शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ६१ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 00:10 IST

आॅक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तिसºया टप्प्यामध्ये परभणी जिल्ह्यात ६१ कोटी ४० लाख ५२ हजार रुपयांचा निधी १ फेब्रुवारी रोजी एका आदेशान्वये वितरित केला आहे़ त्यामुळे दुष्काळ निधीतून १ लाख ४१ हजार २५८ शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण केले जाणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : आॅक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तिसºया टप्प्यामध्ये परभणी जिल्ह्यात ६१ कोटी ४० लाख ५२ हजार रुपयांचा निधी १ फेब्रुवारी रोजी एका आदेशान्वये वितरित केला आहे़ त्यामुळे दुष्काळ निधीतून १ लाख ४१ हजार २५८ शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण केले जाणार आहे़आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने यावर्षीच्या खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन या नगदी पिकांबरोबरच इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़ संपूर्ण जिल्हाभरात नुकसानीचा आकडा वाढत असल्याने राज्य शासनाने बाधित पिकांचे पंचनामे करून या पिकांना मदत देण्याची घोषणा केली़ त्यानुसार शेतपिकांना ८ हजार रुपये प्रतिहेक्टर अनेक फळपिकांना १८ हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली़ त्यानुसार जिल्हा प्रशासनाने बाधित शेतकºयांची यादी शासनाकडे पाठविली होती़ प्रशासनाला आतापर्यंत २७९ कोटी ११ लाख ४ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे़ या निधीचे वितरण शेतकºयांना झाले असले तरी अजूनही सव्वा लाख शेतकरी अनुदानापासून वंचित असल्याने जिल्हा प्रशासनाने निधीची मागणी नोंदविली होती़ या मागणीनुसार महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने १ फेब्रुवारी रोजी राज्यातील अतिवृष्टीने बाधित पिकांसाठी ७५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असून, त्या अंतर्गत परभणी जिल्ह्यातील बाधित शेतकºयांसाठी ६१ कोटी ४० लाख ५२ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे़ जिल्ह्यात आतापर्यंत २७९ कोटी ११ लाख ४ हजार रुपये प्राप्त झाले असून, हा निधी मिळाल्यानंतर जिल्ह्यास ३४० कोटी ५१ लाख ५७ हजार रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे़ हा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर निधीपासून वंचित राहिलेल्या शेतकºयांना त्याचे वितरण होणार असून, तहसीलमार्फत प्रत्यक्ष शेतकºयांच्या खात्यावर निधी जमा करण्याची प्रक्रिया होणार आहे़साडेचार लाख शेतकºयांच्या पिकांचे नुकसान४आॅक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील ४ लाख ६३ हजार ३७१ शेतकºयांच्या ४ लाख ५६ हजार ९६३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे़ या नुकसानीपोटी जिल्हा प्रशासनाने ३६६ कोटी ६ हजार २६ रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे केली होती़४त्यातुलनेत आतापर्यंत २७९ कोटी ११ लाख ४ हजार रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत़ त्यातून ३ लाख २२ हजार १०३ शेतकºयांना मदत निधी वितरित करण्यात आला आहे़ आणखी १ लाख ४१ हजार २५८ शेतकरी या मदतीपासून वंचित आहेत़४वंचित राहिलेल्या या शेतकºयांसाठी जिल्हा प्रशासनाने १०१ कोटी ४७ लाख ५० हजार रुपयांची मागणी शासनाकडे नोंदविली होती़ त्या तुलनेत ६१ कोटी ४० लाख ५२ हजार रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत़ त्यामुळे या रकमेतून उर्वरित शेतकºयांना निधीचे वितरण केले जाणार आहे़मदतीपासून वंचित असलेले शेतकरी४जिल्हा प्रशासनाच्या माहिती प्रमाणे १ लाख १५ हजार ३३८ शेतकरी अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित आहेत़ त्यामध्ये परभणी तालुक्यातील १९ हजार २४४, सेलू तालुक्यातील १२ हजार ७५६, जिंतूर तालुक्यातील २७ हजार ६११, पाथरी ९ हजार ४३४, मानवत ८ हजार १४०, सोनपेठ ६ हजार ९९१, गंगाखेड १० हजार ६६५, पालम ९ हजार ५५९ आणि पूर्णा तालुक्यातील १० हजार ९३८ शेतकºयांना अनुदान वाटप करणे शिल्लक आहे़ त्यासाठी जिल्हा प्रशासनाने १०१ कोटी ४७ लाख रुपयांची मागणी नोंदविली होती़ मात्र प्रत्यक्षात ६१ कोटी ४० लाख रुपये मंजूर झाल्याने प्रशासनाला आणखी निधीची गरज भासणार आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीRainपाऊसGovernmentसरकार