शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पाच लाख हेक्टरवरील पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 00:11 IST

जून महिन्यात एक-दोन वेळा झालेल्या समाधानकारक पावसावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात ३ आॅगस्टपर्यंत ४ लाख ७० हजार ७९२ हेक्टरवर पेरणी केली; परंतु, जुलै महिन्यात २० दिवस पावसाने ताण दिल्याने पेरणी केलेल्या सर्वच क्षेत्रावरील पिके धोक्यात आली आहेत. आठ दिवसांत पाऊस झाला नाही तर खरीप हंगाम हातचा जाण्याची भीती शेतकºयांना वाटत आहे.

मारोती जुंबडे।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जून महिन्यात एक-दोन वेळा झालेल्या समाधानकारक पावसावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात ३ आॅगस्टपर्यंत ४ लाख ७० हजार ७९२ हेक्टरवर पेरणी केली; परंतु, जुलै महिन्यात २० दिवस पावसाने ताण दिल्याने पेरणी केलेल्या सर्वच क्षेत्रावरील पिके धोक्यात आली आहेत. आठ दिवसांत पाऊस झाला नाही तर खरीप हंगाम हातचा जाण्याची भीती शेतकºयांना वाटत आहे.जिल्ह्यात खरीप हंगाम हा शेतकºयांची आर्थिक वाहिनी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास ७ लाख शेतकºयांची या हंगामावर भिस्त असते. हे शेतकरी दरवर्षी खरीप हंगामात दरवर्षी ५ लाख हेक्टवर पेरणी करतात. गतवर्षी जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे खरीप व रब्बी हंगामात शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात पेरणी केली; परंतु, पावसाअभावी सोयाबीन, मूग, उडीद ही पिके हातची गेली. शेतकºयांची मदार ही कापूस पिकावर होती. मात्र कापूस पिकावर पहिल्याच वेचणीनंतर गुलाबी बोंडअळीने हल्ला चढविला. त्यामुळे शेतकºयांनी पिकांवर केलेला खर्चही उत्पादनातून निघालेला नाही. त्यामुळे गत खरीप हंगाम हा शेतकºयांना आर्थिक खाईत लोटणाराच ठरला. यावर्षीच्या खरीप हंगामात कृषी विभागाने ५ लाख २१ हजार ८७० हेक्टवर पेरणीेचे नियोजन केले. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी पेरता झाला. ३ आॅगस्टपर्यंत ४ लाख ७० हजार ७९२ हेक्टरवर पेरणी झाली आहे; परंतु, जुलै महिन्याच्या शेवटी व आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत म्हणजेच सलग २० दिवस पावसाने जिल्ह्यात उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकºयांनी खरीपात पेरणी केलेली सोयाबीन, मूग, उडीद ही पिके करपून जात आहेत तर कापूस, तूर या पिकांची अवस्था बिकट झाली आहे. येत्या आठ दिवसांत जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही तर पावणे पाच लाख हेक्टरवरील पिकांची अवस्था बिकट होणार आहे. परिणामी खरीप हंगाम शेतकºयांच्या हातून जाण्याची भिती निर्माण झाली आहे.२७१ मि.मी. पाऊसजिल्ह्यामध्ये ३ आॅगस्टपर्यंत २७१.९७ मि.मी. पाऊस झाला आहे. अपेक्षित सरासरीच्या तुलनेत ४० मि.मी.ने पाऊस कमी आहे. यामध्ये परभणी तालुक्यात २८२. ८२ मि.मी., पालम २२८.६४ मि.मी., पूर्णा ४५९.६ मि.मी., गंगाखेड २४४.७५ मि.मी., सोनपेठ २३५ मि.मी., सेलू २५०.२० मि.मी., पाथरी १९३.५० मि.मी., जिंतूर २५८.७६ तर मानवत २९५.०१ मि.मी. पाऊस झाला आहे. अपेक्षित सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण जरी समाधानकारक असले तरी पावसाने सलग २० दिवस जिल्ह्यात उघडीप दिली आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. त्यामुळे पिकांची परिस्थिती बिकट बनली आहे.नैसर्गिक संकटात सापडला शेतकरीजिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५८ हजार ८८ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. सध्या कापूस पीक वाढीच्या अवस्थेत आहे. कृषी विभागाकडून बोंडअळीच्या संकटाला तोंड देण्यासाठी जिल्ह्यात क्रॉप सॅप अभियान सुरु आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक शेतकºयांच्या बांधावर जावून पिकांची पाहणी करीत आहेत. या पाहणीत अधिकाºयांना विदारक चित्र दिसून येत आहे. कापसाला बोंड येण्याआधीच पाकळ्यांमधूनच अळ्या बाहेर येत आहेत. त्यामुळे सद्य परिस्थितीत शेतकरी नैसर्गिक संकटात सापडल्याचे दिसून येत आहे.पाच वर्षात एकच हंगाम चांगलाजिल्ह्यामध्ये २०१४-१५ व २०१५-१६ या दोन वर्षात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे खरीप व रब्बी हंगामातून शेतकºयांच्या हाती काहीच लागले नाही. परिणामी जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला. त्यानंतर शेतकºयांची अवस्था लक्षात घेता बँकांनी २०१६ मध्ये पीक कर्जाच्या माध्यमातून तब्बल १४०० कोटी रुपये उपलब्ध करुन दिले. त्यानंतर शेतकºयांनी या पैशातून २०१६-१७ ची खरीप पेरणी केली. या हंगामात जूनपासूनच समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकºयांची पिके बहरली. त्यातून शेतकºयांनी विक्रमी उत्पादन घेतले; परंतु, बाजारपेठेत शेतकºयांना समाधानकारक भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक कोंडीत सापडले. शासनाला जिल्ह्यामध्ये हमीभाव खरेदी केंद्र सुरु करावे लागले. त्यानंतर २०१७-१८ या खरीप हंगामात शेतकºयांनी ५ लाख हेक्टरवर पेरणी केली. त्यानंतर दोन महिने जिल्ह्यात एकही समाधानकारक पाऊस झाला नाही. परिणामी सोयाबीन, मूग, उडीद ही पिके करपून गेली. तर कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीने हल्ला चढविल्याने शेतकºयांना उत्पन्न मिळाले नाही. २०१८-१९ च्या खरीप हंगामात आतापर्यंत ४ लाख ७० हजार ७९२ हेक्टरवर पेरणी झाली आहे; परंतु, सलग २० दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने शेतकºयांमध्ये अस्वस्था निर्माण झाली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीRainपाऊस