शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

परभणी : रस्त्याची उडाली दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 00:15 IST

तब्बल तीन वर्षांपासून रखडलेल्या जिंतूर- परभणी रस्त्याचे काम अजूनही पूर्ण झाले नसल्याने त्याचा फटका आता वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. राष्टÑीय महामार्गा म्हणून मान्यता मिळालेला हा रस्ता अक्षरश: चिखलाने माखला असून, जड वाहने देखील या रस्त्यावरुन घसरत असल्याने पाऊस पडल्यानंतर या मार्गावरील वाहतूकच धोकादायक बनली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : तब्बल तीन वर्षांपासून रखडलेल्या जिंतूर- परभणी रस्त्याचे काम अजूनही पूर्ण झाले नसल्याने त्याचा फटका आता वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. राष्टÑीय महामार्गा म्हणून मान्यता मिळालेला हा रस्ता अक्षरश: चिखलाने माखला असून, जड वाहने देखील या रस्त्यावरुन घसरत असल्याने पाऊस पडल्यानंतर या मार्गावरील वाहतूकच धोकादायक बनली आहे.परभणी ते जिंतूर या ५० कि.मी. अंतराच्या रस्त्याला राष्टÑीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर रुंदीकरण आणि सिमेंट काँक्रीट रस्ता तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली. त्यामुळे साधारणत: वर्षभरात हे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. मात्र कंत्राटदाराने धिम्या गतीने काम केले आणि कालांतरानेच कामच सोडून दिले. त्यामुळे रस्त्याच्या समस्या पूर्वीपेक्षा अधिक वाढल्या आहेत. सहा महिन्यापूर्वी राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने नव्या कंत्राटदाराकडे हे काम सोपविले खरे; मात्र पावसाळा सुरू झाल्याने हे काम पूर्ण करण्यात अडथळे निर्माण होत आहेत.दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत आहे. त्यामुळे या रस्त्याच्या समस्या चांगल्याच वाढल्या आहेत. सद्यस्थितीला झरी ते टाकळी आणि बोरी ते झरी हा रस्ता एका बाजूने पूर्णत: खोदून ठेवला असून, दुसऱ्या बाजूने याच रस्त्यावर मजबुतीकरणासाठी गिट्टी अंथरुन ठेवली आहे. त्यामुळे वाहनधारकांना खोदून ठेवलेल्या कच्चा रस्त्याचा वापर करावा लागत आहे. आधीच केलेला खड्डा त्यात काळी माती असणाºया या रस्त्यावर पाऊस झाल्याने अक्षरश: चिखल झाला आहे. काही भागात तर गुडघ्याइतके पाणी या रस्त्यावर आहे. त्यामुळे वाहतूक करताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कंत्राटदाराने खोदकाम केलेल्या भागात दबई केली असती आणि पाणी काढून देण्याची व्यवस्था केली असती तर वाहनधारकांचा त्रास कमी झाला असता. मात्र या कामाकडे दुर्लक्ष केल्याने वाहनधारकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. चक्क चिखलातून मार्ग काढावा लागत असून, काळ्या मातीमुळे वाहने रस्त्यावरुन घसरत आहेत. राष्टÑीय महमार्गाची ही अवस्था झाल्याने वाहनधारक जाम वैतागले आहेत.पन्नास कि.मी.साठी दोन तास४जिंतूर- परभणी रस्ता जागोजागी खोदून ठेवल्याने वाहनधारकांच्या समस्या वाढल्या आहेत. पावसामुळे रस्त्यावर चिखल साचला असून, आठवडाभरातून तर या मार्गावरील दुचाकी वाहनांची वाहतूक चक्क बंद झाली आहे. सध्या केवळ चारचाकी वाहनेच या रस्त्यावरुन धावत असून, ५० कि.मी.चे अंतर पार करण्यासाठी दोन तासांचा वेळ लागत आहे. नांदेड- औरंगाबाद या प्रमुख मार्गाला जोडणारा परभणी ते जिंतूर मार्ग असल्याने या मार्गावर वाहतूकही मोठी आहे. मात्र रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनधारक त्रस्त आहेत.अनेकांनी बदलला मार्ग४दोन वर्षांपासून रस्त्याची दुरवस्था झाली असल्याने अनेकांनी मार्गावरील वाहतूक बंद केली आहे. नांदेडहून येणारी वाहने औरंगाबादकडे जाण्यासाठी परभणी- सेलू- देवगावफाटा मार्गे औरंगाबाद रस्ता गाठत आहेत.४हे अंतर परभणी- जिंतूर अंतरापेक्षा दूर असले तरी सेलू मार्गे औरंगाबाद रस्ता वाहतुकीयोग्य असल्याने याच मार्गाचा वापर केला जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसroad transportरस्ते वाहतूक