शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ६१ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 00:10 IST

आॅक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तिसºया टप्प्यामध्ये परभणी जिल्ह्यात ६१ कोटी ४० लाख ५२ हजार रुपयांचा निधी १ फेब्रुवारी रोजी एका आदेशान्वये वितरित केला आहे़ त्यामुळे दुष्काळ निधीतून १ लाख ४१ हजार २५८ शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण केले जाणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : आॅक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तिसºया टप्प्यामध्ये परभणी जिल्ह्यात ६१ कोटी ४० लाख ५२ हजार रुपयांचा निधी १ फेब्रुवारी रोजी एका आदेशान्वये वितरित केला आहे़ त्यामुळे दुष्काळ निधीतून १ लाख ४१ हजार २५८ शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण केले जाणार आहे़आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने यावर्षीच्या खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन या नगदी पिकांबरोबरच इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़ संपूर्ण जिल्हाभरात नुकसानीचा आकडा वाढत असल्याने राज्य शासनाने बाधित पिकांचे पंचनामे करून या पिकांना मदत देण्याची घोषणा केली़ त्यानुसार शेतपिकांना ८ हजार रुपये प्रतिहेक्टर अनेक फळपिकांना १८ हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली़ त्यानुसार जिल्हा प्रशासनाने बाधित शेतकºयांची यादी शासनाकडे पाठविली होती़ प्रशासनाला आतापर्यंत २७९ कोटी ११ लाख ४ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे़ या निधीचे वितरण शेतकºयांना झाले असले तरी अजूनही सव्वा लाख शेतकरी अनुदानापासून वंचित असल्याने जिल्हा प्रशासनाने निधीची मागणी नोंदविली होती़ या मागणीनुसार महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने १ फेब्रुवारी रोजी राज्यातील अतिवृष्टीने बाधित पिकांसाठी ७५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असून, त्या अंतर्गत परभणी जिल्ह्यातील बाधित शेतकºयांसाठी ६१ कोटी ४० लाख ५२ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे़ जिल्ह्यात आतापर्यंत २७९ कोटी ११ लाख ४ हजार रुपये प्राप्त झाले असून, हा निधी मिळाल्यानंतर जिल्ह्यास ३४० कोटी ५१ लाख ५७ हजार रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे़ हा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर निधीपासून वंचित राहिलेल्या शेतकºयांना त्याचे वितरण होणार असून, तहसीलमार्फत प्रत्यक्ष शेतकºयांच्या खात्यावर निधी जमा करण्याची प्रक्रिया होणार आहे़साडेचार लाख शेतकºयांच्या पिकांचे नुकसान४आॅक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील ४ लाख ६३ हजार ३७१ शेतकºयांच्या ४ लाख ५६ हजार ९६३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे़ या नुकसानीपोटी जिल्हा प्रशासनाने ३६६ कोटी ६ हजार २६ रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे केली होती़४त्यातुलनेत आतापर्यंत २७९ कोटी ११ लाख ४ हजार रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत़ त्यातून ३ लाख २२ हजार १०३ शेतकºयांना मदत निधी वितरित करण्यात आला आहे़ आणखी १ लाख ४१ हजार २५८ शेतकरी या मदतीपासून वंचित आहेत़४वंचित राहिलेल्या या शेतकºयांसाठी जिल्हा प्रशासनाने १०१ कोटी ४७ लाख ५० हजार रुपयांची मागणी शासनाकडे नोंदविली होती़ त्या तुलनेत ६१ कोटी ४० लाख ५२ हजार रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत़ त्यामुळे या रकमेतून उर्वरित शेतकºयांना निधीचे वितरण केले जाणार आहे़मदतीपासून वंचित असलेले शेतकरी४जिल्हा प्रशासनाच्या माहिती प्रमाणे १ लाख १५ हजार ३३८ शेतकरी अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित आहेत़ त्यामध्ये परभणी तालुक्यातील १९ हजार २४४, सेलू तालुक्यातील १२ हजार ७५६, जिंतूर तालुक्यातील २७ हजार ६११, पाथरी ९ हजार ४३४, मानवत ८ हजार १४०, सोनपेठ ६ हजार ९९१, गंगाखेड १० हजार ६६५, पालम ९ हजार ५५९ आणि पूर्णा तालुक्यातील १० हजार ९३८ शेतकºयांना अनुदान वाटप करणे शिल्लक आहे़ त्यासाठी जिल्हा प्रशासनाने १०१ कोटी ४७ लाख रुपयांची मागणी नोंदविली होती़ मात्र प्रत्यक्षात ६१ कोटी ४० लाख रुपये मंजूर झाल्याने प्रशासनाला आणखी निधीची गरज भासणार आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीRainपाऊसGovernmentसरकार