शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

परभणी : ५० लाख रुपये होईनात वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 23:24 IST

भारत निर्माण योजनेंंतर्गत ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनेत विविध गावांतील पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष व सचिवांनी अपहार केलेली ५० लाखांची रक्कम वसूल करण्यात पाणीपुरवठा विभागाला अपयश आले आहे. अपहरित रकमेची नोंद संबंधितांच्या मालमत्तेवर करावी म्हणून मागील पाच वर्षापासून अनेक वेळा पत्र व्यवहार करूनही महसूल प्रशासन मात्र हे प्रकरण गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे.

विजय चोरडिया।लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी): भारत निर्माण योजनेंंतर्गत ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनेत विविध गावांतील पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष व सचिवांनी अपहार केलेली ५० लाखांची रक्कम वसूल करण्यात पाणीपुरवठा विभागाला अपयश आले आहे. अपहरित रकमेची नोंद संबंधितांच्या मालमत्तेवर करावी म्हणून मागील पाच वर्षापासून अनेक वेळा पत्र व्यवहार करूनही महसूल प्रशासन मात्र हे प्रकरण गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे.जिंंतूर तालुक्यामध्ये विविध पाणीपुरवठा योजनेचा बोजवारा उडाला आहे. योजना म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरणच ही नवीन म्हण आता रुढ होऊ पाहत आहे. जलस्वराज्य, भारत निर्माण, राष्टÑीय पेयजल या महत्त्वाच्या योजनांमध्ये तालुक्यातील जवळपास १२० गावांना यातून पाणीपुरवठा होतो. मात्र योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याने बहुतांश योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे भारत निर्माण योजनेत अपहारित झालेल्या रकमा संबंधितांकडून वसूल करण्याच्या नोटीस ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने संबंधितांना दिल्या आहेत. त्याच बरोबर महसूल विभागाला पत्र पाठवून संबंधित रक्कमेचा बोजा अध्यक्ष व सचिवांच्या सातबारावर व मालमत्तेवर टाकावा, असा वेळोवेळी पत्र व्यवहार केला; परंतु, सरकारी काम अन वर्षानुवर्षे थांब, असा अनुभव सध्या जिंतूर तालुक्याला येत आहे. पाच वर्षापासूून पत्र व्यवहार करूनही अद्याप अध्यक्ष व सचिव यांच्या मालमत्तेवर बोजा पडला नाही.तालुक्यातील नागठाणा येथे २००९-२०१० यावर्षी २७ लाख ६१ हजार रुपयांची भारत निर्माण योजना कार्यान्वित केली होती. मात्र त्या गावच्या समितीच्या अध्यक्षा सुनिता विजय ठमके, सचिव लक्ष्मण झाडे (मयत) यांनी ५ लाख ५३ हजार, ३५० रुपयांचा अपहार केला.या संदर्भात संबंधितांच्या मालमत्तेवर बोजा टाकावा, यासाठी अनेक वेळा पत्रव्यवहार झाला; परंतु, कारवाई झाली नाही. पोखर्णी व पोखर्णी तांडा येथील समिती अध्यक्षा सविता सुभाष जाधव व सचिव गणेश किशन राठोड यांनी ७ लाख ३७ हजार १७९ रुपयांचा अपहार केला. रायखेडा येथील ज्ञानदेव तुकाराम तिथे, अयोध्या ज्ञानदेव तिथे यांनी ६ लाख २७ हजार ४४२ रुपयांचा अपहार केला. तर ग्रुप ग्रा.पं. मध्ये मानकेश्वर, चारठाणा या गावातील २ लाख २५ हजार ८२९ असा एकूण २ गावातील ८ लाख ५३ हजार ३०१ रुपयांचा अपहार केला. डिग्रस येथील मदन बळीराम घुगे व सुलाबाई माणिकराव घुगे यांनी ९७ हजार ७३४ हजारांचा अपहार केला.