शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

परभणी : येलदरीसह ७० तलावांतून अवैध पाणी उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:36 IST

ऐन दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अत्यल्प पाणीसाठा असताना येलदरीसह तालुक्यातील ७० पेक्षा जास्त तलावांतून अवैध पाणी उपसा सुरू आहे. त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

विजय चोरडिया।लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी) : ऐन दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अत्यल्प पाणीसाठा असताना येलदरीसह तालुक्यातील ७० पेक्षा जास्त तलावांतून अवैध पाणी उपसा सुरू आहे. त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.जिंंतूर तालुक्यातील येलदरी धरणासह जि.प.च्या लघूसिंचन विभागाचे ५७ गाव तलाव व पाझर तलाव आहेत. पाटबंधारे विभागांतर्गत १३ गाव व सिंचन तलाव आहेत. तालुक्यात येलदरीसह ३० ते ३५ गाव व पाझर तलावात २० ते २५ टक्के पाणीसाठा आहे. येलदरी धरणात केवळ ९ टक्के पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा भविष्यात पुरेल, याची शाश्वती नाही. परिणामी भविष्यातील तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.येलदरी धरणासह पूर्णा नदीवर जवळपास १ हजार पेक्षा जास्त कृषीपंप सुरू आहेत. यातून मोठा पाणी उपसा होत आहे. शिवाय ठिकठिकाणी असलेले बंधाऱ्यावरही मोठ्या प्रमाणावर मोटारी आहेत. विशेष म्हणजे, या भागातील शेतीही याच पाण्यावर अवलंबून असते. यावर्षी पाणीसाठा कमी असल्याने रबीसाठी पाणी मिळणार का? रबी पेरणी करावी का? या द्विधा मन:स्थितीत येथील शेतकरी आहेत, अशा वेळी पाटबंधारे विभागाने आपली भूमिका व रबीसाठीचे धोरण जाहीर करणे गरजेचे आहे.अन्यथा या भागातील शेतकरी पेरणी करून बसतील आणि नंतर पाटबंधारे विभाग शेतकºयांच्या मोटारी जप्त करतील. त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान होणार आहे. तालुक्यातील २० ते २५ गाव व पाझर तलावात जेमतेम पाणीसाठा आहे. या तलावावर मोटारी सुरू असल्याने तलावातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. भविष्यात पिण्यासाठी पाणी मिळणे अवघड असल्याने अवैधरित्या सुरू असलेल्या विद्युत मोटारी तातडीने बंद कराव्यात, अशी मागणी होत आहे.५० योजना येणार अडचणीतयेलदरी धरणात कमी पाणीसाठा असल्याने जिंतूर, वसमत, परभणीसह ग्रामीण भागातील ५० योजना अडचणीत सापडल्या असून यावर्षी तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.चाºयाचा प्रश्न गंभीर४यावर्षी कमी पावसामुळे ग्रामीण भागात जनावरांचा चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर असून त्यासाठी सर्व तलावातील पाणी आरक्षित ठेवणे गरजेचे आहे. तरच जनावरांना चारा व पाणी मिळू शकते.शेतकºयांनी रबी हंगामात पेरणी करू नये, पूर्णा नदीवरील सर्व मोटारी बंद करून वीजपुरवठा खंडित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय वर्तमानपत्रात प्रगटन देऊन शेतकºयांनी रबी पेरणी करू नये, असे आवाहन केले आहे.-पी.डी. मामिडवाड,कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभागलघू सिंचन विभागांतर्गत गाव तलावावर असणाºया मोटारी बंद करण्यासाठी पथकामार्फत कारवाई सुरू आहे. चारठाणा, जांब, रायखेडा, जुनूनवाडी आदी ठिकाणच्या मोटारी बंद करण्यात आल्या असून इतर ठिकाणच्या मोटारी तत्काळ बंद करण्यात येतील.-डी.ई. टणे, उपविभागीय अभियंता, पाटबंधारे विभाग

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरणWaterपाणीFarmerशेतकरीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प