शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
6
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
7
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
8
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
9
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
10
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
11
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
12
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
13
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
14
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
15
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
16
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
17
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
18
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
19
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
20
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई

परभणी : शेतकरी कुटुंबातील सदस्यही योजनेस पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 00:24 IST

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये आतापर्यंत केवळ ज्या शेतकऱ्याच्या नावावर सातबारा आहे. त्या शेतकºयाला शेती व्यवसाय करताना झालेल्या अपघातात मदत देण्यात येत होती; परंतु, कृषी व पशू संवर्धन विभागाने ३१ आॅगस्ट रोजी काढलेल्या एका शासन निर्णयानुसार खातेदार शेतकरी व त्याच्या कुटुंबातील एका सदस्यास या योजनेतून आता लाभ दिला जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये आतापर्यंत केवळ ज्या शेतकऱ्याच्या नावावर सातबारा आहे. त्या शेतकºयाला शेती व्यवसाय करताना झालेल्या अपघातात मदत देण्यात येत होती; परंतु, कृषी व पशू संवर्धन विभागाने ३१ आॅगस्ट रोजी काढलेल्या एका शासन निर्णयानुसार खातेदार शेतकरी व त्याच्या कुटुंबातील एका सदस्यास या योजनेतून आता लाभ दिला जाणार आहे.परभणी जिल्ह्यातील जवळपास ६ लाख शेतकरी शेती व्यवसाय करतात. शेती करीत असताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. खरीप व रब्बी हंगामात पिकांची काळजी घेण्यासाठी रात्री-अपरात्री शेतामध्ये राबावे लागते. शेती व्यवसाय करताना वीज पडणे, पूर, संर्प दंश, विंचू दंश, विजेचा शॉक बसणे आदी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकºयांना आपला जीव गमवावा लागतो. त्याच बरोबर रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात किंवा अन्य कारणामुळे शेतकºयांना अपघाताला सामोरे जावे लागते. त्यामुळे त्या शेतकºयाचे कुटुंब उघड्यावर येते. घरातील कर्ता व्यक्ती गेल्यामुळे कुटुंबाचे आर्थिक स्त्रोत बंद होऊन अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे अपघातग्रस्त शेतकºयास व त्याच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरीता राज्य शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना अंमलात आणली. या योजनेच्या माध्यमातून अपघात होऊन जीव गमावलेल्या शेतकºयांना २ लाख रुपयांपर्यंत मदत देण्यात येते; परंतु, या अगोदर शासनाच्या या योजनेतून ज्या शेतकºयांच्या नावावर सातबारा आहे, त्याच शेतकºयाला मदत देण्यात येत होती; परंतु, शेतकºयाच्या कुटुंबातील सदस्याला शेती काम करीत असताना जीव गमवावा लागला तर त्याला मदत मिळत नव्हती. त्यामुळे शेतकºयांसह विविध सामाजिक संघटनांच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. शेतकºयांच्या या मागणीचा विचार करुन राज्य शासनाच्या कृषी, पशूसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाच्या वतीने ३१ आॅगस्ट २०१९ रोजी महाराष्ट्र शासनाच्या अव्वर सचिव निता शिंदे यांच्या स्वाक्षरीने एक शासन निर्णय काढण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत विहित खातेदार शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील १० ते ७५ वयोगटातील एका सदस्यास शेती व्यवसाय करीत असताना मृत्यू ओढावल्यास या योजनेंतर्गत २ लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे.तीन वर्षात : १५७ प्रस्ताव सादर, ७५ प्रस्तावांनाच मिळाली मंजुरी४गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत २०१६ ते २०१९ या तीन वर्षात जिल्हाभरातून १५७ प्रस्ताव कृषी विभागाकडे सादर करण्यात आले होते. त्यापैकी कृषी विभागाने ७५ प्रस्ताव मंजूर केले आहेत. १४ प्रस्ताव नामंजूर करण्यात आले आहेत. यातील काही शेतकºयांना कृषी विभागाने मदतही दिली आहे.४त्यामुळे शेतकºयाच्या कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यानंतर या योजनेच्या माध्यमातून कुटुंबातील सदस्यांची उपजिविका भागविण्यासाठी मदत झाली आहे. त्यामुळे कृषी विभागानेही सादर झालेल्या प्रस्तावावरही तात्काळ कार्यवाही करुन शेतकºयांना न्याय द्यावा, अशी मागणी शेतकºयांतून होत आहे.यावर्षीचे ११ प्रस्ताव मंजुरी अभावी पडून४शेती व्यवसाय करताना शेतकºयांना सर्प दंश, विंचू दंश, वीज पडणे, विजेचा शॉक बसणे आदी कारणास्तव जीव गमवावा लागल्यास कृषी विभागाकडून गोपीनाथ मुंडे विमा योजनेंतर्गत मदत केली जाते.४यावर्षी ७ आॅगस्टपर्यंत पालम कृषी कार्यालयाकडे १, पूर्णा तालुका कृषी कार्यालयाकडे ४, गंगाखेड ४, पाथरी १, सेलू १, जिंतूर अशा ६ तालुका कृषी कार्यालयाकडे ११ प्रस्ताव दाखल झाले आहेत; परंतु, अद्यापही हे प्रस्ताव मंजुरीअभावी त्या त्या कृषी कार्यालयाकडे पडून आहेत.४ याकडे तालुका कृषी अधिकाºयांनी लक्ष देऊन हे प्रस्ताव मंजूर करुन तातडीने शेतकºयांना मदत करावी, अशी मागणी लाभार्थी शेतकºयांतून होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी