शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
3
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
4
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
5
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
6
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
7
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
8
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
9
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
10
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
11
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
13
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
14
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
15
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
16
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
17
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
18
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
19
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
20
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

परभणी : प्रशासकीय दिरंगाईमुळे मुळी बंधारा कोरडाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:39 IST

तालुक्यातील मुळी येथे गोदावरी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या मुळी बंधाऱ्याला दरवाजेच नसल्याने अत्यल्प प्रमाणात झालेल्या पावसाचे पाणीही बंधाºयात थांबले नाही. प्रशासकीय दिरंगाईमुळे मुळी बंधारा कोरडा राहिल्याने पाण्याबरोबर शेतकºयांचे स्वप्नही वाहून गेल्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : तालुक्यातील मुळी येथे गोदावरी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या मुळी बंधाऱ्याला दरवाजेच नसल्याने अत्यल्प प्रमाणात झालेल्या पावसाचे पाणीही बंधाºयात थांबले नाही. प्रशासकीय दिरंगाईमुळे मुळी बंधारा कोरडा राहिल्याने पाण्याबरोबर शेतकºयांचे स्वप्नही वाहून गेल्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे.गंगाखेड तालुक्यातील शेतकरी सुखी व समृद्ध व्हावा, सिंचनाबरोबरच गोदावरी नदीकाठावरील काही गावे व गंगाखेड शहरवासियांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघावा, या उद्देशाने तालुक्यातून वाहणाºया गोदावरी नदीपात्रात २०११ साली राज्य शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून मुळी बंधारा उभारला. ११.३५ दलघमी या बंधाºयाची पाणीसाठवण क्षमता आहे. २०११ साली प्रथमच या बंधाºयात ५.७२ दलघमी पाण्याची साठवण करण्यात आली. त्यानंतर २०१२ साली बंधाºयात पाणी साठविण्यासाठी बंधाºयाचे २० स्वयंचलित दरवाजे बंद करून पाण्याची साठवण करण्यात आली. प्रथमच पूर्ण क्षमतेने भरलेल्या या बंधाºयाच्या २० स्वयंचलित दरवाजांपैकी १६ दरवाजे पाण्याच्या दाबामुळे क्षमतीग्रस्त झाले. त्यामुळे बंधाºयात साठविलेले पाणी नदीपात्रात वाहून गेले. त्यानंतर २०१३-१४ मध्ये थोप दरवाजाद्वारे बंधाºयात थोड्याफार पाण्याची साठवण करण्यात आली. २०१५ साली पाऊस झाला नसल्याने बंधारा कोरडाच राहिला. २०१६ साली चांगला पाऊस झाल्याने क्षतीग्रस्त झालेल्या स्वयंचलित दरवाजाची दुरुस्ती करून १८ सप्टेंबर २०१६ रोजी बंधाºयात पाणीसाठवण करण्यात आले. सलग तीन दिवस झालेल्या पावसामुळे बंधाºयातील पाण्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली.२४ सप्टेंबर २०१६ रोजी हे दरवाजे पाण्याच्या दाबामुळे निखळून पडले. त्यामुळे बंधारा पुन्हा रिकामा झाला. मुळी बंधाºयात पूर्ण क्षमतेने पाणीसाठवण करण्यासाठी बंधाºयाला बसविलेले स्वयंचलित दरवाजे काढून त्या जागी व्हर्टिकल दरवाजे बसवावेत, अशी मागणी गोदावरी संघर्ष समिती, शेतकरी संघटना त्याचबरोबर विविध सामाजिक संघटनांंनी रास्ता रोको, उपोषण आदी प्रकारचे आंदोलन केले. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आजपर्यंत बंधारा आहे तसाच आहे. परिणामीया बंधाºयात पाणी साठविण्यात आलेच नाही.कोट्यावधी रुपये खर्च करून गोदावरी नदीवर बांधलेल्या मुळी बंधाºयाचा फायदा या भागातील नागरिकांना काही झालाच नाही. बंधाºयावर झालेला कोट्यवधी रुपयांचा खर्च मुळी बंधाºयातील पाण्याबरोबरच वाहून गेल्याचे बंधाºयाच्या सद्य स्थितीवरून दिसून येत आहे.शासनाचा प्रयोग: तालुकावासियांच्या मुळावरनदीपात्रात बांधल्या जाणाºया बंधाºयावर स्वयंचलित दरवाजे बसविण्याचा निर्णय घेत राज्य शासनाने प्रथमच गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधाºयाला प्रयोगिक तत्वावर स्वयंचलित दरवाजे बसविण्याचा निर्णय घेतला. मुळी बंधाºयावर हा प्रयोग केला मात्र २०१२ व २०१६ साली दोन वेळा बंधाºयाचे दरवाजे निखळून पडल्याने राज्य शासनाचा हा प्रयोग सपसेल अपयशी ठरला. त्यामुळे हा प्रयोग गंगाखेड तालुकावासियांच्या मुळावर आल्याचे शेतकºयांतून बोलले जात आहे. मुळी बंधारा बांधल्यानंतर पहिल्या पावसाच्या पाण्यासोबत बंधाºयाचे दरवाजे पाण्याच्या प्रवाहाने निखळून पडले. त्यामुळे परिसरातील शेतकºयांच्या सिंचनाचे स्वप्नही वाहून गेले आहे.बंधाºयाला व्होर्टिकल दरवाजे बसवा४मुळी बंधाºयावर बसविण्यात आलेले स्वयंचलित दरवाजे काढून त्या ठिकाणी व्होर्टिकल दरवाजे बसवून तालुक्यातील आठ गावांतील १ हजार ४७५ हेक्टर व सोनपेठ तालुक्यातील तीन गावातील २३० हेक्टर असा एकूण १ हजार ७०५ हेक्टर क्षेत्रावरील शेत जमिनीवरील सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम निकाली काढावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी व सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.४या मागणीसाठी शेतकºयांनी अनेक वेळा आंंदोलने केली आहेत. मात्र प्रशासनाने याची दखल घेतली नसल्याने राज्यातील सर्वात मोठे गोदावरी नदीपात्र कोरडेठाक पडण्याची वेळ आली आली आहे. प्रशासनाच्या उदासिनतेमुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पWaterपाणीRainपाऊस