शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

परभणी : अतिक्रमण न हटवताच रस्त्यांची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 00:49 IST

शहरातील मध्यवर्ती भागात सिमेंट रस्ते फोडून जलवाहिनी टाकण्याचे काम केले जात आहे. मात्र हे काम करीत असताना अतिक्रमणांना धक्काही लावला जात नसल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त केला जात असून, मनपाच्या या दुर्लक्षामुळे काही भागात रस्त्याच्या मधोमध खोदकाम केल्याचे पहावयास मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील मध्यवर्ती भागात सिमेंट रस्ते फोडून जलवाहिनी टाकण्याचे काम केले जात आहे. मात्र हे काम करीत असताना अतिक्रमणांना धक्काही लावला जात नसल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त केला जात असून, मनपाच्या या दुर्लक्षामुळे काही भागात रस्त्याच्या मधोमध खोदकाम केल्याचे पहावयास मिळत आहे.शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून या योजनेंतर्गत शहरातील विविध भागांमध्ये जलवाहिनी टाकण्याचे काम सध्या सुरु आहे. मध्यवर्ती भागातील आणि शहराबाहेरील वसाहतींमध्येही मागील काही दिवसांपासून हे काम सुरू झाले आहे. प्रत्यक्षात जलवाहिनी टाकताना कामाचा आराखडा तयार करणे अपेक्षित होते. जलवाहिनी टाकण्याच्या कामात किती अतिक्रमणे आहेत, ती कोणी व कशी काढायची, याचे नियोजन करणे आवश्यक होते. मात्र त्यास फाटा देण्यात आला आहे.शहरातील मध्यवर्ती भागामध्ये काही वर्षांपूर्वी सिमेंटचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. दीड ते दोन फूट जाडीचे हे रस्ते असून जलवाहिनी टाकण्यासाठी चक्क हे रस्ते फोडण्यात येत आहेत. नालीच्या बाजुने जलवाहिनीचे काम झाल्यास रस्त्याचे कमीत कमी नुकसान होऊ शकते. बाजारपेठ भाग आणि जुन्या गल्ल्यांमध्ये बहुतांश नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. अनेकांनी घराच्या पायरा रस्त्यावर उतरविल्या आहेत. तर बाजारपेठेत व्यावसायिकांचे शेड रस्त्यावर आले आहे. जलवाहिनी टाकताना ही अतिक्रमण काढणे आवश्यक आहे; परंतु, कोणतीही कारवाई न करता किंवा कोणाला नाराज न करता मनमानेल त्या पद्धतीने जलवाहिनी वळविली जात आहे. परिणामी मजबूत रस्त्यांचे खोदकाम करुन मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे.जलवाहिनी अंथरण्याच्या या कामावर मनपा आयुक्त, शहर अभियंत्यांचेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. अनेक भागात अतिक्रमणे जशाच तशी ठेवून अतिक्रमणांना वळसा घालून जलवाहिनीसाठी खोदकाम करण्यात आले आहे. स्थानिक नागरिक किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणेल त्या प्रमाणे जलवाहिनी टाकली जात असल्याने रस्त्याचे नुकसान होत आहे. बाजारपेठ भागामध्ये तर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत; परंतु, ही अतिक्रमणे हटविण्याची तसदी मनपाचे अधिकारी घेत नाहीत.शहरातील पाण्याचा प्रश्न महत्त्वपूर्णच आहे. त्यामुळे जलवाहिनीच्या कामाला प्राधान्य देण्याचे गरजेचे असून हे काम दर्जेदार व कायमस्वरुपी व्हावे, यात शंका नाही. मात्र या कामासाठी अनेक भागात गरज नसताना रस्ते फोडणे अयोग्य आहे. रस्त्याच्या बाजूची अतिक्रमणे हटवून खोदकाम केले असते तर रस्त्यांचे होणारे नुकसान टळू शकते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करुन काम उरकून घेतले जात आहे.रस्त्यांची दुरवस्था४जलवाहिनी व केबल टाकण्याच्या कामावर महापालिकेचे नियंत्रण नसल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जिंतूररोडवर खोदकामातून निघालेली माती रस्त्याच्या कडेला टाकली आहे. तसेच हे यासंदर्भातील खड्डे व्यवस्थित बुजविले नाहीत. त्यामुळे प्रमुख वर्दळीच्या रस्त्यावर माती साचली असून वाहनधारकांसाठी हा रस्ता धोक्याचा ठरत आहे. शिवाजी पार्क भागातही खोदकामातील मोठे दगड, माती रस्त्याच्या कडेला तसेच ठेवल्याने वाहनधारकांसाठी धोका वाढला आहे. परिणामी नागरिक त्रस्त आहेत.लाखो रुपयांच्या रस्त्याची तोडफोड४शहरातील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट आहे; परंतु, मध्यवर्ती भागात काही वर्षांपूर्वीच दीड ते दोन फूट जाडीचे मजबूत रस्ते तयार करण्यात आले. त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर झाली होती; परंतु, सध्या कुठल्याही नियमांचे पालन न करता रस्त्यांची तोडफोड केली जात आहे.४कमीत कमी तोडफोड करुन जलवाहिनी टाकणे शक्य असताना काही जणांच्या मर्जीखातर रस्त्यांची तोडफोड केली जात असून या भागातील रस्ते खोदकामामुळे पुन्हा एकदा धोकादायक होत आहेत.नानलपेठ कॉर्नर ते नांदखेडा रोड हा संपूर्ण रस्ता एका बाजूने फोडून ठेवला आहे. तसेच रंगनाथ महाराज नगर, कच्छी बाजार, शिवाजी चौक, भिकूलाल पेट्रोलपंप आदी भागामध्ये सिमेंट रस्ते फोडण्यात आले आहेत.४काही भागात तर हा रस्ता मधोमध खोदून ठेवला आहे. तसेच जिंतूर रोडवरही गणपती चौकापासून ते जांब नाक्यापर्यंत खोदकाम झाले आहे. या कामाच्या दरम्यानही मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या उपरस्त्यांवर खोदकाम करुन ठेवले आहे; परंतु, ते व्यवस्थित बुजविले नसल्याने वाहनधारकांसाठी हा रस्ताही धोकादायक बनला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीEnchroachmentअतिक्रमण