शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
3
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यंवशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
4
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
5
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
6
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
7
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
8
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
9
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
10
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
11
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
12
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
13
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
14
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
15
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
16
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
17
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
18
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
19
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
20
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला

परभणी : शेतकऱ्यांचे १७ लाख दोन वर्षानंतरही पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 00:24 IST

दोन वर्षापूर्वी अतिवृष्टी आणि आवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकºयांसाठी शासनाने ५० लाख ३५ हजार रुपयांची मदत जिल्ह्यातील शेतकºयांना देऊ केली होती़ मात्र दोन वर्षानंतरही या मदतीतील १७ लाख रुपये पडून असल्याने शेतकरी मदत जाहीर होवूनही आर्थिक लाभापासून वंचित राहिले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दोन वर्षापूर्वी अतिवृष्टी आणि आवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकºयांसाठी शासनाने ५० लाख ३५ हजार रुपयांची मदत जिल्ह्यातील शेतकºयांना देऊ केली होती़ मात्र दोन वर्षानंतरही या मदतीतील १७ लाख रुपये पडून असल्याने शेतकरी मदत जाहीर होवूनही आर्थिक लाभापासून वंचित राहिले आहेत़२०१६ मध्ये एप्रिल आणि नोव्हेंबर महिन्यात परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी व अवकाळी पाऊस झाला होता़ या पावसाने पिकांचे नुकसान झाले़ राज्य शासनाने अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांसाठी मदत जाहीर केली़ परभणी जिल्ह्याला ही मदत प्राप्तही झाली़ जिल्हा प्रशासनाने शेतकºयांच्या नुकसानीपोटी मिळालेली ही रक्कम तहसील प्रशासनाकडे प्रदान केली असून, तहसील मार्फत त्या त्या शेतकºयांना मदतीचे वितरण करण्यात आले़ २०१६ मध्ये झालेल्या या नुकसानीपोटी बाधीत शेतकºयांना आर्थिक मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला ५० लाख ३५ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला होता़ १९ आॅक्टोबर २०१८ अखेर प्राप्त झालेल्या या निधीतून केवळ ३३ लाख १३ हजार रुपये शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यात आले असून, उर्वरित १७ लाख २२ हजार रुपयांचे वाटप रखडले आहे़ निधी उपलब्ध असतानाही प्रशासनाने ती रक्कम वितरित केली नाही़ अतिवृष्टीने पिके बाधित झालेल्या केवळ २ हजार ५३४ शेतकºयांनाच मदतीचा लाभ झाला आहे़ प्राप्त अनुदानापैकी ६६ टक्के अनुदानाचे वितरण झाले आहे़राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकºयांना अनुदान देऊ केले़ मात्र प्रशासनातील उदासिनतेमुळे या अनुदानाचे वितरण रखडले आहे़ दोन वर्षांपासून शेतकºयांना अनुदान मिळत नसल्याने शेतकरी तहसील कार्यालयात चकरा मारत आहेत़ त्यानंतरच्या दोन्ही वर्षांच्या काळात शेती उत्पादनात घट झाली आहे़ शेतकºयांना फारसे उत्पन्न मिळाले नसल्याने आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले़ यावर्षी तर पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे़ तेव्हा अनुदान मंजूर झाले असेल तर ते त्वरित वितरित करावे, अशी मागणी होत आहे़परभणी तालुक्यात : वितरणच नाही४जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेले अनुदान तहसील प्रशासनाने लाभार्थी शेतकºयांना वितरित केले आहे़ परभणी तालुक्याने मात्र अद्यापपर्यंत या अनुदानाचे वितरण केले नसल्याची बाब समोर आली आहे़ सोनपेठ तालुक्याने ९७ टक्के, पालम तालुक्याने ३०़१० टक्के, जिंतूर तालुक्याने ९५़१३ टक्के तर पूर्णा तालुक्याने १०० टक्के अनुदानाचे वितरण केले आहे़ सोनपेठ तालुक्यातील ५० शेतकºयांना ७२ हजार रुपये, पालम तालुक्यातील २९७ शेतकºयांना ३ लाख १३ हजार रुपये, जिंतूर तालुक्यातील १ हजार १९९ शेतकºयांना १८ लाख ७६ हजार रुपये आणि पूर्णा तालुक्यातील ९८८ शेतकºयांना १० लाख ५२ हजार रुपये असे २ हजार ५३४ शेतकºयांना ३३ लाख १३ हजार रुपयांचे वितरण झाले आहे़तालुका निहाय प्राप्त झालेले अनुदानअतिवृष्टीतील बाधित शेतकºयांना मदत देण्यासाठी परभणी तालुक्याला ८ लाख ९७ हजार रुपये, सोनपेठ तालुक्याला ७४ हजार रुपये, पालम तालुक्याला १० लाख ४० हजार रुपये, जिंतूर तालुक्याला १९ लाख ७२ हजार रुपये आणि पूर्णा तालुक्याला १० लाख ५२ हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झाले होते़दोन वर्षांपासूनवितरण ठप्प४जिल्ह्यातील ५ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याने नुकसानग्रस्त शेतकºयांसाठी अनुदान प्राप्त झाले़ तालुकास्तरावरून या अनुदानाचे वितरणही शेतकºयांना करण्यात आले आहे़ काही शेतकरी अनुदानाच्या लाभापासून अजूनही वंचित आहेत़४दोन वर्षांपासून अनुदान वितरण झाले नसल्याने या मागची कारणेही शोधली नाहीत़ विशेष म्हणजे, तहसील प्रशासनाने अनुदान शिल्लक असले तर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे समर्पितही केले नाही़ त्यामुळे या अनुदानाचे वितरणाचे काय? असा प्रश्न निर्माण होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीRainपाऊसfundsनिधी