शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : वीज समस्यांमुळे शेतकरी वैतागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:25 IST

महावितरण कंपनीकडून दोन महिन्यांपासून कमी दाबाने वीजपुरवठा केला जात असून, रोहीत्र व कृषी पंप जळण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी तालुक्यातील शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी )  : महावितरण कंपनीकडून दोन महिन्यांपासून कमी दाबाने वीजपुरवठा केला जात असून, रोहीत्र व कृषी पंप जळण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी तालुक्यातील शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.पालम तालुक्यात वीजपुरवठा बिघाड आता नेहमीचाच झाला आहे़ अधिकारी अजूनही याकडे गांभिर्याने पाहत नाहीत. शेतकरी व लोकप्रतिनिधींनी वारंवार ओरड करूनही महावितरणाचा कारभार सुधारलेला नाही. दुष्काळी परिस्थितीत अडकलेल्या शेतकºयांना याचा दुहेरी फटका बसत आहे.कृषीपंपाना वीजपुरवठा करणारे दहा ते बारा रोहीत्र आतापर्यंत जळून खाक झाले आहेत. देयके भरल्याशिवाय नवीन रोहीत्र दिले जात नाहीत. कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने रोहीत्र जळत आहेत. तसेच वीजपुरवठा वारंवार विस्कळीत होत असल्याने कृषीपंपही जळत आहेत. तालुक्यात मोठी ओरड होऊनही महावितरण कंपनीचा मनमानी कारभार सुरूच आहे. यामुळे शेतकºयांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे़३३ केव्ही प्रस्ताव : अडगळीत४विजेची मागणी जास्त व पुरवठा कमी असल्यामुळे ताळमेळ बसत नसल्याने कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. पालममधील केंद्रांना वीज भार सहन होत नसल्याने लपंडाव सुरू झाला आहे. पेठशिवणी येथे १३३ केव्ही केंद्रांचा प्रस्ताव अजूनही धूळ खात पडला आहे. त्यामुळे विजेची समस्या गंभीर बनली आहे.एकाच अभियंत्यावर भारपालम कार्यालयात तीन अभियंत्याची गरज आहे. पण सध्या केवळ उपअभियंता व्ही.डी. स्वामी एकटेच कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्यावरच सर्व भार पडत आहे. दिवसभर वीज ग्राहकांच्या समस्या ऐकण्यात त्यांचा वेळ जातो. त्यामुळे बिघाड दुरुस्त करण्यासाठी वेळही मिळेनासा झाला आहे़परभणीच्या अधिकºयांची मनमानीशेतकरी देयके भरून रोहीत्र परभणी येथे घेऊन येत आहेत. मात्र या ठिकाणी अधिकारी वर्गाचा मनमानी कारभार सुरू असून, रोहीत्रासाठी आठ -आठ दिवस चकरा माराव्या लागत आहेत. त्यामुळे शेतातील उभी पिके वाळून जात आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरणPower ShutdownभारनियमनFarmerशेतकरी