शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

परभणी : शेतकऱ्यांवर आता खत दरवाढीचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 00:39 IST

केंद्र शासनाने पालाशयुक्त खताच्या अनुदानात कपात केली आहे. त्यामुळे खत कंपन्यांनी रासायनिक खतांच्या दरामध्ये २५ ते १३० रुपयांपर्यंत भाव वाढ केली आहे. २०१८-१९ च्या खरीप व रब्बी हंगामात ५० किलोच्या बॅगमागे २५ ते १३० रुपये भाव वाढीने तब्बल ३ लाख ९० हजार रुपयांचा भूर्दंड सहन करावा लागणार आहे.

मारोती जुंबडे।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : केंद्र शासनाने पालाशयुक्त खताच्या अनुदानात कपात केली आहे. त्यामुळे खत कंपन्यांनी रासायनिक खतांच्या दरामध्ये २५ ते १३० रुपयांपर्यंत भाव वाढ केली आहे. २०१८-१९ च्या खरीप व रब्बी हंगामात ५० किलोच्या बॅगमागे २५ ते १३० रुपये भाव वाढीने तब्बल ३ लाख ९० हजार रुपयांचा भूर्दंड सहन करावा लागणार आहे.परभणी जिल्ह्यातील शेतकºयांचा खरीप व रब्बी हंगाम हा आर्थिक वाहिनी म्हणून ओळखला जातो. या दोन्ही हंगामात शेतकरी आपल्या जवळ जमा झालेली पुंजी बियाणे, औषधी व खतांवर खर्च करुन जुगाराचा डाव खेळतो. खरीप हंगामातील ६ व रब्बी हंगामातील ६ असे एकूण १२ महिने शेतकरी आपल्या शेतातील पिकांची मुलांप्रमाणे काळजी घेत जोपासना करुन उत्पन्न घेत असतो. जिल्ह्यामध्ये तीन वर्षे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. तर २०१७-१८ या खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, गहू या पिकातून शेतकºयांना अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अजूनही आर्थिक संकटातून वर आलेला नाही.सध्या शेतकरी पेरणीपूर्व मशागतीची कामे करीत आहे. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या तर जून महिन्यात खरीप हंगामातील पेरणी सुरु होणार आहे. गत खरीप हंगामातील पिकातून हाती काही लागले नसल्याने शेतकरी आगामी हंगामातील बी-बियाणे, औषधी व खतांचा विचार करत आहे. जीएसटीमधून सरकी बियाणांची जरी सुटका केली असेल तरी पिकांसाठी अत्यावश्यक असलेल्या औषधी मात्र जीएसटीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे शेतकºयांना गत खरीप हंगामापासून औषधांची किंमत व त्यावरील जीएसटी असा भार सहन करावा लागत आहे.त्यातच येणाºया खरीप हंगामापासून केंद्र शासनाने पालाशयुक्त खताच्या अनुदानात कपात केली. त्यामुळे रासायनिक खत कंपन्यांनी खतांचे भाव २५ ते १३० रुपयापर्यंत वाढविले आहेत.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने यावर्षी खरीप हंगामात ५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांना यावर्षीच्या खरीप हंगामात ९० मेट्रीक टन वेगवेगळ्या रासायनिक खताची गरज भासणार आहे. तर येणाºया रब्बी हंगामासाठी ६० मे.टन खताची आवश्यकता असते. त्यामुळे २०१८-१९ या आर्थिक वर्षात शेतकºयांना दोन्ही हंगामासाठी १५० मे. टन खताची गरज भासते.एका ५० किलोच्या खताची बॅग २५ ते १३० रुपये प्रमाणे भाववाढ केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांना ३ लाख ९० हजार रुपयांचा भार खताच्या दरवाढीपोटी सहन करावा लागणार आहे.अशी असणार आहे खताची दरवाढसध्या बाजारपेठेमध्ये नवीन दराचा खत उपलब्ध झाला आहे. त्यानुसार प्रति ५० किलो खताच्या बॅगचा भाव असा- १०:२६:२६ या रासायनिक खताचा जुना दर १०५० असा होता. तो आता ८० रुपयांनी दरवाढ होऊन ११३५ रुपयांना मिळणार आहे. १२:३२:१६ चा जुना दर १०६० असा होता. त्यात ८० रुपयांनी दरवाढ होऊन ११४० रुपये असा भाव झाला आहे. पोटॅशचा जुना दर ६२० रुपये असा होता. तो आता ६७० रुपयांना झाला आहे. १५:१५ हा ८८७ रुपयांना मिळत होता. तो आता ९७० रुपयांवर जावून पोहचला आहे. १९:१९: १९ हा खत १०७१ रुपयांना मिळत होता. तो आता ११४० वर पोहचला आहे. डीएपीची बॅग ११०० रुपयांना मिळत होती. त्याते १३० रुपयांची दरवाढ झाली आहे. महाधन कंपनीचा २४:२४:० हा १०१५ रुपयांना मिळत होता. तो आता ९५ रुपयांची दरवाढ होऊन १११० रुपयांना मिळणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीMONEYपैसाFarmerशेतकरीagricultureशेती