शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

परभणी : ऊस तोडण्यासाठी मजूर मिळेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 12:32 AM

यावर्षी तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. परतीच्या पावसानेही हुलकावणी दिली. त्यामुळे जमिनीतील पाण्याचे स्त्रोत दिवसेंदिवस कमी होत असल्याने ऊस पीक धोक्यात आले आहे. त्यातच शेतातील ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांना कारखानदार व ऊसतोड मजुरांच्या मागे चकरा माराव्या लागत असल्याने उत्पादक मेटाकुटीला आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी) : यावर्षी तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. परतीच्या पावसानेही हुलकावणी दिली. त्यामुळे जमिनीतील पाण्याचे स्त्रोत दिवसेंदिवस कमी होत असल्याने ऊस पीक धोक्यात आले आहे. त्यातच शेतातील ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांना कारखानदार व ऊसतोड मजुरांच्या मागे चकरा माराव्या लागत असल्याने उत्पादक मेटाकुटीला आले आहेत.शेतकºयांना दरवर्षी विविध संकटांचा सामना करावा लागतो. कधी बोंडअळी तर कधी लाल्या रोगाचा. यावर्षी तर दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. मागील वर्षीच्या बोंडअळीच्या संकटाला कंटाळून तालुक्यातील शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली होती. हवामान खात्यानेही यावर्षीही सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यामुळे शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र यावर्षी तालुक्यात ४३७ मि.मी. पाऊस झाला. परतीच्या पावसानेही दगा दिला. यामुळे विहीर, बोअर आदी पाण्याच्या स्त्रोतांची पाणीपातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. जमिनीतील पाणीपातळी खोलवर गेल्यामुळे ऊस जगवायचा कसा? असा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे. उसाला जास्त पाण्याची आवश्यकता असल्यामुळे ऊस पिकासाठी पाण्याचे नियोजन करावे तरी कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.माजलगाव धरणाच्या उजव्या कालव्याचे पाणी तालुक्यात येते. मात्र यावर्षी माजलगाव धरणच मृत साठ्यामध्ये आहे. त्यामुळे येथूून पाणी येणे दुरापास्त आहे. तालुक्यातील अनेक भागातील ऊस सध्या वाळत आहे. तालुक्यात २ हजार ३११ क्षेत्रफळावर उसाची लागवड करण्यात आली आहे. त्यात सरू ऊस ३१६, पूर्व हंगामी ५०५, खोडवा १४९० अशा एकूण ३११ क्षेत्रफळावर उसाची लागवड झाली आहे. कारखान्यांनी ऊस न्यावा यासाठी तालुक्यातील शेतकरी कारखान्याकडे चकरा मारताना दिसत आहे. तालुक्यात एकमेव असलेला महाराष्टÑ शुगर कारखाना सुरू झाला नाही. तसेच ऊस वाळण्यास सुुरुवात झाली असून जेमतेम पाण्यावर जगविलेला ऊस कारखान्याकडे घालण्यासाठी ऊसतोड मजुरांची मनधरणी केली जात आहे. मात्र ऊस तोडणीपूर्वी मजूर हेक्टरी ५ ते ७ हजार रुपयांची मागणी करीत आहेत. काही शेतकºयांनी तोडणीवाल्यांचे हात ओले करून तोडणी करून घेतली. मात्र अजूनही तालुक्यातील अनेक शेतकºयांकडे ऊस तोडणीविना शिल्लक असून शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत.कारखाना बंद : ऊस उत्पादक अडचणीतसोनेपठ तालुक्यात यावर्षी २३११ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली. गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी उसाची लागवड केली. तालुक्यात उसाची लागवड पाहता तालुक्यातील एकमेव महाराष्टÑ शुगर कारखाना सुरू होणे अपेक्षित होते. कारखाना सुरू व्हावा, यासाठी विविध संघटना, राजकीय पक्ष व शेतकºयांनी साखर आयुक्त पुणे यांच्यापर्यंत पाठपुरावा केला; परंतु, शेतकºयांच्या मागणीला यश आले नाही. हा कारखाना अद्यापही सुरू झाला नसल्याने ऊस उत्पादक शेतकºयांना दुसºया तालुक्यासह पर जिल्ह्यातील कारखान्यावर अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.परभणी जिल्ह्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती आहे. मजुरांअभावी ऊसतोडणीही लांबत आहे. दुसरीकडे पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे ऊस जागेवरच वाळू लागला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी