शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

परभणी : चुकीच्या दिशादर्शकाने चालकांना त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 12:35 AM

शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग २२२ वर चुकीच्या दिशेने दिशादर्शक फलक बसविल्याने वाहन चालक गोंधळात पडत आहेत़ माजलगावकडे जाणारे वाहन चालकांना चुकीच्या फलकामुळे पाळोदी गावात जात आहेत.

मानवत (परभणी): शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग २२२ वर चुकीच्या दिशेने दिशादर्शक फलक बसविल्याने वाहन चालक गोंधळात पडत आहेत़ माजलगावकडे जाणारे वाहन चालकांना चुकीच्या फलकामुळे पाळोदी गावात जात आहेत.मानवत शहरातून राष्ट्रीय महामार्ग २२२ जातो़ या महामार्गाचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे़ याचे काम एल अ‍ॅड टी कंपनी करीत असून, पाथरी ते मानवत रोड नवीन वळण रस्त्यापर्यंतचे काम अंतीम टप्प्यात आहे़ त्याच मार्गावर बसस्थानक असून, सध्या एल अँड टी कंपनीच्या वतीने ठिक ठिकाणी दिशादर्शक बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे़ परंतु, दिशादर्शक फलक बसविताना पुरेशी माहिती नसल्याने चुकीच्या दिशेने फलक बसविण्यात आला आहे बसस्थानक परिसरात माजलगाव नाव असलेला दिशादर्शक फलक बसविण्यात आला आहे़ मात्र या फलकाची दिशा चुकली असून, पाळोदी रस्त्याकडे दिशा दाखविण्यात आली आहे़ त्यामुळे वाहन चालकांची चांगलीच गोची होत आहे़ नवीन वाहन चालक या फलकामुळे आपले वाहन माजलगावकडे नेण्याऐवजी पाळोदी गावामध्ये पोहचत आहे़ १५ किमीचा फटका सहन करीत पुन्हा मानवतला येऊन माजलगावकडे मार्गक्रमण करावे लागत आहे़ चुकीच्या दिशादर्शक फलकामुळे याचा फटका वाहन चालकांना सहन करावा लागत असून, मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे़ चुकीच्या दिशेने लावलेला फलक योग्य दिशेला बसवावे, अशी मागणी होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीhighwayमहामार्ग