शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

परभणी : प्रशासकीय दिरंगाईमुळे मुळी बंधारा कोरडाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:39 IST

तालुक्यातील मुळी येथे गोदावरी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या मुळी बंधाऱ्याला दरवाजेच नसल्याने अत्यल्प प्रमाणात झालेल्या पावसाचे पाणीही बंधाºयात थांबले नाही. प्रशासकीय दिरंगाईमुळे मुळी बंधारा कोरडा राहिल्याने पाण्याबरोबर शेतकºयांचे स्वप्नही वाहून गेल्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : तालुक्यातील मुळी येथे गोदावरी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या मुळी बंधाऱ्याला दरवाजेच नसल्याने अत्यल्प प्रमाणात झालेल्या पावसाचे पाणीही बंधाºयात थांबले नाही. प्रशासकीय दिरंगाईमुळे मुळी बंधारा कोरडा राहिल्याने पाण्याबरोबर शेतकºयांचे स्वप्नही वाहून गेल्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे.गंगाखेड तालुक्यातील शेतकरी सुखी व समृद्ध व्हावा, सिंचनाबरोबरच गोदावरी नदीकाठावरील काही गावे व गंगाखेड शहरवासियांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघावा, या उद्देशाने तालुक्यातून वाहणाºया गोदावरी नदीपात्रात २०११ साली राज्य शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून मुळी बंधारा उभारला. ११.३५ दलघमी या बंधाºयाची पाणीसाठवण क्षमता आहे. २०११ साली प्रथमच या बंधाºयात ५.७२ दलघमी पाण्याची साठवण करण्यात आली. त्यानंतर २०१२ साली बंधाºयात पाणी साठविण्यासाठी बंधाºयाचे २० स्वयंचलित दरवाजे बंद करून पाण्याची साठवण करण्यात आली. प्रथमच पूर्ण क्षमतेने भरलेल्या या बंधाºयाच्या २० स्वयंचलित दरवाजांपैकी १६ दरवाजे पाण्याच्या दाबामुळे क्षमतीग्रस्त झाले. त्यामुळे बंधाºयात साठविलेले पाणी नदीपात्रात वाहून गेले. त्यानंतर २०१३-१४ मध्ये थोप दरवाजाद्वारे बंधाºयात थोड्याफार पाण्याची साठवण करण्यात आली. २०१५ साली पाऊस झाला नसल्याने बंधारा कोरडाच राहिला. २०१६ साली चांगला पाऊस झाल्याने क्षतीग्रस्त झालेल्या स्वयंचलित दरवाजाची दुरुस्ती करून १८ सप्टेंबर २०१६ रोजी बंधाºयात पाणीसाठवण करण्यात आले. सलग तीन दिवस झालेल्या पावसामुळे बंधाºयातील पाण्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली.२४ सप्टेंबर २०१६ रोजी हे दरवाजे पाण्याच्या दाबामुळे निखळून पडले. त्यामुळे बंधारा पुन्हा रिकामा झाला. मुळी बंधाºयात पूर्ण क्षमतेने पाणीसाठवण करण्यासाठी बंधाºयाला बसविलेले स्वयंचलित दरवाजे काढून त्या जागी व्हर्टिकल दरवाजे बसवावेत, अशी मागणी गोदावरी संघर्ष समिती, शेतकरी संघटना त्याचबरोबर विविध सामाजिक संघटनांंनी रास्ता रोको, उपोषण आदी प्रकारचे आंदोलन केले. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आजपर्यंत बंधारा आहे तसाच आहे. परिणामीया बंधाºयात पाणी साठविण्यात आलेच नाही.कोट्यावधी रुपये खर्च करून गोदावरी नदीवर बांधलेल्या मुळी बंधाºयाचा फायदा या भागातील नागरिकांना काही झालाच नाही. बंधाºयावर झालेला कोट्यवधी रुपयांचा खर्च मुळी बंधाºयातील पाण्याबरोबरच वाहून गेल्याचे बंधाºयाच्या सद्य स्थितीवरून दिसून येत आहे.शासनाचा प्रयोग: तालुकावासियांच्या मुळावरनदीपात्रात बांधल्या जाणाºया बंधाºयावर स्वयंचलित दरवाजे बसविण्याचा निर्णय घेत राज्य शासनाने प्रथमच गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधाºयाला प्रयोगिक तत्वावर स्वयंचलित दरवाजे बसविण्याचा निर्णय घेतला. मुळी बंधाºयावर हा प्रयोग केला मात्र २०१२ व २०१६ साली दोन वेळा बंधाºयाचे दरवाजे निखळून पडल्याने राज्य शासनाचा हा प्रयोग सपसेल अपयशी ठरला. त्यामुळे हा प्रयोग गंगाखेड तालुकावासियांच्या मुळावर आल्याचे शेतकºयांतून बोलले जात आहे. मुळी बंधारा बांधल्यानंतर पहिल्या पावसाच्या पाण्यासोबत बंधाºयाचे दरवाजे पाण्याच्या प्रवाहाने निखळून पडले. त्यामुळे परिसरातील शेतकºयांच्या सिंचनाचे स्वप्नही वाहून गेले आहे.बंधाºयाला व्होर्टिकल दरवाजे बसवा४मुळी बंधाºयावर बसविण्यात आलेले स्वयंचलित दरवाजे काढून त्या ठिकाणी व्होर्टिकल दरवाजे बसवून तालुक्यातील आठ गावांतील १ हजार ४७५ हेक्टर व सोनपेठ तालुक्यातील तीन गावातील २३० हेक्टर असा एकूण १ हजार ७०५ हेक्टर क्षेत्रावरील शेत जमिनीवरील सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम निकाली काढावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी व सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.४या मागणीसाठी शेतकºयांनी अनेक वेळा आंंदोलने केली आहेत. मात्र प्रशासनाने याची दखल घेतली नसल्याने राज्यातील सर्वात मोठे गोदावरी नदीपात्र कोरडेठाक पडण्याची वेळ आली आली आहे. प्रशासनाच्या उदासिनतेमुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पWaterपाणीRainपाऊस