कडसावंगी येथील अच्युत मनोहर अंबोरे व मंगल दत्ता अंबोरे यांनी ४ लाख ९४ हजार १६ रुपयांचा अपहार केला. सोरजा येथील सुरेखा सुभाष कवडे व संजय नारायण आळणे यांनी ६ लाख ५४ हजार ४८९ रुपयांचा अपहार केला. त्याच बरोबर शेवडी येथील भानुदास लिंबाजी सानप व सचिव शोभा रमेश घुगे यांनी ३ लाख ८३ हजार २९० रुपयांचा अपहार केला.कवी येथील सुमनबाई बाबाराव आंधळे व बाबाराव आंधळे यांनी १० लाख ७९ हजार ७२५ रुपयांचा अपहार केला, असा एकूण भारत निर्माण योजनेंतर्गत ४८ लाख ५३ हजार ८४ रुपयांचा अपहार झाला आहे. या संदर्भात संबंधित गावातील पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष व सचिव यांनी या रकमा स्वत:च्या खाजगी वापरासाठी वापरल्या. शासनाने वेळोवेळी प्रयत्न करूनही त्या वसूल झाल्या नाहीत. शासनाच्या रकमेचा अपहार महसूल प्रशासन उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने २०१०-२०११ पासून अनेक वेळा महसूल प्रशासनाला विनंती करून संंबंधित रकमेचा बोजा त्या त्या गावातील अध्यक्ष व सचिव यांच्या नावावर टाकण्याबाबत पत्र व्यवहार केला. वरिष्ठ कार्यालयातील पत्र व्यवहाराला महसूल प्रशासनाने केराची टोपली दाखविली. जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा संबंधित तहसीलदारांना तातडीने बोजा टाकण्याबाबत सूचना केल्या. मात्र त्या सुचनांकडे मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी दुर्लक्ष केल्याचे मागील नऊ वर्षापासूनचे चित्र आहे.पाणीपुरवठा योजनेत १०० टक्के गैरप्रकार४जिंतूर तालुक्यातील जलस्वराज्य, भारत निर्माण योजना, राष्टÑीय पेयजल योजना, मुख्यमंत्री पेयजल योजना व जीवन प्राधिकरणाच्या योजना अशा एकूण १०० पेक्षा जास्त योजना जिंतूर तालुक्यात चर्चेचा विषय बनल्या आहेत. लाखो रुपये खर्च झालेल्या योजना गुत्तेदार, समिती अध्यक्ष व सचिव यांनी शासनाला लाखोंचा गंडा घालत गिळंकृत केल्या आहेत.४तालुक्यातील १७० पैकी १३८ गावांमध्ये या योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जाणार होता. मात्र केवळ १० ते १५ योजना सुरू असून बाकीच्या योजना गुत्तेदार व अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी गायब केल्या आहेत.नवरा-बायकोची मिलीभगत४भारत निर्माण योजनेंतर्गत विविध गावात नवरा-बायको किंवा नातेवाईकांनी मिळून हा अपहार केला आहे. तालुक्यातील मानकेश्वर, चारठाणा व रायखेडा या दोन्ही गावात नामदेव तुकाराम तिथे व अयोध्या नामदेव तिथे या पती-पत्नीने ८ लाख ५४ हजार ३०१ रुपयांचा अपहार केला. तर कावी येथील सुमनबाई बाबाराव आंधळे व बाबाराव ग्यानबाराव आंधळे या नवरा-बायकोने शासनाला १० लाख ७९ हजार ७२५ रुपयांचा गंडा घातला आहे. नवरा-बायकोने शासनाची केलेली फसवणूक जिंतूर तालुक्यात चर्चेचा विषय बनली आहे.या संदर्भात अपहारित रकमेचा बोजा संबंधित पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष व सचिव यांच्या संपत्तीवर टाकावा, याबाबत महसूल प्रशासनाला लेखी पत्र दिले आहे. शिवाय अध्यक्ष व सचिवांची मालमत्ता कोठे आहे, याचे सविस्तर विवरण महसूल प्रशासनाला देण्यात आले आहे. हे प्रकरण प्रशासकीय पातळीवर प्रलंबित आहे.-एस.ए. चाहेल,उपविभागीय अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिंतूर

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीdroughtदुष्काळwater scarcityपाणी टंचाई