शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

परभणी : दोन बसेस घसरल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 12:21 AM

जिंतूर- परभणी हा महामार्ग ठिकठिकाणी खोदण्यात आला आहे. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या पावसामुळे या रस्त्यावर पाणी झाले. चिखलमय झालेल्या रस्त्यावरुन दोन बसेस घसरल्या. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिंतूर- परभणी हा महामार्ग ठिकठिकाणी खोदण्यात आला आहे. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या पावसामुळे या रस्त्यावर पाणी झाले. चिखलमय झालेल्या रस्त्यावरुन दोन बसेस घसरल्या. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.परभणी शहरातून जाणारे परभणी- गंगाखेड, परभणी- जिंतूर, परभणी- पाथरी व परभणी-वसमत हे चारही महामार्ग पुनर्बांधणीसाठी मागील सहा महिन्यांपासून खोदण्यात आले आहेत. हे महामार्ग खोदल्यानंतर या रस्त्यावरुन धावणाऱ्या वाहनांची संख्या लक्षात घेता संबंधित कंत्राटदाराने रस्त्याच्या बाजूला पक्का रस्ता तयार करुन देणे अपेक्षित होते; परंतु, संबंधित विभागाचे दुर्लक्ष व कंत्राटदारांनी दाखवलेल्या उदासीन भूमिकेमुळे कच्च्या रस्त्यावरुनच वाहनधारकांना या चारही महामार्गावरुन वाहने चालवावी लागत आहेत.परभणी जिल्ह्यामध्ये मागील आठ दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरु आहे. या पावसामुळे जिंतूर- परभणी या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर चिखल झाला आहे. या चिखलमय रस्त्यावरुन धावणाºया वाहनांमध्ये दररोजच अपघाताच्या घटना घडत आहेत. शुक्रवारी सायंकाळी परभणी तालुक्यात पाऊस झाला. या पावसामुळे हा महामार्ग चिखलमय झाला. परिणामी, परभणी तालुक्यातील झरी गावानजीक जिंतूरकडून येणाºया औरंगाबाद- निजामाबाद व जिंतूरकडे जाणाºया वसमत -औरंगाबाद या दोन गाड्या एकमेकांना साईड देताना रस्त्याच्या खाली घसरल्या. त्यामुळे बसमध्ये बसलेल्या प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली. त्यामुळे प्रत्येक जण बसखाली उतरण्यासाठी धडपड करु लागले. त्यातच काही प्रवाशांनी प्रसंगावधान दाखूवन बसला असलेल्या आपतकालीन खिडकी उघडून प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे हा रस्ता तात्काळ दुरूस्त करावा अशी मागणी होत आहे.निसरडी वाट : अपघाताच्या घटना झाल्या नित्याच्याच४परभणी- जिंतूर हा महामार्ग पुनर्बांधणीसाठी ठिकठिकाणी खोदण्यात आला. मात्र वाहनांना ये-जा करण्यासाठी कोणताही पक्का रस्ता तयार करुन देण्यात आला नाही. थोडासा पाऊस झाला तर परभणी तालुक्यातील धर्मापुरी, झरी, टाकळी कुंभकर्ण तर जिंतूर तालुक्यातील बोरी या गावानजीक वाहने रस्त्यावरुन घसरण्याच्या घटना दररोज घडत आहेत.४त्यामुळे तासन्तास वाहतुकीची कोंडी होत आहे. छोटे-मोठे अपघातही घडत आहेत. जिंतूरकरांनी या रस्त्यासाठी पावसाळ्याचा धोका ओळखून वेगवेगळ्या पद्धतीने प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला; परंतु, ‘शासकीय काम महिनाभर थांब’ या म्हणी प्रमाणेच जिंतूरकरांच्या मागणीलाही शासकीय यंत्रणेने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीroad transportरस्ते वाहतूकRainपाऊस