शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांनी लावली कुटुंबातील सदस्यांची बिनविरोध वर्णी?; 'सेटलमेंट-अ‍ॅडजस्टमेंट'चे राजकारण
2
KDMC Election 2026: 'निवडणुकीतून माघार घ्या', ठाकरेंच्याच जिल्हाप्रमुखांनी उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला लावले?
3
"जे झालं ते चुकीचं! बांगलादेश संघाने भारतात यायचं की नाही ते..." हरभजन सिंग नेमकं काय म्हणाला?
4
निकोलस मादुरो या भारतीय बाबाचे आहेत भक्त; त्यांच्या कार्यालयातील भींतीवरही भला मोठा फोटो
5
महिला IAS अधिकाऱ्याचे भाड्याने घर, रात्रीचे चालायचे काळे धंदे; छाप्यात प्रत्येक खोलीत सापडल्या मुली
6
"...म्हणून नारायण राणे निवृत्त होत असतील"; सुनील तटकरेंचे सूचक विधान, काय म्हणाले?
7
"राहुल नार्वेकरांनी विधानसभा अध्यक्षपदाची प्रतिष्ठा घालवली, त्यांना बडतर्फ करा",  काँग्रेसची मागणी
8
ST निविदा प्रक्रियेत दिरंगाई केल्यास...; मंत्री प्रताप सरनाईक यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम
9
"आई-बाबा मला माफ करा, मी चांगली मुलगी होऊ शकली नाही", चिठ्ठी लिहून मुलीचा आयुष्याचा शेवट!
10
एकाच फंडातून शेअर्स, कर्ज आणि सोने-चांदीत गुंतवणूक; मल्टी अॅसेट फंडांचा २०२५ मध्ये १६% नफा
11
बापाने १८ वर्षाच्या लेकीची फावड्याने केली हत्या! वेटलिफ्टिंगमध्ये 'गोल्ड', बी.कॉमचे घेत होती शिक्षण
12
Ravindra Chavan : "गोंधळाचे पाप माझ्या पदरात टाका, पण दगाबाजी करू नका", रवींद्र चव्हाण यांचं आवाहन
13
'५-डे वीक'साठी बँक कर्मचाऱ्यांकडून संपाचं हत्यार! 'या' तारखांना तुमचे आर्थिक व्यवहार अडकणार?
14
‘भाजपा महायुतीची सत्तेची भूक लोकशाही गिळंकृत करण्यापर्यंत पोहचली’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
15
मुस्तफिजूर वाद पेटला! बांगलादेश भारताबाहेर खेळण्यासाठी अडून बसला; BCCI ला करोडोंचा फटका...
16
काकीवर पुतण्याचा जीव जडला, थेट काकाचा काटा काढला; रात्रभर सुरू असलेल्या कॉल्सनी पोलखोल
17
Nashik Municipal Election 2026 : कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष; तीन माजी महापौर मात्र रिंगणात, कोण राखणार गड?
18
Makeup Viral Video: मेकअपनंतर तरुणीला ओळखणंही झालं कठीण; तरुण म्हणाले, 'हा तर विश्वासघात!'
19
असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेत गोंधळ; पोलिसांना करावा लागला बळाचा वापर!
20
उमर खालिद, शरजिल इमामचा मुक्कम तुरुंगातच, सर्वोच्च न्यायालायने 'असं' कारण देत जामीन अर्ज फेटाळला
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : शेतकऱ्यांवर आता खत दरवाढीचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 00:39 IST

केंद्र शासनाने पालाशयुक्त खताच्या अनुदानात कपात केली आहे. त्यामुळे खत कंपन्यांनी रासायनिक खतांच्या दरामध्ये २५ ते १३० रुपयांपर्यंत भाव वाढ केली आहे. २०१८-१९ च्या खरीप व रब्बी हंगामात ५० किलोच्या बॅगमागे २५ ते १३० रुपये भाव वाढीने तब्बल ३ लाख ९० हजार रुपयांचा भूर्दंड सहन करावा लागणार आहे.

