शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

परभणी : दुधनाच्या पाण्यासह चाऱ्याचा प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे मांडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 23:56 IST

निम्न दुधना प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडावे, यासह चारा, टँकर, विहीर, बोअर अधिग्रहण आदी प्रश्न जिल्ह्यातील सरपंचांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी :निम्न दुधना प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडावे, यासह चारा, टँकर, विहीर, बोअर अधिग्रहण आदी प्रश्न जिल्ह्यातील सरपंचांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ मे रोजी मुंबईत दुष्काळ आढावा बैठक घेतली. या बैठकी दरम्यान परभणी जिल्ह्यातील ३३ सरपंचांसह ग्रामसेवक, जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी यांच्याशी त्यांनी आॅडिओ कॉन्फ्रन्स कॉलच्या माध्यमातून संवाद साधत जिल्ह्यातील परिस्थिती जाणून घेतली. त्यावेळी निम्न दुधना प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडावे, जनावरांसाठी चारा उपलब्ध करुन द्यावा, विहीर, बोअर अधिग्रहण झाले नाही, रोहयोची कामे सुरु करावीत, चारा छावण्या सुरु कराव्यात, जायकवाडीचे पाणी मुद्गल बंधाºयात सोडावे, अधिग्रहणाच्या जाचक अटी रद्द कराव्यात, मुळी बंधाºयाला दरवाजे बसवावेत, साखर कारखान्यांकडे थकित असलेले पैसे आदी विविध प्रश्न सरपंचांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडले. या संवादादरम्यान सेलू तालुक्यातील राव्हा येथील सरपंच रमेश शिंदे यांनी टँकर मंजुरीचे अधिकार ग्रामपंचायतीला द्यावेत, अशी मागणी केली.या संवादा दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जिल्ह्यातील दुष्काळाची नोंद घेऊन उपाययोजना सुरु केल्या आहेत. शया उपाययोजनांची अंमलबजावणी योग्यरितीने होत आहे का, याची माहिती घेण्यासाठी सरपंचांशी संवाद साधला जात आहे. आवश्यक त्या ठिकाणी तातडीने टँकरची व्यवस्था करावी, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या. अधिग्रहित विहिरींचे देयके पाणी भरलेल्या टँकरच्या क्षमतेनुसार दिली जाणार आहेत. वीज बिलाअभावी बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजना सुरु करण्यासाठी २ कोटी २६ लाख ४४ हजार रुपयांची रक्कम दिली असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात एकही चारा छावणी सुरु झाली नसली तरी आवश्यक त्या ठिकाणी शासकीय चारा छावण्या सुरु कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.जिल्ह्यातील या सरपंचांनी साधला संवादच्जिंतूर तालुक्यातील मालेगाव येथील वैजनाथ कदम, बेलोरा येथील सीमा कदम, सेलू तालुक्यातील सिद्धनाथ बोरगाव येथील चंद्रभागा वाघमारे, रवळगाव येथील राधिका रोडगे, राव्हा येथील रमेश शिंदे, राजूर येथील विलास शेवाळे, सेलवाडी येथील सोळंके, बोरकिनी येथील शोभा ढाले, मानवत तालुक्यातील करंजीचे सुभाष जाधव, रामेटाकळी येथील सुशिला काळे, भोसा येथील संजय प्रधान, सोमठाणा येथील राजाराम कुकडे, पाथरी तालुक्यातील उमरा येथील दत्ता बिनोळे.च् मुद्गल येथील सुमित्रा केंद्रे, मंजरथ येथील अंगद काळे, हादगाव येथील सीमा नखाते, गोपेगाव येथील सुदामती गिराम, सोनपेठ तालुक्यातील कोरटेक येथील मनिषा सूर्यवंशी, वाडी पिंपळगाव येथील अमरदीप नागरे.च् गंगाखेड तालुक्यातील मैराळ सावंगी येथील मीनाक्षी जाधव, महातपुरी येथील प्रदीप शिंदे, धनगर मोहा येथील सारिका खांडेकर, अंतरवेली येथील सीताबाई मुंडे, पालम तालुक्यातील मोजमाबाद येथील शेख कादर याकूब, नाव्हलगाव येथील संगीता मुलगीर, लांडकवाडी येथील मारोती माने, पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथील गणेश काळे, दगडवाडी येथील बालाजी वाघमारे, माटेगाव येथील कलाबाई कºहाळे.च् परभणी तालुक्यातील परवीन पटेल, सोन्ना येथील तारामती दंडवते, शिर्शी बु. येथील रोहिणी जाधव, साळापुरी येथील सतीश घाटगे आदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट संवाद साधून दुष्काळाच्या अनुषंगाने आपल्या भागातील समस्या मांडल्या.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीriverनदीdroughtदुष्काळ