शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
5
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
6
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
7
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
8
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
9
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
10
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
11
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
12
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
13
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
14
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
15
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
16
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
17
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
18
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
19
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
20
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  

परभणी : टंचाईच्या देयकांसाठी ४ कोटी रुपयांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 12:48 AM

ग्रामीण भागात निर्माण झालेली पाणी टंचाई शिथील करण्यासाठी जिल्हा परिषदेने राबविलेल्या विविध उपाययोजनांच्या देयकापोटी विभागीय आयुक्त कार्यालयातून जिल्हा परिषदेला ४ कोटी २३ लाख ३७ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, या निधीतून टंचाई देयके अदा केली जाणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : ग्रामीण भागात निर्माण झालेली पाणी टंचाई शिथील करण्यासाठी जिल्हा परिषदेने राबविलेल्या विविध उपाययोजनांच्या देयकापोटी विभागीय आयुक्त कार्यालयातून जिल्हा परिषदेला ४ कोटी २३ लाख ३७ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, या निधीतून टंचाई देयके अदा केली जाणार आहेत.२०१८-१९ या वर्षात जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली होती. प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्याने आणि मागील वर्षीच्या पावसाळी हंगामात परतीचा पाऊसच झाला नसल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती होती. सर्वसाधारणपणे जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात होते. मात्र यावर्षी जिल्हा प्रशासनाला आॅक्टोबर महिन्यापासूनच टंचाईचे नियोजन करावे लागले होते. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात पाणी टंचाईची तीव्रता अधिक होती. या टंचाईग्रस्त भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने आॅक्टोबर ते जून या ९ महिन्यांच्या काळात विविध योजना राबविल्या होत्या. त्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा, विहीर, बोअरचे अधिग्रहण, तात्पुरती पूरक पाणीपुरवठा योजना, नळ योजनांची दुरुस्ती आदी योजनांच्या माध्यमातून टंचाईग्रस्त गावांना पाणी उपलब्ध करुन देण्यात आले होते.जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या टंचाई निवारण आराखड्यात शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातच सर्वाधिक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. ९ महिन्यांच्या या काळात जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिल्यानंतर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून टंचाईग्रस्त गावांना उपाययोजना करण्यात आल्या.या उपाययोजनांपोटी जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे निधीची मागणी केली होती. विभागीय आयुक्त कार्यालयास हा निधी प्राप्त झाला असून, आयुक्त कार्यालयातून येथील जिल्हा परिषदेला ४ कोटी २३ लाख ३७ हजार रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. जि.प.च्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला हा निधी ४ नोव्हेंबर रोजी प्राप्त झाला आहे. त्यामुळे टंचाई काळात ज्यांनी कामे केली त्यांची देयके अदा करणे सोयीचे होणार आहे.औरंगाबाद जिल्ह्याला सर्वाधिक निधीच्राज्य शासनाने पाणी टंचाईच्या निवारणासाठी केलेल्या कामांपोटी १८९ कोटी ८६ लाख ९० हजार रुपये विभागीय आयुक्त कार्यालयात मंजूर केले आहेत.च्विभागीय आयुक्त कार्यालयाने या निधीचे जिल्हानिहाय वितरण केले असून, त्यात औरंगाबाद जिल्हा परिषदेला सर्वाधिक ८९ कोटी २३ लाख ४८ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.च्त्या खालोखाल बीड जिल्हा परिषदेला ४० कोटी ४६ लाख ६६ हजार रुपये, नांदेड जिल्हा परिषदेला २८ कोटी ९८ लाख ७४ हजार रुपये, उस्मानाबाद जिल्हा परिषदेला १० कोटी ७५ लाख रुपये, परभणी ४ कोटी २३ लाख २७ हजार रुपये आणि हिंगोली जिल्हा परिषदेला ४ कोटी २९ लाख ७६ हजार रुपयांचा निधी मिळाला आहे.निधीचे तालुकानिहाय वितरण सुरूच्जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला निधी प्राप्त झाल्यानंतर तालुक्यातून आलेल्या मागणीप्रमाणे या निधीचे वितरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.च्प्राप्त झालेला निधी पंचायत समितीनिहाय वर्गीकरण करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांनी या निधी वितरणास परवानगी देताच तो पंचायत समितींकडे वर्ग केला जाणार असल्याची माहिती मिळाली.

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळWaterपाणी