शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

परभणी : वीज बिलावरून आडले आठ गावचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 12:35 AM

वीज बिल थकल्याने आठ गाव पाणीपुरवठा योजनेच्या पंपहाऊस व जलशुृद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा खंडित झाल्याने या योजनेतील गावे तहानलेले आहेत. दरम्यान, वीज बिलावरून या योजनेचे पाणी आडल्याने पाणी समस्या निर्माण झाली आहे.

मोहन बोराडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी) : वीज बिल थकल्याने आठ गाव पाणीपुरवठा योजनेच्या पंपहाऊस व जलशुृद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा खंडित झाल्याने या योजनेतील गावे तहानलेले आहेत. दरम्यान, वीज बिलावरून या योजनेचे पाणी आडल्याने पाणी समस्या निर्माण झाली आहे.निम्न दुधना प्रकल्पातून आठ गाव पाणीपुरवठा योजनेला पाणी घेतले जाते. या योजनेचे पंपहाऊस देवला (ता. परतूर जि.जालना) येथे आहे. तर जलशुद्धीकरण केंद्र सेलू तालुक्यातील रवळगाव येथे आहे. पंपहाऊस व जलशुद्धीकरण केंद्र या दोन्ही ठिकाणचे जवळपास १२ लाख रुपये वीज बिल थकल्याने महावितरण कंपनीने पाच महिन्यापूर्वीच दोन ठिकाणची वीज तोडली.दरवर्षी टंचाईच्या काळात या योजनेतून कुंडी, देऊळगाव, डासाळा, आहेरबोरगाव, गुगळी धामणगाव, तिडी पिंपळगाव, म्हाळसापूर, रवळगाव या गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. यंदा अत्यल्प पाऊस पडल्याने आॅक्टोबर महिन्यापासूनच पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी व जलस्त्रोत कोरडे पडले. परिणामी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे आठ गाव पाणीपुरवठा योजनेशिवाय गावांना पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याने आठही गावातील ग्रामपंचायतींनी योजनेतून पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली आहे. अनेक गावात चार ते पाच दिवसांना उपलब्ध पाणी स्त्रोतावरून दिले जात आहे.केवळ थकित वीज बिलावर महावितरण आडूून बसल्याने दुधनात पाणी असूनही आठ गावे पाण्यासाठी व्याकूळ झाली आहेत. दुष्काळी परिस्थिती असतानाही थकित वीज बिलावरून योजनेचे पाणी सुरू करण्यासाठी प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. ंआठ गावातील ग्रामपंचायतींनी निम्मे थकित वीज बिल चौदाव्या वित्त आयोगातून भरण्याची तयारी दर्शविली आहे. सध्या तीन ग्रामपंचायतींनी ५० हजार तर मोठ्या ग्रामपंचायतींनी प्रत्येकी १ लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली आहे. धनादेश देखील एकत्र केले आहेत. टंचाई लक्षात घेऊन प्रशानसाने थकित वीज बिलाचा दंड आकारू नये. तसेच निम्या रक्कमेवर पाणीपुरवठा योजनेची वीज पूर्ववत करावी-कैलास मोगल, सरपंच कुंडी

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीmahavitaranमहावितरण