शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : टंचाई कामांचा दोन कोटींचा निधी प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 00:47 IST

मागील वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये जिल्हा परिषदेने राबविलेल्या पाणीटंचाई उपाययोजनांचा निधी प्रशासनाला प्राप्त झाला असून, या योजनांच्या खर्चापोटी २ कोटी २३ लाख ६१ हजार रुपये जिल्हा परिषदेला वितरित करण्यात आले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मागील वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये जिल्हा परिषदेने राबविलेल्या पाणीटंचाई उपाययोजनांचा निधी प्रशासनाला प्राप्त झाला असून, या योजनांच्या खर्चापोटी २ कोटी २३ लाख ६१ हजार रुपये जिल्हा परिषदेला वितरित करण्यात आले आहेत़ग्रामीण व नागरी भागातील पाणीटंचाईच्या निवारणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत टंचाईकृती आराखडा मंजूर करून कामे केली जातात़ मागील वर्षी जिल्ह्यामध्ये पाणीटंचाई निर्माण झाली होती़ त्या काळात जिल्हा परिषदेने टंचाई निवारणाची अनेक कामे हाती घेतली़ या कामांच्या खर्चापोटी जिल्हा परिषदेकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे निधीची मागणी करण्यात आली होती़ हा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयास सादर करण्यात आला़ विभागीय आयुक्त कार्यालयाने मंजुरी दिल्यानंतर २०१७-१८ मध्ये घेण्यात आलेल्या उपाययोजनांचा खर्च भागविण्यासाठी २ कोटी २३ लाख ६१ हजार रुपयांचा निधी नुकताच वितरित करण्यात आला आहे़मागील वर्षी जिल्ह्यात टंचाई परिस्थिती निर्माण झाली होती़ अनेक गावांमध्ये जलस्त्रोत आटल्याने जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणाची कामे हाती घेतली़ जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागात विहीर अधिग्रहण, टँकरने पाणीपुरवठा, नळ योजनांची दुरुस्ती ही कामे केली़ दरम्यान, टंचाई निवारणाची कामे घेतली असली तरी त्यावर झालेल्या खर्चाला अद्याप मंजुरी मिळाली नव्हती़ त्यामुळे कोट्यवधीची देयके थकीत होती़ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी या संदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे पाठविला़ त्यास तब्बल एक वर्षानंतर मंजुरी मिळाली असून, हा निधी जिल्हा परिषदेला वितरित करण्यात आला आहे़ निधी वितरित करताना जिल्हाधिकाºयांनी जि़प़ला काही सूचनाही केल्या आहेत़ त्यामध्ये ज्या प्रायोजनासाठी निधीची मागणी नोंदविली, त्याच उपाययोजनांसाठी खर्च होईल, याची दक्षता घ्यावी़ हा निधी प्रपंजी लेखाखाते अथवा बँक खात्यात न ठेवता थेट कंत्राटदारांना वितरित केला जाईल, याची दक्षता घ्यावी़ निधीचे वितरण करताना यापूर्वी संबंधित योजनांना निधी वितरित झाला नाही, याची खात्री करावी़ शासनाच्या निर्देशानुसार योजनेच्या सुरुवातीस ५० टक्के आणि योजना पूर्ण झाल्यानंतर ५० टक्के निधी वितरित करणे आवश्यक आहे़ तेव्हा ग्रामीण योजनांबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी सदर योजना १०० टक्के पूर्ण झाल्याची खात्री केल्याशिवाय संपूर्ण निधी वितरित करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत़७७६ कामांसाठी वितरित केला निधीजिल्हा परिषदेमार्फत विविध कामे हाती घेतली होती़ त्यामध्ये नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीची १९, विंधन विहिरींच्या विशेष दुरुस्तीची १९९, नवीन विंधन विहिरीसाठी १७५, तात्पुरती पुरक नळ योजनेची ४, टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ४६ आणि खाजगी विहीर अधिग्रहणाचे ३२३ कामे मागील वर्षी पूर्ण करण्यात आली होती़ जिल्हाधिकाºयांनी नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीसाठी ८ लाख ५९ हजार ६२९, विंधन विहिरींच्या विशेष दुरुस्तीसाठी २८ लाख ९१ हजार २९६, नवीन विंधन विहिरींसाठी ९५ लाख ५३ हजार ४२, तात्पुरत्या पुरक नळ योजनेसाठी ११ लाख ५१ हजार ५३३, टँकरसाठी ७९ लाख ५ हजार ५०० रुपये वितरित करण्यात आले आहेत़लाभार्थ्यांची गैरसोय होणार दूरमागील वर्षीच्या टंचाई काळत कंत्राटदारांनी कामे केली़ परंतु, त्यांची बिले रखडली होती़ यावर्षी देखील टंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, आता कामे करताना कंत्राटदारांसमोर अडचणी उभ्या राहत होत्या़ त्यामुळे थकबाकी अदा करावी, यासाठी वारंवार पाठपुरावा केला जात होता़ जिल्हाधिकाºयांनी ही संपूर्ण बिले अदा केल्यामुळे कंत्राटदारांना ही बिले मिळणार आहेत़ त्यामुळे यावर्षी टंचाईच्या काळात नव्याने कामे हाती घेण्यासाठी सोयीचे होणार आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीfundsनिधीzpजिल्हा परिषद