शहरं
Join us  
Trending Stories
1
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
2
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
3
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
4
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
5
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
6
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
7
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
8
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
9
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
10
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
11
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
12
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
14
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
15
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
16
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
17
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
18
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
19
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
20
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न

परभणी : चारा, पाणीटंचाईमुळे पशुपालक हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 00:40 IST

तालुक्यात चारा व पाणीटंचाई निर्माण झाल्याने पशुधन सांभाळायचे कसे, या विवंचनेत पशुमालक हवालदिल झाले असूून जनावरांच्या बाजारात मिळेल त्या भावात पशुधनाची बेभाव विक्री केली जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : तालुक्यात चारा व पाणीटंचाई निर्माण झाल्याने पशुधन सांभाळायचे कसे, या विवंचनेत पशुमालक हवालदिल झाले असूून जनावरांच्या बाजारात मिळेल त्या भावात पशुधनाची बेभाव विक्री केली जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.चालू वर्षात तालुक्यात अत्यंत कमी पर्जन्यमान झाल्याने खरिपातील पिके हातची गेली व रबी हंगामात पेरणीच झाली नाही. पर्जन्यमान कमी झाल्याने तालुक्यातील मुळी बंधारा, मासोळी प्रकल्प ही मोठी धरणे व लहान, मोठे तलाव कोरडे राहिल्याने भर हिवाळ्यात भूजल पातळीने तळ गाठला. त्यामुळे विहीर, बोअर या जलस्त्रोतांचे पाणी आटले. तालुक्यातील बहुतांश गावात जानेवारी महिन्यातच पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गंगाखेड तालुक्याचा मोठा भाग डोंगरपटट््यात असल्याने व काही भाग गोदावरी नदीकाठचा असल्याने गोदा काठावरील गावे वगळता डोंगरपट्यातील गावात जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. खरिपाची पिके हातची गेली. रबी हंगामातील ज्वारी, मका, बाजरी या पिकांबरोबर चारा पिकावर असलेली शेतकºयांची आशा ही परतीच्या पावसाने दगा दिल्याने मावळली. चाºयाचे उत्पन्न झाले नसल्याने चाºयाचे भाव गगनाला भिडले. हातची पिके गेल्याने हातात पैसा शिल्लक राहिला नाही. यामुळे महाग झालेल्या चारा खरेदी करणे पशुपालकांना अशक्य झाल्याने जनावरांवर उपासमारीची वेळ येत आहे. चारा, पाण्याअभावी जनावरांची झालेली अवस्था पाहावत नसल्याने पशुपालकांनी आपले पशुधन बाजारात विक्री करण्याचा निर्णय घेतला. बाजारात पशुधनाला भावच नसल्याने मिळेल त्या भावात पशुधन विक्री केल्या जात असल्याचे चित्र जनावरांच्या बाजारात पहावयास मिळत आहे. दरम्यान, जनावरे जगविण्यासाठी पशुपालक दिवसभर राना, वनात भटकंती करून जनावरे जगवित आहेत. दुष्काळग्रस्त तालुक्यात गावा गावात शासनाच्या उपाययोजना राबवून चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.चाºयाचे भाव वधारले४तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे ज्वारीच्या कडब्याला ३ हजार रुपये शेकडा भाव देऊन कडबा मिळत नाही. यामुळे पशुमालक १८०० रुपये टनाने ऊस, १ एकर शेतातील सोयाबीनची गुळी १२०० रुपयांप्रमाणे खरेदी करून पशुधन जगविण्याचा खटाटोप करताना दिसत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने व पशुसंवर्धन विभागाने तातडीने पावले उचलत तालुक्यात चारा छावण्या उपलब्ध करून चारा उपलब्ध करून द्यावा, अशी मगणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळRainपाऊस