शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

परभणी :गंगाखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:14 IST

तालुक्यातील नदी, नाले कोरडेठाक पडल्याने दिवसेंदिवस पाणीपातळी खालावत जाऊन जलस्त्रोत आटले आहेत. तालुक्यातील डोंगरी भागाबरोबर गोदावरी नदीकाठी असलेल्या गावातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड : तालुक्यातील नदी, नाले कोरडेठाक पडल्याने दिवसेंदिवस पाणीपातळी खालावत जाऊन जलस्त्रोत आटले आहेत. तालुक्यातील डोंगरी भागाबरोबर गोदावरी नदीकाठी असलेल्या गावातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.गेल्या काही वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमान होत असल्याने नदी, नाले, लघुपाझर तलाव, गोदावरी नदी पात्र व मासोळी प्रकल्प कोरडाठाक पडत आहेत. त्यामुळे भर हिवाळ्यातच गोदावरी नदीकाठी वसलेल्या गंगाखेड शहराबरोबर तालुक्यातील गावागावांत निर्माण होत असलेल्या पाणी टंचाईमुळे भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्याची वेळ तालुकावासियांवर आली आहे. गत पाऊसाळ्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पर्जन्यमान झाल्याने तालुक्यातील डोंगर भागात असलेल्या गावांबरोबरच गोदावरी नदी काठी असलेल्या गावांना ही नोव्हेंबर महिन्यातच पाणी टंचाई जाणवू लागली. तालुक्यातील डोंगरी व गोदावरी नदीकाठच्या २० ते २५ गावांचा समावेश आहे. यातील बहुतांश गावांत विहीर, बोअर अधिग्रहण करण्यासारखी परिस्थिती नसल्याने तालुक्यातील खंडाळी, पडेगाव, उमलानाईक तांडा, गोदावरी तांडा आदी गावातील ग्रामस्थांनी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी पंचायत समिती प्रशासनाकडे केली आहे.५४ गावांत जलस्त्रोत अधिग्रहणाची मागणीतालुक्यातील मालेवाडी, कासारवाडी, सुरळवाडी, गोदावरीतांडा, ढवळकेवाडी, कौडगाव, धरमनगरी, मरगीळवाडी, डोंगरगाव, डोंगरजवळा, वागदेवाडी, कोद्री, हरंगुळ, उंडेगाव, भगवानबाबा वस्ती, सिरसम, कर्लेवाडी, देवकतवाडी, खादगाव, वागदरा, वागदरातांडा, टाकळवाडी, खोकलेवाडी, मरडसगाव, बोर्डा, देवलानाईक तांडा, तांदुळवाडी, खोकलेवाडी, हनुमानवस्ती, उंबरवाडी, रुस्तुमनाईक तांडा, उंबरवाडी तांडा, मानकादेवी, पडेगाव, डुमनरवाडी, खंडाळी, राणीसावरगाव, पांगरी, चिमानाईक तांडा, लिंबेवाडी, धनगरमोहा, कातकरवाडी, गौडवाडी, गौळवाडी तांडा, ढेबेवाडी, गोपा, पांढरगाव, मानकादेवी, गोदावरीतांडा, खंडाळी, पडेगाव, उमलानाईक तांडा, नरळद, खळी या ५४ गावांनी विहीर व बोअर अधिग्रहणाबरोबर टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी तालुका प्रशासनाकडे केली आहे.ग्रामस्थांना लिकेज व्हॉल्वच्या पाण्याचा आधार४गोदावरी नदी काठावरील खळी गावातील विहिरीची ही पाणी पातळी खालावल्याने टाकीत पाण्याचा पुरवठाच होत नाही. त्यामुळे खळी पुनर्वसन येथील ग्रामस्थांना गावापासून अंदाजे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या पाईपलाईनच्या लिकेज झालेल्या व्हॉल्वमधून गळतीद्वारे येणारे पाणी भरून आपली तहान भागवावी लागत आहे.४गावातील पाणीटंचाई दूर करावी अशी मागणी बालाजी गौरशेटे, अंबादास पिसाळ, महादेव गात, लिंबाजी गरड, वैजनाथ बिडगर, शेषराव धाकपाडे, प्रकाश झुरे, अमृत कचाले, पांडुरंग गात, मोकिंद सोळंके, सुधाकर गरड, मारोती पिसाळ, रामकिशन पिसाळ आदींनी तहसील कार्यालयात दिलेल्या निवेदनात केली आहे.पाण्याअभावी १५ नळयोजना बंदलोकमत न्यूज नेटवर्कसेलू : जमिनीतील पाणी पातळी झपाट्याने कमी होत असून पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी कोरड्या ठाक पडत असल्याने तालुक्यातील १५ गावांतील नळ योजना बंद पडल्या आहेत.तालुक्यात नोव्हेंबरपासूनच पाणीटंचाई निर्माण झाली होती. मार्च महिन्यात अधिकच गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. काही गावांतील पाणी पुरवठा योजना मोडकळीस आल्या आहेत. तर काही गावातील योजना कालबाह्य झाल्याने पाणी पुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायतीला कसरत करावी लागत आहे. तालुक्यातील वाकी, तांदूळवाडी, कुपटा, म्हाळसापूर, निपाणी टाकळी, डासाळा या गावातील पाणी पुरवठा करणाºया विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पाणीपुरवठा योजनाही कालबाह्य झाल्याने या गावातील ग्रामस्थांना हातपंप व इतर पाणी स्त्रोतावरून तहान भागविण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. डिग्रस खु., डिग्रसवाडी येथील नळयोजना किरकोळ दुरूस्ती अभावी बंद आहे. तर गोहेगाव व हिस्सी येथील योजना पाणी नसल्याने बंद पडली आहे. कवडधन, शिंदे टाकळी, गव्हा येथील जलस्त्रोत कोरडे पडले असून योजना कालबाह्य झाली आहे. दरम्यान, पाणी पुरवठा करणाºया विहिरी कोरड्या पडत असल्याने पाणी असलेले स्त्रोत अधिग्रहण करून १० गावातील ग्रामस्थांची तहान भागविणाचा प्रयत्न केला जात आहे. तसेच ४ गावांतील टँकरचे प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयात दाखल झाले आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईdroughtदुष्काळ