शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

परभणी : पाच लाख हेक्टरवरील पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 00:11 IST

जून महिन्यात एक-दोन वेळा झालेल्या समाधानकारक पावसावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात ३ आॅगस्टपर्यंत ४ लाख ७० हजार ७९२ हेक्टरवर पेरणी केली; परंतु, जुलै महिन्यात २० दिवस पावसाने ताण दिल्याने पेरणी केलेल्या सर्वच क्षेत्रावरील पिके धोक्यात आली आहेत. आठ दिवसांत पाऊस झाला नाही तर खरीप हंगाम हातचा जाण्याची भीती शेतकºयांना वाटत आहे.

मारोती जुंबडे।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जून महिन्यात एक-दोन वेळा झालेल्या समाधानकारक पावसावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात ३ आॅगस्टपर्यंत ४ लाख ७० हजार ७९२ हेक्टरवर पेरणी केली; परंतु, जुलै महिन्यात २० दिवस पावसाने ताण दिल्याने पेरणी केलेल्या सर्वच क्षेत्रावरील पिके धोक्यात आली आहेत. आठ दिवसांत पाऊस झाला नाही तर खरीप हंगाम हातचा जाण्याची भीती शेतकºयांना वाटत आहे.जिल्ह्यात खरीप हंगाम हा शेतकºयांची आर्थिक वाहिनी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास ७ लाख शेतकºयांची या हंगामावर भिस्त असते. हे शेतकरी दरवर्षी खरीप हंगामात दरवर्षी ५ लाख हेक्टवर पेरणी करतात. गतवर्षी जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे खरीप व रब्बी हंगामात शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात पेरणी केली; परंतु, पावसाअभावी सोयाबीन, मूग, उडीद ही पिके हातची गेली. शेतकºयांची मदार ही कापूस पिकावर होती. मात्र कापूस पिकावर पहिल्याच वेचणीनंतर गुलाबी बोंडअळीने हल्ला चढविला. त्यामुळे शेतकºयांनी पिकांवर केलेला खर्चही उत्पादनातून निघालेला नाही. त्यामुळे गत खरीप हंगाम हा शेतकºयांना आर्थिक खाईत लोटणाराच ठरला. यावर्षीच्या खरीप हंगामात कृषी विभागाने ५ लाख २१ हजार ८७० हेक्टवर पेरणीेचे नियोजन केले. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी पेरता झाला. ३ आॅगस्टपर्यंत ४ लाख ७० हजार ७९२ हेक्टरवर पेरणी झाली आहे; परंतु, जुलै महिन्याच्या शेवटी व आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत म्हणजेच सलग २० दिवस पावसाने जिल्ह्यात उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकºयांनी खरीपात पेरणी केलेली सोयाबीन, मूग, उडीद ही पिके करपून जात आहेत तर कापूस, तूर या पिकांची अवस्था बिकट झाली आहे. येत्या आठ दिवसांत जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही तर पावणे पाच लाख हेक्टरवरील पिकांची अवस्था बिकट होणार आहे. परिणामी खरीप हंगाम शेतकºयांच्या हातून जाण्याची भिती निर्माण झाली आहे.२७१ मि.मी. पाऊसजिल्ह्यामध्ये ३ आॅगस्टपर्यंत २७१.९७ मि.मी. पाऊस झाला आहे. अपेक्षित सरासरीच्या तुलनेत ४० मि.मी.ने पाऊस कमी आहे. यामध्ये परभणी तालुक्यात २८२. ८२ मि.मी., पालम २२८.६४ मि.मी., पूर्णा ४५९.६ मि.मी., गंगाखेड २४४.७५ मि.मी., सोनपेठ २३५ मि.मी., सेलू २५०.२० मि.मी., पाथरी १९३.५० मि.मी., जिंतूर २५८.७६ तर मानवत २९५.०१ मि.मी. पाऊस झाला आहे. अपेक्षित सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण जरी समाधानकारक असले तरी पावसाने सलग २० दिवस जिल्ह्यात उघडीप दिली आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. त्यामुळे पिकांची परिस्थिती बिकट बनली आहे.नैसर्गिक संकटात सापडला शेतकरीजिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५८ हजार ८८ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. सध्या कापूस पीक वाढीच्या अवस्थेत आहे. कृषी विभागाकडून बोंडअळीच्या संकटाला तोंड देण्यासाठी जिल्ह्यात क्रॉप सॅप अभियान सुरु आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक शेतकºयांच्या बांधावर जावून पिकांची पाहणी करीत आहेत. या पाहणीत अधिकाºयांना विदारक चित्र दिसून येत आहे. कापसाला बोंड येण्याआधीच पाकळ्यांमधूनच अळ्या बाहेर येत आहेत. त्यामुळे सद्य परिस्थितीत शेतकरी नैसर्गिक संकटात सापडल्याचे दिसून येत आहे.पाच वर्षात एकच हंगाम चांगलाजिल्ह्यामध्ये २०१४-१५ व २०१५-१६ या दोन वर्षात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे खरीप व रब्बी हंगामातून शेतकºयांच्या हाती काहीच लागले नाही. परिणामी जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला. त्यानंतर शेतकºयांची अवस्था लक्षात घेता बँकांनी २०१६ मध्ये पीक कर्जाच्या माध्यमातून तब्बल १४०० कोटी रुपये उपलब्ध करुन दिले. त्यानंतर शेतकºयांनी या पैशातून २०१६-१७ ची खरीप पेरणी केली. या हंगामात जूनपासूनच समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकºयांची पिके बहरली. त्यातून शेतकºयांनी विक्रमी उत्पादन घेतले; परंतु, बाजारपेठेत शेतकºयांना समाधानकारक भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक कोंडीत सापडले. शासनाला जिल्ह्यामध्ये हमीभाव खरेदी केंद्र सुरु करावे लागले. त्यानंतर २०१७-१८ या खरीप हंगामात शेतकºयांनी ५ लाख हेक्टरवर पेरणी केली. त्यानंतर दोन महिने जिल्ह्यात एकही समाधानकारक पाऊस झाला नाही. परिणामी सोयाबीन, मूग, उडीद ही पिके करपून गेली. तर कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीने हल्ला चढविल्याने शेतकºयांना उत्पन्न मिळाले नाही. २०१८-१९ च्या खरीप हंगामात आतापर्यंत ४ लाख ७० हजार ७९२ हेक्टरवर पेरणी झाली आहे; परंतु, सलग २० दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने शेतकºयांमध्ये अस्वस्था निर्माण झाली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीRainपाऊस