शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

परभणी : नोंदणी लाखांत; काम करणारे मात्र हजारांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 00:06 IST

दुष्काळी परिस्थितीत रोजगार हमीची कामे उपलब्ध करुन दिल्यानंतरही मजुरांचे कामाच्या शोधार्थ होणारे स्थलांतर थांबलेले नाही. रोहयोकडे मजुरांच्या नोंदणीचा नुसताच आकडा फुगला आहे. मात्र काम मागणाऱ्या मजुरांची संख्या मोजकीच असून, रोहयोच्या कामापेक्षा मोठ्या शहरात जाऊन काम करण्यावरच मजुरांचा भर आहे. परिणामी मजुरांचे स्थलांतर रोखण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दुष्काळी परिस्थितीत रोजगार हमीची कामे उपलब्ध करुन दिल्यानंतरही मजुरांचे कामाच्या शोधार्थ होणारे स्थलांतर थांबलेले नाही. रोहयोकडे मजुरांच्या नोंदणीचा नुसताच आकडा फुगला आहे. मात्र काम मागणाऱ्या मजुरांची संख्या मोजकीच असून, रोहयोच्या कामापेक्षा मोठ्या शहरात जाऊन काम करण्यावरच मजुरांचा भर आहे. परिणामी मजुरांचे स्थलांतर रोखण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे.स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत आणि वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांची कामे रोजगार हमीतून केली जातात. चालू आठवड्याच्या अहवालानुसार ग्रामपयंचायतीची ५८१ आणि यंत्रणांची १४३ अशी जिल्ह्यात ७२४ कामे सुरू आहेत. या कामांवर २९ हजार २७३ मजूर काम करीत आहेत. त्यात सिंचन विहीर, पुनर्भरण, इंदिरा आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे बांधकाम ही कामे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तर रोपवाटिका, तुतीलागवड ही कामे यंत्रणांच्या साह्याने केली जात आहेत. जिल्ह्यातील २ लाख २३ हजार ४३० मजुरांनी रोजगार हमी योजनेकडे नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या मजुरांपैकी मागील दोन वर्षांत ज्यांनी कामे केली, त्यांना ‘अ‍ॅक्टीव्ह मजूर’ म्हणून गणले जाते. असे १ लाख १९ हजार ४३ अ‍ॅक्टीव्ह मजूर जिल्ह्यात आहेत. मात्र प्रत्यक्षात मागील दोन महिन्यात रोहयोकडे काम मागणाºया मजुरांची संख्या केवळ २१ हजार एवढीच असून, त्यापैकी २० हजार ७६७ मजुरांना रोहयोने काम पुरविले आहे. रोजगार हमी योजनेकडे सद्यस्थितीला ग्रामपंचायतीची ५ हजार ५७३ आणि यंत्रणांची ४ हजार २२९ अशी ९ हजार ८०२ कामे उपलब्ध आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात काम उपलब्ध असताना मजुरांनी या कामांकडे पाठ फिरवली आहे. या कामावर मिळणारी अत्यल्प मजुरी, मजुरीची रक्कम मिळविण्यासाठी करावी लागणारी कागदपत्रांची जमवा जमव मजुरांना त्रासदायक वाटत असल्यानेच रोहयोकडे मजुरांनी पाठ फिरविली आहे.रोहयोवर २९ हजार मजूर४मागील आठवड्यामध्ये जिल्ह्यात रोहयोची ७२४ कामे सुरु होती. या कामांवर २९ हजार २७३ मजूर होते. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीचीच कामे अधिक कामे होती. त्यामध्ये गंगाखेड तालुक्यात ६५, जिंतूर ६४, मानवत ४२, पालम १६, परभणी ९४, पाथरी १६, पूर्णा १०५, सेलू १११ आणि सोनपेठ तालुक्यात ग्रा.पं.ची ६८ कामे सुरु आहेत.४तसेच शासकीय यंत्रणांची १४३ कामे सुरु आहेत. त्यामध्ये गंगाखेड तालुक्यात १२, जिंतूर तालुक्यात ३, मानवत ३०, पालम २, परभणी २८ आणि पूर्णा तालुक्यात ६८ कामे सुरु आहेत. पाथरी, सेलू, सोनपेठ या तीन तालुक्यात शासकीय यंत्रणेचे एकही काम सुरु नाही, हे विशेष.प्रशासनाचे दुर्लक्ष४दुष्काळी परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांसह तलाव कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे तलावातील गाळ उपसण्याचे काम या काळात होऊ शकते. मात्र शासकीय यंत्रणांमधील कृषी विभाग, पाटबंधारे विभाग, जलसंपदा विभाग या विभागातून अशी कामे सुरु करण्यात आली नाहीत. त्यामुळे कामेही होईनात आणि मजुरांच्या हाताला कामही मिळेना, अशी परिस्थिती आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळGovernmentसरकार