शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
4
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
5
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
6
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
8
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
9
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
10
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
11
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
12
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
13
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
14
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
15
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
16
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
17
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
18
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
19
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
20
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा

परभणी :गंगाखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:14 IST

तालुक्यातील नदी, नाले कोरडेठाक पडल्याने दिवसेंदिवस पाणीपातळी खालावत जाऊन जलस्त्रोत आटले आहेत. तालुक्यातील डोंगरी भागाबरोबर गोदावरी नदीकाठी असलेल्या गावातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड : तालुक्यातील नदी, नाले कोरडेठाक पडल्याने दिवसेंदिवस पाणीपातळी खालावत जाऊन जलस्त्रोत आटले आहेत. तालुक्यातील डोंगरी भागाबरोबर गोदावरी नदीकाठी असलेल्या गावातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.गेल्या काही वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमान होत असल्याने नदी, नाले, लघुपाझर तलाव, गोदावरी नदी पात्र व मासोळी प्रकल्प कोरडाठाक पडत आहेत. त्यामुळे भर हिवाळ्यातच गोदावरी नदीकाठी वसलेल्या गंगाखेड शहराबरोबर तालुक्यातील गावागावांत निर्माण होत असलेल्या पाणी टंचाईमुळे भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्याची वेळ तालुकावासियांवर आली आहे. गत पाऊसाळ्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पर्जन्यमान झाल्याने तालुक्यातील डोंगर भागात असलेल्या गावांबरोबरच गोदावरी नदी काठी असलेल्या गावांना ही नोव्हेंबर महिन्यातच पाणी टंचाई जाणवू लागली. तालुक्यातील डोंगरी व गोदावरी नदीकाठच्या २० ते २५ गावांचा समावेश आहे. यातील बहुतांश गावांत विहीर, बोअर अधिग्रहण करण्यासारखी परिस्थिती नसल्याने तालुक्यातील खंडाळी, पडेगाव, उमलानाईक तांडा, गोदावरी तांडा आदी गावातील ग्रामस्थांनी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी पंचायत समिती प्रशासनाकडे केली आहे.५४ गावांत जलस्त्रोत अधिग्रहणाची मागणीतालुक्यातील मालेवाडी, कासारवाडी, सुरळवाडी, गोदावरीतांडा, ढवळकेवाडी, कौडगाव, धरमनगरी, मरगीळवाडी, डोंगरगाव, डोंगरजवळा, वागदेवाडी, कोद्री, हरंगुळ, उंडेगाव, भगवानबाबा वस्ती, सिरसम, कर्लेवाडी, देवकतवाडी, खादगाव, वागदरा, वागदरातांडा, टाकळवाडी, खोकलेवाडी, मरडसगाव, बोर्डा, देवलानाईक तांडा, तांदुळवाडी, खोकलेवाडी, हनुमानवस्ती, उंबरवाडी, रुस्तुमनाईक तांडा, उंबरवाडी तांडा, मानकादेवी, पडेगाव, डुमनरवाडी, खंडाळी, राणीसावरगाव, पांगरी, चिमानाईक तांडा, लिंबेवाडी, धनगरमोहा, कातकरवाडी, गौडवाडी, गौळवाडी तांडा, ढेबेवाडी, गोपा, पांढरगाव, मानकादेवी, गोदावरीतांडा, खंडाळी, पडेगाव, उमलानाईक तांडा, नरळद, खळी या ५४ गावांनी विहीर व बोअर अधिग्रहणाबरोबर टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी तालुका प्रशासनाकडे केली आहे.ग्रामस्थांना लिकेज व्हॉल्वच्या पाण्याचा आधार४गोदावरी नदी काठावरील खळी गावातील विहिरीची ही पाणी पातळी खालावल्याने टाकीत पाण्याचा पुरवठाच होत नाही. त्यामुळे खळी पुनर्वसन येथील ग्रामस्थांना गावापासून अंदाजे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या पाईपलाईनच्या लिकेज झालेल्या व्हॉल्वमधून गळतीद्वारे येणारे पाणी भरून आपली तहान भागवावी लागत आहे.४गावातील पाणीटंचाई दूर करावी अशी मागणी बालाजी गौरशेटे, अंबादास पिसाळ, महादेव गात, लिंबाजी गरड, वैजनाथ बिडगर, शेषराव धाकपाडे, प्रकाश झुरे, अमृत कचाले, पांडुरंग गात, मोकिंद सोळंके, सुधाकर गरड, मारोती पिसाळ, रामकिशन पिसाळ आदींनी तहसील कार्यालयात दिलेल्या निवेदनात केली आहे.पाण्याअभावी १५ नळयोजना बंदलोकमत न्यूज नेटवर्कसेलू : जमिनीतील पाणी पातळी झपाट्याने कमी होत असून पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी कोरड्या ठाक पडत असल्याने तालुक्यातील १५ गावांतील नळ योजना बंद पडल्या आहेत.तालुक्यात नोव्हेंबरपासूनच पाणीटंचाई निर्माण झाली होती. मार्च महिन्यात अधिकच गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. काही गावांतील पाणी पुरवठा योजना मोडकळीस आल्या आहेत. तर काही गावातील योजना कालबाह्य झाल्याने पाणी पुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायतीला कसरत करावी लागत आहे. तालुक्यातील वाकी, तांदूळवाडी, कुपटा, म्हाळसापूर, निपाणी टाकळी, डासाळा या गावातील पाणी पुरवठा करणाºया विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पाणीपुरवठा योजनाही कालबाह्य झाल्याने या गावातील ग्रामस्थांना हातपंप व इतर पाणी स्त्रोतावरून तहान भागविण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. डिग्रस खु., डिग्रसवाडी येथील नळयोजना किरकोळ दुरूस्ती अभावी बंद आहे. तर गोहेगाव व हिस्सी येथील योजना पाणी नसल्याने बंद पडली आहे. कवडधन, शिंदे टाकळी, गव्हा येथील जलस्त्रोत कोरडे पडले असून योजना कालबाह्य झाली आहे. दरम्यान, पाणी पुरवठा करणाºया विहिरी कोरड्या पडत असल्याने पाणी असलेले स्त्रोत अधिग्रहण करून १० गावातील ग्रामस्थांची तहान भागविणाचा प्रयत्न केला जात आहे. तसेच ४ गावांतील टँकरचे प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयात दाखल झाले आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईdroughtदुष्काळ