शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

परभणी : येलदरीसह ७० तलावांतून अवैध पाणी उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:36 IST

ऐन दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अत्यल्प पाणीसाठा असताना येलदरीसह तालुक्यातील ७० पेक्षा जास्त तलावांतून अवैध पाणी उपसा सुरू आहे. त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

विजय चोरडिया।लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी) : ऐन दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अत्यल्प पाणीसाठा असताना येलदरीसह तालुक्यातील ७० पेक्षा जास्त तलावांतून अवैध पाणी उपसा सुरू आहे. त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.जिंंतूर तालुक्यातील येलदरी धरणासह जि.प.च्या लघूसिंचन विभागाचे ५७ गाव तलाव व पाझर तलाव आहेत. पाटबंधारे विभागांतर्गत १३ गाव व सिंचन तलाव आहेत. तालुक्यात येलदरीसह ३० ते ३५ गाव व पाझर तलावात २० ते २५ टक्के पाणीसाठा आहे. येलदरी धरणात केवळ ९ टक्के पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा भविष्यात पुरेल, याची शाश्वती नाही. परिणामी भविष्यातील तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.येलदरी धरणासह पूर्णा नदीवर जवळपास १ हजार पेक्षा जास्त कृषीपंप सुरू आहेत. यातून मोठा पाणी उपसा होत आहे. शिवाय ठिकठिकाणी असलेले बंधाऱ्यावरही मोठ्या प्रमाणावर मोटारी आहेत. विशेष म्हणजे, या भागातील शेतीही याच पाण्यावर अवलंबून असते. यावर्षी पाणीसाठा कमी असल्याने रबीसाठी पाणी मिळणार का? रबी पेरणी करावी का? या द्विधा मन:स्थितीत येथील शेतकरी आहेत, अशा वेळी पाटबंधारे विभागाने आपली भूमिका व रबीसाठीचे धोरण जाहीर करणे गरजेचे आहे.अन्यथा या भागातील शेतकरी पेरणी करून बसतील आणि नंतर पाटबंधारे विभाग शेतकºयांच्या मोटारी जप्त करतील. त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान होणार आहे. तालुक्यातील २० ते २५ गाव व पाझर तलावात जेमतेम पाणीसाठा आहे. या तलावावर मोटारी सुरू असल्याने तलावातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. भविष्यात पिण्यासाठी पाणी मिळणे अवघड असल्याने अवैधरित्या सुरू असलेल्या विद्युत मोटारी तातडीने बंद कराव्यात, अशी मागणी होत आहे.५० योजना येणार अडचणीतयेलदरी धरणात कमी पाणीसाठा असल्याने जिंतूर, वसमत, परभणीसह ग्रामीण भागातील ५० योजना अडचणीत सापडल्या असून यावर्षी तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.चाºयाचा प्रश्न गंभीर४यावर्षी कमी पावसामुळे ग्रामीण भागात जनावरांचा चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर असून त्यासाठी सर्व तलावातील पाणी आरक्षित ठेवणे गरजेचे आहे. तरच जनावरांना चारा व पाणी मिळू शकते.शेतकºयांनी रबी हंगामात पेरणी करू नये, पूर्णा नदीवरील सर्व मोटारी बंद करून वीजपुरवठा खंडित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय वर्तमानपत्रात प्रगटन देऊन शेतकºयांनी रबी पेरणी करू नये, असे आवाहन केले आहे.-पी.डी. मामिडवाड,कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभागलघू सिंचन विभागांतर्गत गाव तलावावर असणाºया मोटारी बंद करण्यासाठी पथकामार्फत कारवाई सुरू आहे. चारठाणा, जांब, रायखेडा, जुनूनवाडी आदी ठिकाणच्या मोटारी बंद करण्यात आल्या असून इतर ठिकाणच्या मोटारी तत्काळ बंद करण्यात येतील.-डी.ई. टणे, उपविभागीय अभियंता, पाटबंधारे विभाग

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरणWaterपाणीFarmerशेतकरीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प