्यामुळे दुष्काळी परिस्थितीमध्ये ही बारव नागरिकांसाठी आशेचा किरण ठरत आहे़गोदावरी नदीच्या वास्तव्याने गंगाखेड तालुका सुजलाम सुफलाम झाला आहे़ तालुक्यात नदीचे पात्र वाहत असल्याने एकेकाळी बारमाही पाणी उपलब्ध असायचे; परंतु, परिस्थिती बदलली आणि सद्यस्थितीला अभावानेच गोदावरी वाहती दिसू लागली़ याचा परिणाम तालुक्यातील विहिरी आणि इतर ओढ्या नाल्यांवरही झाला़ दिवसेंदिवस पाणी पातळी खालावत गेली़ सद्यस्थितीला तर तालुक्यात दुष्काळ निर्माण झाला आहे़ मोठे तलाव, प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत़ अशा भिषण दुष्काळी परिस्थितीत शहरापासून जवळच असलेल्या श्रीक्षेत्र मन्नाथ मंदिर येथील पुरातन शिवलिंगाचा आकार असलेली बारव सध्या नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे़ कारण इतर विहिरींनी तळ गाठला असताना या बारवात चार फुटावर पाणी आहे़ डोंगरी भागात जाणाऱ्या कोद्री रस्त्यावर मरगळवाडी शिवारात डोंगराच्या पायथ्याला श्रीक्षेत्र मन्नाथ मंदिर वसले आहे़ पुरातन कालीन दगडी बांधकाम असलेली २० फुट खोल आणि २० फुट रुंद बारव या ठिकाणी आहे़ या बारवातील पायºया उतरून सहज पाणी घेता येते़ भर उन्हाळ्यात या बारवातील पाण्याचा उपसा केल्यानंतर अवघ्या एका तासातच बारवातील पाणी जशाच्या तसे होत आहे़ पावसाळ्यात तर मंदिर परिसरातील ही बारव काठोकाठ भरलेली असते़ असे येथील भाविकांनी सांगितले़ श्रीक्षेत्र मन्नाथ मंदिराच्या स्थापनेचा कालखंड माहीत नसला तरी हे मंदिर साधारणत: ३०० वर्षापेक्षाही अधिक काळाचे असावे, असे सांगितले जाते़ श्रावण महिन्यात या ठिकाणी महिनाभर दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते़ श्रावणी सोमवारी पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत रांगा लागतात़ याच मंदिराच्या परिसरातील बारव सध्या चर्चेचा विषय झाली आहे़ तालुक्यामध्ये भिषण दुष्काळ निर्माण झाला असून, मासोळी मध्यम प्रकल्प कोरडा पडल्याने गंगाखेड शहराचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ ग्रामीण भागात तर पाणीसाठे शिल्लक नसल्याने ग्रामवासियांना टँकरने पाणी द्यावे लागत आहे़ विहीर आणि बोअर अधिग्रहणासाठीही पाणी शिल्लक नसल्याची स्थिती यावर्षी निर्माण झाली आहे़ अशा भिषण परिस्थितीमध्ये मन्नाथ मंदिर परिसरातील बारवेत मुबलक प्रमाणात पाणी असल्याने बारव निर्मिती विषयीही कुतूहल निर्माण झाले आहे़ विशेष म्हणजे केवळ २० फुटांचे खोदकाम करण्यात आले असून, अवघ्या २० फुटांवर उपलब्ध असलेला हा पाणीसाठा आकर्षण ठरत आहे़ या मंदिराची आणि बारवेची दुरवस्था झाली असून, जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीdroughtदुष्काळ