शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
4
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
5
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
6
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
7
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
8
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
9
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
10
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
11
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
12
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
13
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
14
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
15
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
16
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
17
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
18
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
19
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
20
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा

परभणी : दुधनाच्या पाण्यासह चाऱ्याचा प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे मांडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 23:56 IST

निम्न दुधना प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडावे, यासह चारा, टँकर, विहीर, बोअर अधिग्रहण आदी प्रश्न जिल्ह्यातील सरपंचांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी :निम्न दुधना प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडावे, यासह चारा, टँकर, विहीर, बोअर अधिग्रहण आदी प्रश्न जिल्ह्यातील सरपंचांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ मे रोजी मुंबईत दुष्काळ आढावा बैठक घेतली. या बैठकी दरम्यान परभणी जिल्ह्यातील ३३ सरपंचांसह ग्रामसेवक, जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी यांच्याशी त्यांनी आॅडिओ कॉन्फ्रन्स कॉलच्या माध्यमातून संवाद साधत जिल्ह्यातील परिस्थिती जाणून घेतली. त्यावेळी निम्न दुधना प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडावे, जनावरांसाठी चारा उपलब्ध करुन द्यावा, विहीर, बोअर अधिग्रहण झाले नाही, रोहयोची कामे सुरु करावीत, चारा छावण्या सुरु कराव्यात, जायकवाडीचे पाणी मुद्गल बंधाºयात सोडावे, अधिग्रहणाच्या जाचक अटी रद्द कराव्यात, मुळी बंधाºयाला दरवाजे बसवावेत, साखर कारखान्यांकडे थकित असलेले पैसे आदी विविध प्रश्न सरपंचांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडले. या संवादादरम्यान सेलू तालुक्यातील राव्हा येथील सरपंच रमेश शिंदे यांनी टँकर मंजुरीचे अधिकार ग्रामपंचायतीला द्यावेत, अशी मागणी केली.या संवादा दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जिल्ह्यातील दुष्काळाची नोंद घेऊन उपाययोजना सुरु केल्या आहेत. शया उपाययोजनांची अंमलबजावणी योग्यरितीने होत आहे का, याची माहिती घेण्यासाठी सरपंचांशी संवाद साधला जात आहे. आवश्यक त्या ठिकाणी तातडीने टँकरची व्यवस्था करावी, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या. अधिग्रहित विहिरींचे देयके पाणी भरलेल्या टँकरच्या क्षमतेनुसार दिली जाणार आहेत. वीज बिलाअभावी बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजना सुरु करण्यासाठी २ कोटी २६ लाख ४४ हजार रुपयांची रक्कम दिली असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात एकही चारा छावणी सुरु झाली नसली तरी आवश्यक त्या ठिकाणी शासकीय चारा छावण्या सुरु कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.जिल्ह्यातील या सरपंचांनी साधला संवादच्जिंतूर तालुक्यातील मालेगाव येथील वैजनाथ कदम, बेलोरा येथील सीमा कदम, सेलू तालुक्यातील सिद्धनाथ बोरगाव येथील चंद्रभागा वाघमारे, रवळगाव येथील राधिका रोडगे, राव्हा येथील रमेश शिंदे, राजूर येथील विलास शेवाळे, सेलवाडी येथील सोळंके, बोरकिनी येथील शोभा ढाले, मानवत तालुक्यातील करंजीचे सुभाष जाधव, रामेटाकळी येथील सुशिला काळे, भोसा येथील संजय प्रधान, सोमठाणा येथील राजाराम कुकडे, पाथरी तालुक्यातील उमरा येथील दत्ता बिनोळे.च् मुद्गल येथील सुमित्रा केंद्रे, मंजरथ येथील अंगद काळे, हादगाव येथील सीमा नखाते, गोपेगाव येथील सुदामती गिराम, सोनपेठ तालुक्यातील कोरटेक येथील मनिषा सूर्यवंशी, वाडी पिंपळगाव येथील अमरदीप नागरे.च् गंगाखेड तालुक्यातील मैराळ सावंगी येथील मीनाक्षी जाधव, महातपुरी येथील प्रदीप शिंदे, धनगर मोहा येथील सारिका खांडेकर, अंतरवेली येथील सीताबाई मुंडे, पालम तालुक्यातील मोजमाबाद येथील शेख कादर याकूब, नाव्हलगाव येथील संगीता मुलगीर, लांडकवाडी येथील मारोती माने, पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथील गणेश काळे, दगडवाडी येथील बालाजी वाघमारे, माटेगाव येथील कलाबाई कºहाळे.च् परभणी तालुक्यातील परवीन पटेल, सोन्ना येथील तारामती दंडवते, शिर्शी बु. येथील रोहिणी जाधव, साळापुरी येथील सतीश घाटगे आदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट संवाद साधून दुष्काळाच्या अनुषंगाने आपल्या भागातील समस्या मांडल्या.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीriverनदीdroughtदुष्काळ