शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

परभणी : मानवतमध्ये पाण्यावरुन खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:20 AM

शहराच्या पाणीप्रश्नावरुन नगरसेवक आणि मुख्याधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाल्याचा प्रकार २० आॅक्टोबर रोजी सकाळी मानवत शहरात घडला.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): शहराच्या पाणीप्रश्नावरुन नगरसेवक आणि मुख्याधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाल्याचा प्रकार २० आॅक्टोबर रोजी सकाळी मानवत शहरात घडला.मानवत शहराला झरी येथील तलावातून पाणी पुरवठा केला जातो. झरी तलावात मूबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असतानाही शहरवासियांना मात्र आठ ते दहा दिवसांतून एक वेळा पाणीपुरवठा होत आहे. हा पाणीपुरवठा विस्कळीत का झाला, याची विचारणा करण्यासाठी कॉंग्रेसचे नगरसेवक शनिवारी पालिकेमध्ये गेले. यावेळी मुख्याधिकाºयांना जाब विचारत असतानाच मुख्याधिकारी आणि नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाली. मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी नगरसेवकांना आरेरावीची भाषा वापरली, असा आरोप कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी केला आहे. या प्रकरणी नगरसेवकांनी थेट जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्याकडेच मुख्याधिकारी ढाकणे यांची तक्रार केली असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.झरी तलावामध्ये मूबलक प्रमाणात पाणी असताना नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. ही बाब मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी आरेरावीची भाषा केली, असा आरोप नगरसेवकांनी केला आहे. या निवेदनावर नगरसेवक शोभा चव्हाण, सरुबाई भदर्गे, संगिता देशमुख, अ.रहीम अ.करीम, स.जमील, विनोद रहाटे, गोपाल गौड, शैलेजा बारहाते, रबियाबी अन्सारी आदींच्या स्वाक्षºया आहेत.कृत्रिम पाणीटंचाईचे संकट४मानवत शहराला झरी येथील तलावातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या जायकवाडी प्रकल्पाचे पाणी कालव्याला सोडले असल्याने या पाण्याने झरी तलावात मूबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. साधारणत: मे महिन्यापर्यंत पुरेल एवढे पाणी तलावात असताना मानवतकरांना मात्र टंचाईला सामोरे जावे लागत आहे. सध्या शहरात आठ ते दहा दिवसांना एकवेळ पाणी येते.४झरी तलाव परिसरात एक्सप्रेस फिडर नसल्याने शहरवासियांना सुरळीत पाणी पुरवठा होत नाही. झरी परिसरात एक्सप्रेस फिडर उभारावा, अशी अनेक दिवसांची मागणी आहे;परंतु, त्याकडेही नगरपालिका प्रशासन गांभीर्याने पाहत नाही. परिणामी शहराला पाणीपुरवठा करताना अडथळे निर्माण होतात आणि दोन आवर्तनातील कालावधी वाढत चालला आहे.४शहराचा विस्तार वाढला असून नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम नगरपालिकेने हाती घेतले आहे. मात्र अनेक भागात हे काम ठप्प आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यात विस्कळीतपणा निर्माण होत आहे. झरी बरोबरच जुन्या इरळद येथून पाणीपुरवठा करण्याची योजना कार्यान्वित केली तर शहराचा प्रश्न मिटू शकतो. मात्र यावरही हालचाली होत नाहीत.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई