शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

परभणी : चारा, पाणीटंचाईमुळे पशुपालक हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 00:40 IST

तालुक्यात चारा व पाणीटंचाई निर्माण झाल्याने पशुधन सांभाळायचे कसे, या विवंचनेत पशुमालक हवालदिल झाले असूून जनावरांच्या बाजारात मिळेल त्या भावात पशुधनाची बेभाव विक्री केली जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : तालुक्यात चारा व पाणीटंचाई निर्माण झाल्याने पशुधन सांभाळायचे कसे, या विवंचनेत पशुमालक हवालदिल झाले असूून जनावरांच्या बाजारात मिळेल त्या भावात पशुधनाची बेभाव विक्री केली जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.चालू वर्षात तालुक्यात अत्यंत कमी पर्जन्यमान झाल्याने खरिपातील पिके हातची गेली व रबी हंगामात पेरणीच झाली नाही. पर्जन्यमान कमी झाल्याने तालुक्यातील मुळी बंधारा, मासोळी प्रकल्प ही मोठी धरणे व लहान, मोठे तलाव कोरडे राहिल्याने भर हिवाळ्यात भूजल पातळीने तळ गाठला. त्यामुळे विहीर, बोअर या जलस्त्रोतांचे पाणी आटले. तालुक्यातील बहुतांश गावात जानेवारी महिन्यातच पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गंगाखेड तालुक्याचा मोठा भाग डोंगरपटट््यात असल्याने व काही भाग गोदावरी नदीकाठचा असल्याने गोदा काठावरील गावे वगळता डोंगरपट्यातील गावात जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. खरिपाची पिके हातची गेली. रबी हंगामातील ज्वारी, मका, बाजरी या पिकांबरोबर चारा पिकावर असलेली शेतकºयांची आशा ही परतीच्या पावसाने दगा दिल्याने मावळली. चाºयाचे उत्पन्न झाले नसल्याने चाºयाचे भाव गगनाला भिडले. हातची पिके गेल्याने हातात पैसा शिल्लक राहिला नाही. यामुळे महाग झालेल्या चारा खरेदी करणे पशुपालकांना अशक्य झाल्याने जनावरांवर उपासमारीची वेळ येत आहे. चारा, पाण्याअभावी जनावरांची झालेली अवस्था पाहावत नसल्याने पशुपालकांनी आपले पशुधन बाजारात विक्री करण्याचा निर्णय घेतला. बाजारात पशुधनाला भावच नसल्याने मिळेल त्या भावात पशुधन विक्री केल्या जात असल्याचे चित्र जनावरांच्या बाजारात पहावयास मिळत आहे. दरम्यान, जनावरे जगविण्यासाठी पशुपालक दिवसभर राना, वनात भटकंती करून जनावरे जगवित आहेत. दुष्काळग्रस्त तालुक्यात गावा गावात शासनाच्या उपाययोजना राबवून चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.चाºयाचे भाव वधारले४तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे ज्वारीच्या कडब्याला ३ हजार रुपये शेकडा भाव देऊन कडबा मिळत नाही. यामुळे पशुमालक १८०० रुपये टनाने ऊस, १ एकर शेतातील सोयाबीनची गुळी १२०० रुपयांप्रमाणे खरेदी करून पशुधन जगविण्याचा खटाटोप करताना दिसत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने व पशुसंवर्धन विभागाने तातडीने पावले उचलत तालुक्यात चारा छावण्या उपलब्ध करून चारा उपलब्ध करून द्यावा, अशी मगणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळRainपाऊस