शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

परभणी : येलदरीसह ७० तलावांतून अवैध पाणी उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:36 IST

ऐन दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अत्यल्प पाणीसाठा असताना येलदरीसह तालुक्यातील ७० पेक्षा जास्त तलावांतून अवैध पाणी उपसा सुरू आहे. त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

विजय चोरडिया।लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी) : ऐन दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अत्यल्प पाणीसाठा असताना येलदरीसह तालुक्यातील ७० पेक्षा जास्त तलावांतून अवैध पाणी उपसा सुरू आहे. त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.जिंंतूर तालुक्यातील येलदरी धरणासह जि.प.च्या लघूसिंचन विभागाचे ५७ गाव तलाव व पाझर तलाव आहेत. पाटबंधारे विभागांतर्गत १३ गाव व सिंचन तलाव आहेत. तालुक्यात येलदरीसह ३० ते ३५ गाव व पाझर तलावात २० ते २५ टक्के पाणीसाठा आहे. येलदरी धरणात केवळ ९ टक्के पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा भविष्यात पुरेल, याची शाश्वती नाही. परिणामी भविष्यातील तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.येलदरी धरणासह पूर्णा नदीवर जवळपास १ हजार पेक्षा जास्त कृषीपंप सुरू आहेत. यातून मोठा पाणी उपसा होत आहे. शिवाय ठिकठिकाणी असलेले बंधाऱ्यावरही मोठ्या प्रमाणावर मोटारी आहेत. विशेष म्हणजे, या भागातील शेतीही याच पाण्यावर अवलंबून असते. यावर्षी पाणीसाठा कमी असल्याने रबीसाठी पाणी मिळणार का? रबी पेरणी करावी का? या द्विधा मन:स्थितीत येथील शेतकरी आहेत, अशा वेळी पाटबंधारे विभागाने आपली भूमिका व रबीसाठीचे धोरण जाहीर करणे गरजेचे आहे.अन्यथा या भागातील शेतकरी पेरणी करून बसतील आणि नंतर पाटबंधारे विभाग शेतकºयांच्या मोटारी जप्त करतील. त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान होणार आहे. तालुक्यातील २० ते २५ गाव व पाझर तलावात जेमतेम पाणीसाठा आहे. या तलावावर मोटारी सुरू असल्याने तलावातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. भविष्यात पिण्यासाठी पाणी मिळणे अवघड असल्याने अवैधरित्या सुरू असलेल्या विद्युत मोटारी तातडीने बंद कराव्यात, अशी मागणी होत आहे.५० योजना येणार अडचणीतयेलदरी धरणात कमी पाणीसाठा असल्याने जिंतूर, वसमत, परभणीसह ग्रामीण भागातील ५० योजना अडचणीत सापडल्या असून यावर्षी तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.चाºयाचा प्रश्न गंभीर४यावर्षी कमी पावसामुळे ग्रामीण भागात जनावरांचा चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर असून त्यासाठी सर्व तलावातील पाणी आरक्षित ठेवणे गरजेचे आहे. तरच जनावरांना चारा व पाणी मिळू शकते.शेतकºयांनी रबी हंगामात पेरणी करू नये, पूर्णा नदीवरील सर्व मोटारी बंद करून वीजपुरवठा खंडित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय वर्तमानपत्रात प्रगटन देऊन शेतकºयांनी रबी पेरणी करू नये, असे आवाहन केले आहे.-पी.डी. मामिडवाड,कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभागलघू सिंचन विभागांतर्गत गाव तलावावर असणाºया मोटारी बंद करण्यासाठी पथकामार्फत कारवाई सुरू आहे. चारठाणा, जांब, रायखेडा, जुनूनवाडी आदी ठिकाणच्या मोटारी बंद करण्यात आल्या असून इतर ठिकाणच्या मोटारी तत्काळ बंद करण्यात येतील.-डी.ई. टणे, उपविभागीय अभियंता, पाटबंधारे विभाग

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरणWaterपाणीFarmerशेतकरीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प