शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
3
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
4
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
5
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
6
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
7
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
8
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
9
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
10
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
11
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
12
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
13
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
14
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
15
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
18
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
19
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
20
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप

परभणी : टंचाई निवारणासाठी ५३९ विहिरींचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 12:41 AM

दरवर्षी उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी गावा-गावांत सार्वजनिक विहीर घेतली जात असून, या योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या रोजगार हमी योजना विभागाकडे ५३९ विहिरींचे प्रस्ताव दाखल झाले आहेत़ त्यापैकी १४३ विहिरींची कामे प्रत्यक्ष सुरू झाली आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दरवर्षी उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी गावा-गावांत सार्वजनिक विहीर घेतली जात असून, या योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या रोजगार हमी योजना विभागाकडे ५३९ विहिरींचे प्रस्ताव दाखल झाले आहेत़ त्यापैकी १४३ विहिरींची कामे प्रत्यक्ष सुरू झाली आहेत़उन्हाळ्यात ग्रामीण भागात पाण्याची टंचाई निर्माण होते़ टंचाई कालावधीत गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या जातात़ त्यावर लाखो रुपयांचा खर्च होतो़ दरवर्षीच ही परिस्थिती उद्भवते़ त्यावर मात करण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना व्हावी, टंचाईग्रस्त गावाला गावातच पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी ग्रामपंचायतस्तरावर गावातील सार्वजनिक जागेत विहीर घेण्याची योजना आखली आहे़ त्यानुसार परभणी जिल्ह्यात या योजनेला प्रारंभ झाला असून, ग्रामपंचायतींकडून सार्वजनिक विहिरींसाठी प्रस्ताव मागविले जात आहेत़ २२ सप्टेंबरपर्यंत जिल्हा परिषदेच्या नरेगा विभागाला ५३९ प्रस्ताव प्राप्त झाले असून, त्यापैकी १६९ प्रस्तावांना आॅनलाईन वर्ककोड देण्यात आला आहे़ तालुकास्तरीय समितीने ३९२ प्रस्तावांना मान्यता दिली असून, जिल्हास्तरीय समितीने त्यातील ३८७ प्रस्तावांना मंजुरी दिली आहे़ त्यापैकी १४३ गावांमध्ये सार्वजनिक विहीर घेण्याचे काम सुरू झाले आहे़ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेंतर्गत कामे सुरू करण्यात आली आहेत़ गावा-गावांत सार्वजनिक विहीर घेतल्याने त्या गावातील पाणीटंचाई दूर होणार असून, या माध्यमातून उन्हाळ्यामध्ये ग्रामवासियांना पाणी उपलब्ध होणार आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईdroughtदुष्काळ