शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

परभणी : भोगाव देवी पर्यटन स्थळासाठी चळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 00:12 IST

: जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी परिसरातील संस्थानच्या विस्तीर्ण अशा ७० एकर परिसरावर पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी चळवळ उभा ठाकली असून ७ जुलैपासून या चळवळीला प्रत्यक्षात प्रारंभ होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी परिसरातील संस्थानच्या विस्तीर्ण अशा ७० एकर परिसरावर पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी चळवळ उभा ठाकली असून ७ जुलैपासून या चळवळीला प्रत्यक्षात प्रारंभ होत आहे.राज्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात होत असलेली घट दूर करण्याच्या उद्देशाने जिंंतूर येथील अण्णासाहेब जगताप यांनी ‘एक मूल ३० झाडे’ हे अभियान सुरू केले आहे. याच अभियानाची कास पकडत जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी परिसरात पर्यटनस्थळ विकसित करण्याची संकल्पना मांडण्यात आली. भोगाव येथील रवी देशमुख यांच्या समवेत अभियानातील १०० सक्रीय सदस्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला.भोगाव देवी परिसरात मोठा तलाव असून संस्थानची सुमारे ७० एकर जमीन आहे. या जमिनीवर फळझाडे लावली जाणार आहेत. त्यासाठी दोन दिवसांपासून अभियानातील सदस्य, ग्रामस्थ सरसावले आहेत. झाडे लावण्यासाठी खड्डे खोदण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तलाव परिसर, संस्थानच्या संपूर्ण जमिनीवर सुमारे ५० हजारांपेक्षा अधिक फळझाडे लावली जाणार आहेत. ही फळझाडे लावताना दीर्घ कालीन टिकणारी अंबा, चिंच, बिबा, जांभूळ, कवट या फळ झाडांची निवड केली जाणार आहे.७ जुलै रोजी सकाळी १० वाजता या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांच्या हस्ते होणार आहे. देवी साहेब संस्थानचे अध्यक्ष गुलाबचंद राठी, साहित्यिक प्रा.डॉ. विनायक पवार, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, विभागीय वन अधिकारी व्ही.एन. सातपुते, अ‍ॅड. किरण दैठणकर, प्रा. विठ्ठल भूसारे, अक्षय येवारे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेश दरगड, आडत असोसिएशनचे अध्यक्ष सचिन देवकर, अभियानाचे नाशिक येथील विभागप्रमुख प्रा. ज्ञानेश्वर ढगे, आकाश कदम आदींची यावेळी उपस्थिती राहणार आहे. तत्पूर्वी भोगाव परिसरातून वृक्ष दिंडीही काढली जाणार असून यात भोगावसह परिसरातील गावांमधील शाळांचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या उपक्रमामुळे वृक्ष लागवड मोहिमेला चालना मिळणार आहे.पाच जिल्ह्यात राबविले जाते अभियानच्एक मूल ३० झाडं हे अभियान राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये राबविले जात आहे. त्यात परभणीसह हिंगोली, नांदेड, सोलापूर आणि नाशिक या जिल्ह्यांचा समावेश आहे.च्नैसर्गिक, आर्थिक दुष्काळ दूर करण्याच्या उद्देशाने ५० ते १०० वर्षापर्यंत टिकणारी फळझाडे लावणे हा या अभियानाचा मूळ उद्देश आहे. एका मुलाच्या नावाने ३० झाडे लावणे, त्या झाडांचे संगोपन करणे, शेतातील मोकळी जागा, गावातील सार्वजनिक ठिकाणे, ओसाड, गायरान जमीन या अभियानासाठी निवडली जाते. भोगाव संस्थानने यासाठी पुढाकार घेतला आहे.लोकसहभागातून कामे४हे अभियान राबविताना ते पूर्णत: लोकसहभागातून आणि श्रमदानातून राबविले जाते. जिंतूर तालुक्यासह राज्य भरातून अनेकांनी या अभियानात सहभाग नोंदविला आहे.४भोगाव येथे पर्यटनस्थळ विकासाची चळवळही याच अभियानातून हाती घेण्यात आली आहे. केवळ फळ झाडे लावणे हा एकमेव उद्देश नसून येथील तलावात बोटींग तसेच पर्यटनाची कामेही केली जाणार आहेत, असे अभियानाच्या सदस्यांनी सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळFarmerशेतकरी