शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

परभणी : शिक्षकांची बदली प्रक्रिया २५ मार्चपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 12:25 AM

जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्यांची प्रक्रिया २५ मार्चपासून सुरु करण्यात येणार आहे. या संदर्भातील आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाने ८ मार्च रोजी काढला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्यांची प्रक्रिया २५ मार्चपासून सुरु करण्यात येणार आहे. या संदर्भातील आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाने ८ मार्च रोजी काढला आहे.जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या यापूर्वी शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी बदल्या होत होत्या; परंतु, गेल्या दोन वर्षांपासून शिक्षकांच्या बदली प्रक्रियेच्या वेळापत्रकात सातत्याने बदल केले जात आहेत. चालू शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वीच आता शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरु करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. त्या अनुषंगाने ८ मार्च रोजी कक्ष अधिकारी एस. एन. भंडारकर यांच्या स्वाक्षरीने आदेश काढण्यात आला आहे. त्यात बदलीपात्र शिक्षक, बदली अधिकार प्राप्त शिक्षक, निव्वळ रिक्त जागा, अनिवार्य रिक्त जागा यांच्या संदर्भात देण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार याद्या तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. १९ मार्चपर्यंत हे काम पूर्ण करावयाचे आहे. २५ मार्चपासून प्रत्यक्ष शिक्षकांचे बदली अर्ज भरण्याची संगणकीय प्रणाली सुरु करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सर्व बाबी शिक्षकांना अवगत करण्यात याव्यात, असेही या संदर्भातील आदेशात नमूद करण्यात आले आहे. यासाठी ८ मार्च रोजीच ग्रामविकास विभागाच्या अव्वर सचिव प्रियदर्शना कांबळे यांच्या स्वाक्षरीने काढलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे सांगण्यात आले आहे. त्यानुसार २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार बदल्यांबाबत जे सुधारित धोरण निश्चित करण्यात आले, त्याची अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे. त्यामध्ये बदलीपात्र शिक्षकांची व्याख्या करताना संबंधित शिक्षकाची सर्वसाधारण व अवघड क्षेत्रात १० वर्षाची सेवा असल्यास सदरील शिक्षक बदलीपात्र होतात. मात्र सर्वसाधारण श्रेणीतील बदलीपात्र शिक्षक एकदा बदली झाल्यानंतर जोपर्यंत अवघड क्षेत्रात जात नाहीत, तोपर्यंत असे शिक्षक बदलीपात्र ठरतात. नवीन धोरणानुसार त्यांची प्रतिवर्षी बदली होऊ शकते. औरंगाबाद खंडपीठात शिक्षकांच्या बदल्यांच्या अनुषंगाने न्यायालयाने एक मुद्दा उपस्थित केला होता. ज्यामध्ये बदलीपात्र शिक्षकाची नवीन धोरणानुसार प्रतिवर्षी बदली होऊ शकते. त्यामुळे त्या शिक्षकाला एकदा बदली झाल्यानंतर पुन्हा बदली होण्यासाठी काही कालावधी निश्चित केला जाणार आहे काय, अशी विचारणा वकिलांना करण्यात आली होती. त्यावेळी शासनाच्या वतीने अशा बदलीपात्र शिक्षकांची संगणकीय प्रणालीद्वारे एकदा बदली झाल्यानंतर पुन्हा ३ वर्षे त्या शिक्षकाची बदली केली जाणार नाही, हे स्पष्ट करण्यात आले.आता ८ मार्चच्या आदेशात या व्याख्येत बदल करुन शुद्धीपत्रक काढण्यात आले आहे. त्यात बदलीपात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकाच्या बदलीस निश्चित करायवाची सेवा १० वर्षे पूर्ण झाली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा किमान ३ वर्षे पूर्ण झाली आहे, असे शिक्षक बदलीपात्र ठरु शकतात, असेही ग्रामविकास विभागाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.खोटी माहिती देणाऱ्या शिक्षकांना अभय कायम४शिक्षक बदल्यांमध्ये संवर्ग १ व २ मधील ज्या शिक्षकांनी खोटी माहिती देऊन गतवर्षी बदली करुन घेतली. अशा शिक्षकांची एक वेतनवाढ कायमस्वरुपी बंद करुन त्यांना त्यांच्या मूळ शाळेवर परत पाठविण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. जिल्ह्यात असे २४ शिक्षक गतवर्षी आढळून आले होते. त्यापैकी १० शिक्षकांवर जिल्हा परिषदेने कारवाई केली. उर्वरित १४ शिक्षकांना शिक्षण विभागाने गेल्या वर्षभरापासून अभय दिलेले आहे. या शिक्षकांवर कारवाई करण्याचे अधिकार जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना असताना परभणीतील मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांनी या मुद्याकडे दुर्लक्ष केले आहे. आता पुन्हा एकदा बदल्यांची प्रक्रिया सुरु होणार आहे. गतवर्षीच कारवाई झाली नसल्याने पुन्हा खोटी माहिती देऊन बदलीचा खटाटोप होण्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळातून होताना दिसून येत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीTeacherशिक्षकTransferबदली