मारोती जुंबडे।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : केंद्र शासनाने पालाशयुक्त खताच्या अनुदानात कपात केली आहे. त्यामुळे खत कंपन्यांनी रासायनिक खतांच्या दरामध्ये २५ ते १३० रुपयांपर्यंत भाव वाढ केली आहे. २०१८-१९ च्या खरीप व रब्बी हंगामात ५० किलोच्या बॅगमागे २५ ते १३० रुपये भाव वाढीने तब्बल ३ लाख ९० हजार रुपयांचा भूर्दंड सहन करावा लागणार आहे.परभणी जिल्ह्यातील शेतकºयांचा खरीप व रब्बी हंगाम हा आर्थिक वाहिनी म्हणून ओळखला जातो. या दोन्ही हंगामात शेतकरी आपल्या जवळ जमा झालेली पुंजी बियाणे, औषधी व खतांवर खर्च करुन जुगाराचा डाव खेळतो. खरीप हंगामातील ६ व रब्बी हंगामातील ६ असे एकूण १२ महिने शेतकरी आपल्या शेतातील पिकांची मुलांप्रमाणे काळजी घेत जोपासना करुन उत्पन्न घेत असतो. जिल्ह्यामध्ये तीन वर्षे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. तर २०१७-१८ या खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, गहू या पिकातून शेतकºयांना अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अजूनही आर्थिक संकटातून वर आलेला नाही.सध्या शेतकरी पेरणीपूर्व मशागतीची कामे करीत आहे. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या तर जून महिन्यात खरीप हंगामातील पेरणी सुरु होणार आहे. गत खरीप हंगामातील पिकातून हाती काही लागले नसल्याने शेतकरी आगामी हंगामातील बी-बियाणे, औषधी व खतांचा विचार करत आहे. जीएसटीमधून सरकी बियाणांची जरी सुटका केली असेल तरी पिकांसाठी अत्यावश्यक असलेल्या औषधी मात्र जीएसटीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे शेतकºयांना गत खरीप हंगामापासून औषधांची किंमत व त्यावरील जीएसटी असा भार सहन करावा लागत आहे.त्यातच येणाºया खरीप हंगामापासून केंद्र शासनाने पालाशयुक्त खताच्या अनुदानात कपात केली. त्यामुळे रासायनिक खत कंपन्यांनी खतांचे भाव २५ ते १३० रुपयापर्यंत वाढविले आहेत.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने यावर्षी खरीप हंगामात ५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांना यावर्षीच्या खरीप हंगामात ९० मेट्रीक टन वेगवेगळ्या रासायनिक खताची गरज भासणार आहे. तर येणाºया रब्बी हंगामासाठी ६० मे.टन खताची आवश्यकता असते. त्यामुळे २०१८-१९ या आर्थिक वर्षात शेतकºयांना दोन्ही हंगामासाठी १५० मे. टन खताची गरज भासते.एका ५० किलोच्या खताची बॅग २५ ते १३० रुपये प्रमाणे भाववाढ केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांना ३ लाख ९० हजार रुपयांचा भार खताच्या दरवाढीपोटी सहन करावा लागणार आहे.अशी असणार आहे खताची दरवाढसध्या बाजारपेठेमध्ये नवीन दराचा खत उपलब्ध झाला आहे. त्यानुसार प्रति ५० किलो खताच्या बॅगचा भाव असा- १०:२६:२६ या रासायनिक खताचा जुना दर १०५० असा होता. तो आता ८० रुपयांनी दरवाढ होऊन ११३५ रुपयांना मिळणार आहे. १२:३२:१६ चा जुना दर १०६० असा होता. त्यात ८० रुपयांनी दरवाढ होऊन ११४० रुपये असा भाव झाला आहे. पोटॅशचा जुना दर ६२० रुपये असा होता. तो आता ६७० रुपयांना झाला आहे. १५:१५ हा ८८७ रुपयांना मिळत होता. तो आता ९७० रुपयांवर जावून पोहचला आहे. १९:१९: १९ हा खत १०७१ रुपयांना मिळत होता. तो आता ११४० वर पोहचला आहे. डीएपीची बॅग ११०० रुपयांना मिळत होती. त्याते १३० रुपयांची दरवाढ झाली आहे. महाधन कंपनीचा २४:२४:० हा १०१५ रुपयांना मिळत होता. तो आता ९५ रुपयांची दरवाढ होऊन १११० रुपयांना मिळणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीMONEYपैसाFarmerशेतकरीagricultureशेती