शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

परभणी : मुले पळविण्याच्या अफवा पसरल्याने पालकांची उडाली झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 00:13 IST

परभणी शहरासह जिंतूर आणि सोनपेठ तालुक्यामध्ये मुले पकडणारी टोळी फिरत असल्याची अफवा पसरल्याने पालकांची झोप उडाली आहे़ परभणी शहरात तर नागरिकांनी सोमवारची रात्र जागून काढली़ सोनपेठमध्ये अफवांमुळे शाळेत गेलेल्या मुलांना घरी परत नेण्यासाठी अचानक पालकांची गर्दी झाली़ या सर्व अफवांमुळे नागरिक त्रस्त आहेत़ त्यातच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास मारहाणीसारखे प्रकार होत आहेत़ या सर्व पार्श्वभूमीवर अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणी शहरासह जिंतूर आणि सोनपेठ तालुक्यामध्ये मुले पकडणारी टोळी फिरत असल्याची अफवा पसरल्याने पालकांची झोप उडाली आहे़ परभणी शहरात तर नागरिकांनी सोमवारची रात्र जागून काढली़ सोनपेठमध्ये अफवांमुळे शाळेत गेलेल्या मुलांना घरी परत नेण्यासाठी अचानक पालकांची गर्दी झाली़ या सर्व अफवांमुळे नागरिक त्रस्त आहेत़ त्यातच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास मारहाणीसारखे प्रकार होत आहेत़ या सर्व पार्श्वभूमीवर अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे़मागील काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये ही अफवा पसरली आहे़ मुलांना पळवून नेण्याची घटना घडली नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवांचे पेव फुटले आहे़ परभणी शहरात देखील मोठ्या प्रमाणात अफवा पसरत आहेत़ मुलांना पळविणारी टोळी जिल्ह्यात दाखल झाली आहे़ अशा स्वरुपाची ही अफवा असून, त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे़या भीतीतूनच सोमवारी रात्री शहरातील दर्गा रोड परिसरातील झमझम कॉलनीत नागरिकांनी रात्र जागून काढली़ दरम्यान, मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास संशयावरून एका व्यक्तीस मारहाण झाल्याची घटनाही याच भागात घडली़ शहरात अफवा पसरल्याने पोलीस प्रशासनाचीही धावपळ होत आहे़ ठिकठिकाणी गस्त घालून जनजागृती केली जात आहे़विद्यार्थ्यांना शाळेतून आणले घरीसोनपेठ तालुक्यात अशीच अफवा पसरली असून, मंगळवारी या अफवेमुळे शाळांमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांना घरी घेऊन जाण्यासाठी पालकांची गर्दी झाली होती़ पोलिसांनी अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन नागरिकांना केले आहे़ १९ जून रोजी सोनखेड परिसरातून एक मुलगा पळविल्याची अफवा शहरात पसरली़लहान मुले पळविणारी टोळी सक्रिय झाल्याचे संदेश सोशयल मीडियातून फिरत आहेत़ अनोळखी व्यक्ती आढळली तर तातडीने पोलिसांना माहिती द्यावी़ नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पो.नि .सोपान सिरसाठ यांनी केले आहे़जिंतुरात फिरस्त्यांची चौकशीजिंतूर तालुक्यातही ही अफवा पसरली आहे़ अनेक जण या अफवेच्या अनुषंगाने पोलिसांना माहिती देत आहेत़ अफवांवर विश्वास ठेवू नये, संशयित व्यक्ती आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे़त्याचबरोबर छोट्या व्यवसायासाठी बाहेर गावाहून शहरात आलेल्या फिरस्त्यांची चौकशी जिंतूर पोलिसांनी केली़ उपविभागीय अधिकारी अनिल घेर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, उपनिरीक्षक सुरेश नरवडे यांनी पथकामार्फत शहरात भटक्या नागरिकांची तपासणी केली़अशोक घोरबांड यांची होर्डिंग लावून जनजागृतीपोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी बसस्थानक, जांब नाका, आझम चौक आणि पारवा गेट अशा चार ठिकाणी मोठे होर्डिंग लावून नागरिकांना आवाहन केले आहे़ फिरस्ती, भिकारी, वेडसर, अनोळखी व्यक्तींना मारहाण करू नये, तसेच कायदा हातात घेऊ नये, संशयास्पद व्यक्ती आढळली तर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे़अफवांवर विश्वास ठेवू नका- परदेशीअफवांच्या अनुषंगाने पोलिसांनी तपासणी केली़ मात्र कुठल्याही प्रकारची घटना घडली नाही़ ही केवळ अफवा आहे़ सर्व फिरस्ती लोकांच्या चौकशीचे कामही सुरू आहे़ नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन डीवायएसपी संजय परदेशी यांनी केले आहे़ तसेच संशय आल्यास जवळच्या पोलीस ठाण्याशी अथवा पोलीस नियंत्रण कक्ष ०२४५२-२२६२४४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन परदेशी यांनी केले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीCrimeगुन्हाPoliceपोलिसKidnappingअपहरण