शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : शेतकऱ्यांवर आता खत दरवाढीचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 00:39 IST

केंद्र शासनाने पालाशयुक्त खताच्या अनुदानात कपात केली आहे. त्यामुळे खत कंपन्यांनी रासायनिक खतांच्या दरामध्ये २५ ते १३० रुपयांपर्यंत भाव वाढ केली आहे. २०१८-१९ च्या खरीप व रब्बी हंगामात ५० किलोच्या बॅगमागे २५ ते १३० रुपये भाव वाढीने तब्बल ३ लाख ९० हजार रुपयांचा भूर्दंड सहन करावा लागणार आहे.

मारोती जुंबडे।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : केंद्र शासनाने पालाशयुक्त खताच्या अनुदानात कपात केली आहे. त्यामुळे खत कंपन्यांनी रासायनिक खतांच्या दरामध्ये २५ ते १३० रुपयांपर्यंत भाव वाढ केली आहे. २०१८-१९ च्या खरीप व रब्बी हंगामात ५० किलोच्या बॅगमागे २५ ते १३० रुपये भाव वाढीने तब्बल ३ लाख ९० हजार रुपयांचा भूर्दंड सहन करावा लागणार आहे.परभणी जिल्ह्यातील शेतकºयांचा खरीप व रब्बी हंगाम हा आर्थिक वाहिनी म्हणून ओळखला जातो. या दोन्ही हंगामात शेतकरी आपल्या जवळ जमा झालेली पुंजी बियाणे, औषधी व खतांवर खर्च करुन जुगाराचा डाव खेळतो. खरीप हंगामातील ६ व रब्बी हंगामातील ६ असे एकूण १२ महिने शेतकरी आपल्या शेतातील पिकांची मुलांप्रमाणे काळजी घेत जोपासना करुन उत्पन्न घेत असतो. जिल्ह्यामध्ये तीन वर्षे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. तर २०१७-१८ या खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, गहू या पिकातून शेतकºयांना अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अजूनही आर्थिक संकटातून वर आलेला नाही.सध्या शेतकरी पेरणीपूर्व मशागतीची कामे करीत आहे. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या तर जून महिन्यात खरीप हंगामातील पेरणी सुरु होणार आहे. गत खरीप हंगामातील पिकातून हाती काही लागले नसल्याने शेतकरी आगामी हंगामातील बी-बियाणे, औषधी व खतांचा विचार करत आहे. जीएसटीमधून सरकी बियाणांची जरी सुटका केली असेल तरी पिकांसाठी अत्यावश्यक असलेल्या औषधी मात्र जीएसटीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे शेतकºयांना गत खरीप हंगामापासून औषधांची किंमत व त्यावरील जीएसटी असा भार सहन करावा लागत आहे.त्यातच येणाºया खरीप हंगामापासून केंद्र शासनाने पालाशयुक्त खताच्या अनुदानात कपात केली. त्यामुळे रासायनिक खत कंपन्यांनी खतांचे भाव २५ ते १३० रुपयापर्यंत वाढविले आहेत.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने यावर्षी खरीप हंगामात ५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांना यावर्षीच्या खरीप हंगामात ९० मेट्रीक टन वेगवेगळ्या रासायनिक खताची गरज भासणार आहे. तर येणाºया रब्बी हंगामासाठी ६० मे.टन खताची आवश्यकता असते. त्यामुळे २०१८-१९ या आर्थिक वर्षात शेतकºयांना दोन्ही हंगामासाठी १५० मे. टन खताची गरज भासते.एका ५० किलोच्या खताची बॅग २५ ते १३० रुपये प्रमाणे भाववाढ केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांना ३ लाख ९० हजार रुपयांचा भार खताच्या दरवाढीपोटी सहन करावा लागणार आहे.अशी असणार आहे खताची दरवाढसध्या बाजारपेठेमध्ये नवीन दराचा खत उपलब्ध झाला आहे. त्यानुसार प्रति ५० किलो खताच्या बॅगचा भाव असा- १०:२६:२६ या रासायनिक खताचा जुना दर १०५० असा होता. तो आता ८० रुपयांनी दरवाढ होऊन ११३५ रुपयांना मिळणार आहे. १२:३२:१६ चा जुना दर १०६० असा होता. त्यात ८० रुपयांनी दरवाढ होऊन ११४० रुपये असा भाव झाला आहे. पोटॅशचा जुना दर ६२० रुपये असा होता. तो आता ६७० रुपयांना झाला आहे. १५:१५ हा ८८७ रुपयांना मिळत होता. तो आता ९७० रुपयांवर जावून पोहचला आहे. १९:१९: १९ हा खत १०७१ रुपयांना मिळत होता. तो आता ११४० वर पोहचला आहे. डीएपीची बॅग ११०० रुपयांना मिळत होती. त्याते १३० रुपयांची दरवाढ झाली आहे. महाधन कंपनीचा २४:२४:० हा १०१५ रुपयांना मिळत होता. तो आता ९५ रुपयांची दरवाढ होऊन १११० रुपयांना मिळणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीMONEYपैसाFarmerशेतकरीagricultureशेती