शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : दुधनाच्या पाण्यासह चाऱ्याचा प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे मांडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 23:56 IST

निम्न दुधना प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडावे, यासह चारा, टँकर, विहीर, बोअर अधिग्रहण आदी प्रश्न जिल्ह्यातील सरपंचांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी :निम्न दुधना प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडावे, यासह चारा, टँकर, विहीर, बोअर अधिग्रहण आदी प्रश्न जिल्ह्यातील सरपंचांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ मे रोजी मुंबईत दुष्काळ आढावा बैठक घेतली. या बैठकी दरम्यान परभणी जिल्ह्यातील ३३ सरपंचांसह ग्रामसेवक, जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी यांच्याशी त्यांनी आॅडिओ कॉन्फ्रन्स कॉलच्या माध्यमातून संवाद साधत जिल्ह्यातील परिस्थिती जाणून घेतली. त्यावेळी निम्न दुधना प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडावे, जनावरांसाठी चारा उपलब्ध करुन द्यावा, विहीर, बोअर अधिग्रहण झाले नाही, रोहयोची कामे सुरु करावीत, चारा छावण्या सुरु कराव्यात, जायकवाडीचे पाणी मुद्गल बंधाºयात सोडावे, अधिग्रहणाच्या जाचक अटी रद्द कराव्यात, मुळी बंधाºयाला दरवाजे बसवावेत, साखर कारखान्यांकडे थकित असलेले पैसे आदी विविध प्रश्न सरपंचांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडले. या संवादादरम्यान सेलू तालुक्यातील राव्हा येथील सरपंच रमेश शिंदे यांनी टँकर मंजुरीचे अधिकार ग्रामपंचायतीला द्यावेत, अशी मागणी केली.या संवादा दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जिल्ह्यातील दुष्काळाची नोंद घेऊन उपाययोजना सुरु केल्या आहेत. शया उपाययोजनांची अंमलबजावणी योग्यरितीने होत आहे का, याची माहिती घेण्यासाठी सरपंचांशी संवाद साधला जात आहे. आवश्यक त्या ठिकाणी तातडीने टँकरची व्यवस्था करावी, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या. अधिग्रहित विहिरींचे देयके पाणी भरलेल्या टँकरच्या क्षमतेनुसार दिली जाणार आहेत. वीज बिलाअभावी बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजना सुरु करण्यासाठी २ कोटी २६ लाख ४४ हजार रुपयांची रक्कम दिली असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात एकही चारा छावणी सुरु झाली नसली तरी आवश्यक त्या ठिकाणी शासकीय चारा छावण्या सुरु कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.जिल्ह्यातील या सरपंचांनी साधला संवादच्जिंतूर तालुक्यातील मालेगाव येथील वैजनाथ कदम, बेलोरा येथील सीमा कदम, सेलू तालुक्यातील सिद्धनाथ बोरगाव येथील चंद्रभागा वाघमारे, रवळगाव येथील राधिका रोडगे, राव्हा येथील रमेश शिंदे, राजूर येथील विलास शेवाळे, सेलवाडी येथील सोळंके, बोरकिनी येथील शोभा ढाले, मानवत तालुक्यातील करंजीचे सुभाष जाधव, रामेटाकळी येथील सुशिला काळे, भोसा येथील संजय प्रधान, सोमठाणा येथील राजाराम कुकडे, पाथरी तालुक्यातील उमरा येथील दत्ता बिनोळे.च् मुद्गल येथील सुमित्रा केंद्रे, मंजरथ येथील अंगद काळे, हादगाव येथील सीमा नखाते, गोपेगाव येथील सुदामती गिराम, सोनपेठ तालुक्यातील कोरटेक येथील मनिषा सूर्यवंशी, वाडी पिंपळगाव येथील अमरदीप नागरे.च् गंगाखेड तालुक्यातील मैराळ सावंगी येथील मीनाक्षी जाधव, महातपुरी येथील प्रदीप शिंदे, धनगर मोहा येथील सारिका खांडेकर, अंतरवेली येथील सीताबाई मुंडे, पालम तालुक्यातील मोजमाबाद येथील शेख कादर याकूब, नाव्हलगाव येथील संगीता मुलगीर, लांडकवाडी येथील मारोती माने, पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथील गणेश काळे, दगडवाडी येथील बालाजी वाघमारे, माटेगाव येथील कलाबाई कºहाळे.च् परभणी तालुक्यातील परवीन पटेल, सोन्ना येथील तारामती दंडवते, शिर्शी बु. येथील रोहिणी जाधव, साळापुरी येथील सतीश घाटगे आदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट संवाद साधून दुष्काळाच्या अनुषंगाने आपल्या भागातील समस्या मांडल्या.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीriverनदीdroughtदुष्काळ