शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

परभणीत राज्यस्तरीय दुष्काळ शेतकरी साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 00:53 IST

राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने शेती, माती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर वैचारिक मंथन व्हावे, या उद्देशाने छत्रपती शिवाजीराजे प्रतिष्ठानच्या वतीने १६ डिसेंबर रोजी परभणीत एक दिवसीय राज्यस्तरीय दुष्काळ शेतकरी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शनिवारी स्वागताध्यक्ष नगरसेवक अ‍ॅड.विष्णू नवले यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने शेती, माती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर वैचारिक मंथन व्हावे, या उद्देशाने छत्रपती शिवाजीराजे प्रतिष्ठानच्या वतीने १६ डिसेंबर रोजी परभणीत एक दिवसीय राज्यस्तरीय दुष्काळशेतकरी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शनिवारी स्वागताध्यक्ष नगरसेवक अ‍ॅड.विष्णू नवले यांनी दिली.या पत्रकार परिषदेस अ‍ॅड़ विष्णू नवले, अरुण चव्हाळ, कवी केशव खटींग, राजेंद्र गहाळ, प्रा़ सुनिल तुरूकमाने, सुभाष ढगे, यशवंत मकरंद, मंचकराव बचाटे, राज शेलार, दत्ता सुरवसे, प्रा़ सुरेश कदम, राहुल वहीवाळ, मिलिंद घुसळे, प्रा़ विनय गुजर, फेरोजभाई, हेमंत साळवे, गणेश बोरीकर, निलेश भुसारे, विजय कदम, ओंकार पौळ, ज्ञानेश्वर भोसले, संतोष जाधव, संदीप देशमुख, योगेश ढगे यांची उपस्थिती होती़संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त लेखक श्रीकांत देशमुख- राहेरीकर यांची निवड करण्यात आली आहे़ साहित्य संमेलनाचे उद्घाटन स्तंभलेखक अमर हबीब यांच्या हस्ते होणार आहे़ साहित्य संमेलनास कवी प्रा़ इंद्रजीत भालेराव, डॉ़आसाराम लोमटे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ़ अशोक ढवण यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे़ या साहित्य संमेलनात शेती व शेतकºयांसाठी उल्लेखनीय योगनदान देणाºयांचा गौरव करण्यात येणार आहे़ १६ डिसेंबर रोजी साहित्य संमेलनात शेती-शेतकरी दुष्काळ व साहित्य आणि कार्यकर्त्यांची भूमिका या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे़ या परिसंवादात कुलगुरु डॉ़ अशोक ढवण यांच्या अध्यक्षतेखाली व्यासपीठावरून ‘बारोमासकार’ सदानंद देशमुख, ज्येष्ठ साहित्यिक शेषराव मोहिते, डॉ़ शिवाजी दळणर, पत्रकार डॉ़ आसाराम लोमटे हे संवाद साधणार आहेत़ राजेंद्र गहाळ यांच्या अध्यक्षतेखाली होणाºया तर कथाकथनात शिवदास पोटे, बबन आव्हाड, राजा कदम, संगीता देशमुख यांचा सहभाग राहणार आहे़कविसंमेलनात या कवींचा सहभाग४रेणु पाचपोर यांच्या अध्यक्षतेखाली होणाºया कविमसंलनात प्राचार्य गोविंद गायकी, अमृत तेलंग, अर्चना डावरे, संतोष नारायणकर, श्रीनिवास मस्के अरविंद सगर, शिवाजी मरगीळ, प्रा़ कल्याण कदम, प्रा़ राम कठारे, चंद्रकांत कावरखे, प्रमोद देशमुख, यशवंत मकरंद, शरद ठाकर, सुरेश हिवाळे, प्रेमानंद शिंदे, संगीता देशमुख, आण्णा जगताप, राजेश रवले हे सहभागी होणार आहेत़ कविसंमेलनाचे सूत्रसचांलन कवी केशव खटींग हे करणार आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळFarmerशेतकरी