शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
2
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
3
"जास्त जागा जिंकूनही ही निवडणूक नसेल मोदींची बेस्ट इनिंग", प्रशांत किशोर यांनी सांगितलं कारण
4
सूर्य कोपला! राजस्थानमध्ये उष्णतेची लाट; जवानानं पापड भाजून दाखवला, नेटकरी गहिवरले
5
पॅनिक होऊ नका, विराटच्या जीवाला नाही धोका! सराव सत्र रद्द करण्यामागचा ग्राऊंड रिपोर्ट 
6
"त्यांना भाजपामध्ये यायचं होतं पण..."; कैलाश विजयवर्गीय यांचा कमलनाथांबाबत मोठा खुलासा
7
माधुरीच्या सौंदर्याकडे पाहतच राहिला अभिनेता, हातात असलेल्या सिगरेटचंही नव्हतं भान अन्...
8
महाराष्ट्रात निवडणूक संपताच महायुतीत आरोप प्रत्यारोप; एकमेकांवर करतायेत चिखलफेक
9
"फडणवीसांनी सांगितले तेच खरे, हा घ्या पुरावा; धंगेकरांवर मुरलीधर मोहोळांचा पलटवार
10
सांगलीचा सचिन बनला वर्ल्ड चॅम्पियन! शाळेत असताना डाव्या हाताला आले अपंगत्व, तरीही तो... 
11
"१० वर्ष माझ्या वडिलांनी केलेल्या कामाचा मला फायदा होईल"; अमोल कीर्तिकरांनी सगळंच सांगितलं
12
"विराट कोहलीवर जेव्हा मी बोली लावत होतो त्यावेळी मला वाटलं होतं की..."; विजय मल्ल्याचे स्पेशल ट्विट
13
"मोदींनी सैनिकांना मजूर बनवले, आता दोन प्रकारचे शहीद होणार," राहुल गांधींचे टीकास्त्र
14
Closing Bell Today: शेअर बाजारात तेजी; हिंदुस्तान झिंकनं ३० दिवसांत पैसे केले दुप्पट, भेल घसरला
15
Corona Virus : भारतात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा कहर; 324 जणांना संसर्ग, 'या' राज्यात सर्वाधिक रुग्ण
16
Indian Temple: भारतात आहे यमराजाचे दुर्मिळ मंदिर; पण तिथे जाण्यास लोक का घाबरतात? वाचा!
17
Amruta Fadnavis : "बाल न्याय मंडळाची लाज वाटते"; पुणे हिट अँड रन प्रकरणी अमृता फडणवीसांचा संताप
18
Buddha Purnima 2024: बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने जाणून घ्या भगवान बुद्धांनी दाखवलेला राजमार्ग!
19
ENG vs PAK: World Cup ची तयारी पण पाकिस्तानची डोकेदुखी वाढली; स्टार खेळाडू झाला बाहेर
20
Zerodha का करत नाही आपली जाहिरात? सीईओ Nithin Kamath यांनी केला खुलासा

परभणी : हमीभाव केंद्राविना तूर उत्पादकांची फरपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 12:53 AM

पावसाच्या अत्यल्प प्रमाणाचा फटका तुरीच्या पिकाला बसला असून, उत्पादनात घट झाल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे. दुष्काळाचा सामना करीत शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आणण्यास सुरुवात केली आहे़ बाजार समितीच्या मार्केट यार्डात मागील महिनाभरात १८०० क्विंटल तूर शेतकºयांनी खाजगी व्यापाºयांना विक्री केली आहे़ त्यामुळे हमीभाव केंद्राविना तूर उत्पादकांची फरपट सुरूच असल्याचे पहावयास मिळत आहे़

सत्यशील धबडगे ।लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी) : पावसाच्या अत्यल्प प्रमाणाचा फटका तुरीच्या पिकाला बसला असून, उत्पादनात घट झाल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे. दुष्काळाचा सामना करीत शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आणण्यास सुरुवात केली आहे़ बाजार समितीच्या मार्केट यार्डात मागील महिनाभरात १८०० क्विंटल तूर शेतकºयांनी खाजगी व्यापाºयांना विक्री केली आहे़ त्यामुळे हमीभाव केंद्राविना तूर उत्पादकांची फरपट सुरूच असल्याचे पहावयास मिळत आहे़२०१७ मध्ये तालुक्यातील एकूण ३ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली होती़ मात्र २०१८ मध्ये खरीप हंगामात तुरीच्या पेरणी क्षेत्रात घट झाल्याचे दिसून आले़ मानवत मंडळात १२०५ हेक्टर, कोल्हा मंडळात ६६७ हेक्टर तर केकरजवळा मंडळात ९५९ हेक्टर अशा एकूण २ हजार ८०१ हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली होती़ पावसाळ्यात सुरुवातीला पावसाने कृपा केल्याने शेतकरी समाधानी होता़ मात्र शेवटच्या दीड महिन्यात पावसाने खंड दिल्याने याचा फटका तालुक्यातील तूर उत्पादक शेतकºयांना बसला़ अनंत अडचणींना तोंड देऊन १२ डिसेंबरपासून शेतकºयांनी बाजारपेठेत तूर विक्रीसाठी आणण्यास सुरुवात केली़ सुरुवातीला तुरीला ४ हजार ७०० रुपये दर मिळाला होता़ त्यामुळे शेतकºयांत नाराजी दिसून येत होती़ निराशेचे वातावरण शेतकºयांत निर्माण झाले होते़ मात्र आता मागील आठवड्यापासून तुरीच्या दरात सतत वाढ होत आहे़ तुरीला बाजारपेठेत ५ हजार २०० ते ५ हजार ३०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे़ आतापर्यंत बाजारपेठेत १८०० क्विंटल आवक झाल्याची नोंद बाजार समितीकडे झाली आहे़कापूस उत्पादकही हवालदिलकापूस वेचणीला दिवाळीच्या अगोदर सुरुवात झाली आहे़ दुष्काळामुळे कामाच्या शोधात अनेकांनी शहराकडे धाव घेतल्याने मजूर मिळत नसल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे़ जे मजूर उपलब्ध आहेत ते वेचणीसाठी जास्तीचा दर मागत आहेत़ ८ ते १० रुपये प्रतिकिलो मजुरी द्यावी लागते़दुसरीकडे कापसाला चांगला दर मिळेल, या आशेने बहुतांश शेतकºयांनी कापूस विक्रीकडे पाठ फिरविली आहे़ सुरुवातीच्या काळात कापसाचा दर ६ हजारापर्यंत गेला होता़ मागील आठवड्यात ५ हजार ६८० रुपये कापसाला वरचा दर मिळाला होता़ मात्र तो आता ५ हजार ५७० रुपयांपर्यंत घसरला आहे़ १०० रुपयांनी भाव तुटले आहेत़१२ जानेवारी रोजी ५ हजार ५७० रुपयांचा कापसाला वरचा दर मिळाला़ यामुळे शेतकरी निराश झाले आहेत़ भाव कमी-जास्त होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत़ भाव वाढतील, या आशेने अनेक शेतकरी वाट बघत होते़ मात्र प्रत्यक्षात भाव वाढ होत नसल्याने शेतकरी आपला कापूस विक्रीसाठी बाहेर काढताना दिसत आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी