शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

परभणी : तंटामुक्त गाव समित्या कागदावरच राहिल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:29 AM

गावातील तंटे गावातच मिटवून ग्रामस्थांनी शांततेकडून समृद्धीकडे जावे, या हेतुने शासनाने तंटामुक्त समित्याची स्थापना केली. मात्र तालुक्यातील विविध गावात झालेली भांडणं, तंटे मिटवण्यासाठी या समितीला अपयश येत असल्याने ग्रामस्थांना पोलीस ठाण्याचे दार ठोठवावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे तालुक्यातील तंटामुक्ती समित्या केवळ कागदावरच उरल्या असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): गावातील तंटे गावातच मिटवून ग्रामस्थांनी शांततेकडून समृद्धीकडे जावे, या हेतुने शासनाने तंटामुक्त समित्याची स्थापना केली. मात्र तालुक्यातील विविध गावात झालेली भांडणं, तंटे मिटवण्यासाठी या समितीला अपयश येत असल्याने ग्रामस्थांना पोलीस ठाण्याचे दार ठोठवावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे तालुक्यातील तंटामुक्ती समित्या केवळ कागदावरच उरल्या असल्याचे दिसून येत आहे.पोलिसांवरील कामाचा वाढता ताण कमी व्हावा, गावातील तंटे गावाताच मिटावेत, हा चांगला उद्देश डोळ्यासमोर ठेऊन तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या पुढाकारातुन राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त योजना सुरु करण्यात आली. या समित्यांचे अधिकार कोणते, तंटे कसे मिटवावेत, ग्रामस्थ पोलिसांकडे न जाता समितीकडे कसे येतील, याबाबत समितीचे पदधिकारी सध्याही अज्ञभिज्ञ आहेत. समितींच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या अधिकाराची परिपूर्ण जाणीव नसल्याने बहुतांश गावातील तंट्यांच्या तक्रारी ठाण्यात येत आहेत. यामुळे पोलिसांवर कामाचा ताण वाढत आहे. ग्रामीण भागात गावपातळीवर सभेचे आयोजन करुन जनजागृती करणे आवश्यक आहे; परंतु, तसे होताना दिसत नाही. गावातील वाद पोलीस ठाण्यात आला की, अनेकजण याचा गैर फायदा घेतात. शासनाच्या या चांगल्या योजनेची प्रभावीपणे अमलबजावणी होताना दिसत नाही. गावातील तंटे गावातच मिटविल्यास त्या गावाला शासनाकडून लाखो रुपयांची बक्षिसेही दिली जातात. समितीचे पदधिकारी बक्षीस आपल्याच गावाला मिळावे, यासाठी धडपड करतात. मात्र गावातील तंटे मिटवताना दिसत नाहीत. गावातल्या गावात अबोला नको म्हणून गावच्या समितीतील पदधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे तंटामुक्त समितीना तंटा मिटवण्यासाठी मानवत तालुक्यात अपयश येत आहे.वरिष्ठांचे दुर्लक्ष: तालुक्यात तंटामुक्त मोहीम थंडावलीगावातील तंटे गावातच मिटवावेत, गावोगावी शांतता नांदावी, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली. त्यानुसार प्रत्येक गावात तंटामुक्त समित्या स्थापन करण्यात आल्या. या मोहिमेला सुरुवातीला प्रतिसादही मिळाला; परंतु गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मानवत तालुक्यात तंटामुक्त मोहीम थंडावली असून गावातील तंटामुक्त समित्या केवळ कागदांवरच राहिल्या असल्याने तंट्याचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे तंटामुक्तीची चळवळ गतीमान करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. छोट्या-मोठ्या कारणावरून निर्माण होणारे तंटे वेळीच मिटवले नाहीत तर ते मोठे स्वरूप धारण करतात. त्यानंतर क्षुल्लक कारणावरून पोलिस प्रशासनाचे उंबरठे झिजवावे लागते. यात वेळ, पैसा, मानसिक स्वास्थ गमवण्याची वेळ येते.४यास दारू हे एक कारण आहे. त्यामुळे दारूचे समूळ उच्चाटन व्हावे, गावा-गावांत शांतता नांदावी, यासाठी दिवंगत गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी २००६ मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली. मोहीम यशस्वीरीत्या सुरू झाल्यानंतर काही वर्षे ती प्रभावीपणे राबविण्यात आली. मात्र आता जिल्ह्यासह तालुक्यात ही मोहीम थंडावल्याचे दिसून येत आहे.पोलीस प्रशासनाचे दुर्लक्षतंटामुक्ती मोहिमेकडेच पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे तंटे वाढत असून तंटामुक्त समिती अध्यक्ष व समित्याही याबाबत उदासीन आहेत. खºया अर्थाने आदर्श गावाची निर्मिती करावयाची असेल तर राज्यशासनाने याकडे लक्ष देऊन पुन्हा एकदा तंटामुक्त चळवळीला उभारी देण्याची गरज आहे. यामुळे गाव परिसरात वाद, गावातच मिटू शकतील. ज्यामुळे शासनाचा या योजनेमागचा उद्देश सफल होईल.

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिसliquor banदारूबंदी