शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

परभणी : रस्त्याची उडाली दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 00:15 IST

तब्बल तीन वर्षांपासून रखडलेल्या जिंतूर- परभणी रस्त्याचे काम अजूनही पूर्ण झाले नसल्याने त्याचा फटका आता वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. राष्टÑीय महामार्गा म्हणून मान्यता मिळालेला हा रस्ता अक्षरश: चिखलाने माखला असून, जड वाहने देखील या रस्त्यावरुन घसरत असल्याने पाऊस पडल्यानंतर या मार्गावरील वाहतूकच धोकादायक बनली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : तब्बल तीन वर्षांपासून रखडलेल्या जिंतूर- परभणी रस्त्याचे काम अजूनही पूर्ण झाले नसल्याने त्याचा फटका आता वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. राष्टÑीय महामार्गा म्हणून मान्यता मिळालेला हा रस्ता अक्षरश: चिखलाने माखला असून, जड वाहने देखील या रस्त्यावरुन घसरत असल्याने पाऊस पडल्यानंतर या मार्गावरील वाहतूकच धोकादायक बनली आहे.परभणी ते जिंतूर या ५० कि.मी. अंतराच्या रस्त्याला राष्टÑीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर रुंदीकरण आणि सिमेंट काँक्रीट रस्ता तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली. त्यामुळे साधारणत: वर्षभरात हे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. मात्र कंत्राटदाराने धिम्या गतीने काम केले आणि कालांतरानेच कामच सोडून दिले. त्यामुळे रस्त्याच्या समस्या पूर्वीपेक्षा अधिक वाढल्या आहेत. सहा महिन्यापूर्वी राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने नव्या कंत्राटदाराकडे हे काम सोपविले खरे; मात्र पावसाळा सुरू झाल्याने हे काम पूर्ण करण्यात अडथळे निर्माण होत आहेत.दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत आहे. त्यामुळे या रस्त्याच्या समस्या चांगल्याच वाढल्या आहेत. सद्यस्थितीला झरी ते टाकळी आणि बोरी ते झरी हा रस्ता एका बाजूने पूर्णत: खोदून ठेवला असून, दुसऱ्या बाजूने याच रस्त्यावर मजबुतीकरणासाठी गिट्टी अंथरुन ठेवली आहे. त्यामुळे वाहनधारकांना खोदून ठेवलेल्या कच्चा रस्त्याचा वापर करावा लागत आहे. आधीच केलेला खड्डा त्यात काळी माती असणाºया या रस्त्यावर पाऊस झाल्याने अक्षरश: चिखल झाला आहे. काही भागात तर गुडघ्याइतके पाणी या रस्त्यावर आहे. त्यामुळे वाहतूक करताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कंत्राटदाराने खोदकाम केलेल्या भागात दबई केली असती आणि पाणी काढून देण्याची व्यवस्था केली असती तर वाहनधारकांचा त्रास कमी झाला असता. मात्र या कामाकडे दुर्लक्ष केल्याने वाहनधारकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. चक्क चिखलातून मार्ग काढावा लागत असून, काळ्या मातीमुळे वाहने रस्त्यावरुन घसरत आहेत. राष्टÑीय महमार्गाची ही अवस्था झाल्याने वाहनधारक जाम वैतागले आहेत.पन्नास कि.मी.साठी दोन तास४जिंतूर- परभणी रस्ता जागोजागी खोदून ठेवल्याने वाहनधारकांच्या समस्या वाढल्या आहेत. पावसामुळे रस्त्यावर चिखल साचला असून, आठवडाभरातून तर या मार्गावरील दुचाकी वाहनांची वाहतूक चक्क बंद झाली आहे. सध्या केवळ चारचाकी वाहनेच या रस्त्यावरुन धावत असून, ५० कि.मी.चे अंतर पार करण्यासाठी दोन तासांचा वेळ लागत आहे. नांदेड- औरंगाबाद या प्रमुख मार्गाला जोडणारा परभणी ते जिंतूर मार्ग असल्याने या मार्गावर वाहतूकही मोठी आहे. मात्र रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनधारक त्रस्त आहेत.अनेकांनी बदलला मार्ग४दोन वर्षांपासून रस्त्याची दुरवस्था झाली असल्याने अनेकांनी मार्गावरील वाहतूक बंद केली आहे. नांदेडहून येणारी वाहने औरंगाबादकडे जाण्यासाठी परभणी- सेलू- देवगावफाटा मार्गे औरंगाबाद रस्ता गाठत आहेत.४हे अंतर परभणी- जिंतूर अंतरापेक्षा दूर असले तरी सेलू मार्गे औरंगाबाद रस्ता वाहतुकीयोग्य असल्याने याच मार्गाचा वापर केला जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसroad transportरस्ते वाहतूक