शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

परभणी : ऊस तोडण्यासाठी मजूर मिळेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 00:32 IST

यावर्षी तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. परतीच्या पावसानेही हुलकावणी दिली. त्यामुळे जमिनीतील पाण्याचे स्त्रोत दिवसेंदिवस कमी होत असल्याने ऊस पीक धोक्यात आले आहे. त्यातच शेतातील ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांना कारखानदार व ऊसतोड मजुरांच्या मागे चकरा माराव्या लागत असल्याने उत्पादक मेटाकुटीला आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी) : यावर्षी तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. परतीच्या पावसानेही हुलकावणी दिली. त्यामुळे जमिनीतील पाण्याचे स्त्रोत दिवसेंदिवस कमी होत असल्याने ऊस पीक धोक्यात आले आहे. त्यातच शेतातील ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांना कारखानदार व ऊसतोड मजुरांच्या मागे चकरा माराव्या लागत असल्याने उत्पादक मेटाकुटीला आले आहेत.शेतकºयांना दरवर्षी विविध संकटांचा सामना करावा लागतो. कधी बोंडअळी तर कधी लाल्या रोगाचा. यावर्षी तर दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. मागील वर्षीच्या बोंडअळीच्या संकटाला कंटाळून तालुक्यातील शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली होती. हवामान खात्यानेही यावर्षीही सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यामुळे शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र यावर्षी तालुक्यात ४३७ मि.मी. पाऊस झाला. परतीच्या पावसानेही दगा दिला. यामुळे विहीर, बोअर आदी पाण्याच्या स्त्रोतांची पाणीपातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. जमिनीतील पाणीपातळी खोलवर गेल्यामुळे ऊस जगवायचा कसा? असा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे. उसाला जास्त पाण्याची आवश्यकता असल्यामुळे ऊस पिकासाठी पाण्याचे नियोजन करावे तरी कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.माजलगाव धरणाच्या उजव्या कालव्याचे पाणी तालुक्यात येते. मात्र यावर्षी माजलगाव धरणच मृत साठ्यामध्ये आहे. त्यामुळे येथूून पाणी येणे दुरापास्त आहे. तालुक्यातील अनेक भागातील ऊस सध्या वाळत आहे. तालुक्यात २ हजार ३११ क्षेत्रफळावर उसाची लागवड करण्यात आली आहे. त्यात सरू ऊस ३१६, पूर्व हंगामी ५०५, खोडवा १४९० अशा एकूण ३११ क्षेत्रफळावर उसाची लागवड झाली आहे. कारखान्यांनी ऊस न्यावा यासाठी तालुक्यातील शेतकरी कारखान्याकडे चकरा मारताना दिसत आहे. तालुक्यात एकमेव असलेला महाराष्टÑ शुगर कारखाना सुरू झाला नाही. तसेच ऊस वाळण्यास सुुरुवात झाली असून जेमतेम पाण्यावर जगविलेला ऊस कारखान्याकडे घालण्यासाठी ऊसतोड मजुरांची मनधरणी केली जात आहे. मात्र ऊस तोडणीपूर्वी मजूर हेक्टरी ५ ते ७ हजार रुपयांची मागणी करीत आहेत. काही शेतकºयांनी तोडणीवाल्यांचे हात ओले करून तोडणी करून घेतली. मात्र अजूनही तालुक्यातील अनेक शेतकºयांकडे ऊस तोडणीविना शिल्लक असून शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत.कारखाना बंद : ऊस उत्पादक अडचणीतसोनेपठ तालुक्यात यावर्षी २३११ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली. गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी उसाची लागवड केली. तालुक्यात उसाची लागवड पाहता तालुक्यातील एकमेव महाराष्टÑ शुगर कारखाना सुरू होणे अपेक्षित होते. कारखाना सुरू व्हावा, यासाठी विविध संघटना, राजकीय पक्ष व शेतकºयांनी साखर आयुक्त पुणे यांच्यापर्यंत पाठपुरावा केला; परंतु, शेतकºयांच्या मागणीला यश आले नाही. हा कारखाना अद्यापही सुरू झाला नसल्याने ऊस उत्पादक शेतकºयांना दुसºया तालुक्यासह पर जिल्ह्यातील कारखान्यावर अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.परभणी जिल्ह्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती आहे. मजुरांअभावी ऊसतोडणीही लांबत आहे. दुसरीकडे पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे ऊस जागेवरच वाळू लागला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी